शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

ऊर्दू अल्पसंख्य शाळांना आदिवासी भागांचे निकष

By admin | Updated: August 18, 2016 02:19 IST

अल्पसंख्य शिक्षण संस्थांतर्फे राज्यात चालविणाऱ्या जाणाऱ्या ऊर्दू माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना राज्य सरकारने मान्यता व अनुदानासाठी आदिवासी, डोंगराळ आणि नक्षली

मुंबई: अल्पसंख्य शिक्षण संस्थांतर्फे राज्यात चालविणाऱ्या जाणाऱ्या ऊर्दू माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना राज्य सरकारने मान्यता व अनुदानासाठी आदिवासी, डोंगराळ आणि नक्षली भागांतील शाळांना लावले जाणारे निकष लावावेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने १५ नोव्हेंबर २०११ च्या शासन निर्णयाने (जीआर) नव्या शाळा सुरु करणे आणि विद्यमान शाळांची मान्यता कायम ठेवणे याबाबतीत ऊर्दू माध्यमाच्या शाळांची मोट सर्वसाधारण प्रवर्गातील इतर शाळांसोबत बांधली होती. त्यामुळे ऊर्दू माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना मान्यता आणि अनुदानासाठी वर्गातील विद्यार्थ्यांची सरकारी पटसंख्या किमान ३० एवढी असणे सक्तीचे होते.मात्र प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरु करणे व त्यांची मान्यता कायम राहण्यासाठी या ‘जीआर’मध्ये ठरविलेला किमान ३० विद्यार्थी संख्येचा निकष अल्पसंख्य समाजातर्फे चालविल्या जाणाऱ्या ऊर्दू माध्यमाच्या शाळांना लागू होणार नाही, असा आदेश न्यायालयाने दिला. तसेच सरकारने या ‘जीआर’ला शुद्धिपत्र जारी करून ऊर्दू माध्यमाच्या शाळांसाठी हा निकष ३० ऐवजी २० असा करावा, असे निर्देशही न्यायालयाने दिले.सन २०११ च्या या ‘जीआर’ नंतर १६ जुलै २०१३ रोजी शालेय शिक्षण विभागाने आणखी एक ‘जीआर’ काढून डोंगराळ, आदिवासी आणि नक्षलप्रभावित क्षेत्रांमधील शाळांसाठी मान्यता व अनुदानासाठी किमान विद्यार्थीसंख्येचा निकष ३० वरून २० असा कमी केला होता. सरकारने ऊर्दू माध्यमाच्या शाळांनाही हाच निकष लावावा, असे न्यायालयाने सांगितले.महाराष्ट्र ऊर्दू शाळा संघटना समितीतर्फे त्यांचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. शेख मन्सूर मुस्तफा यांच्यासह ऊर्दू माध्यमाच्या शाळा चालविणाऱ्या औरंगाबाद व जालना येथील एकूण ११ अल्पसंख्य शिक्षण संस्थांनी केलेली रिट याचिका मंजूर करून न्या. संभाजी शिवाजी शिंदे आणि न्या. संगीतराव पाटील यांच्या खंडपीठाने वरील निकाल दिला.सरकारचे असे म्हणणे होते की, मराठी माध्यमाच्या सर्वसाधारण शाळा आणि अल्पसंख्य संस्थांतर्फे चालविल्या जाणाऱ्या ऊर्दू माध्यमाच्या शाळा यांच्यात काहीच फरक नाही, त्यामुळे त्यांना समानच मानायला हवे. शिवाय आदिवासी, डोंगराळ आणि नक्षलप्रभावीत भागांतील शाळांना दिलेल्या सवलतीमुळे ऊर्दू शाळांवर कोणताही अन्याय झालेला नाही. कारण भौगोलिक व सामाजिक कारणांमुळे आदिवासी, डोंगराळ व नक्षलप्रभावीत क्षेत्रातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असते. त्यामुळे त्या शाळांना विद्यार्थीसंख्येत सवलत दिली गेली आहे. शहरांमधील ऊर्दू शाळांना त्याच तागडीत तोलता येणार नाही.मात्र याचिकाकर्त्यांनी केलेला युक्तिवाद मान्य करून न्यायालयाने म्हटले की, १० फेब्रुवारी १९९४ चा ‘जीआर’ पाहिला तर त्यात नव्या शाळा सुरु करणे व मान्यता कायम ठेवण्याच्या बाबतीत त्यात ऊर्दू माध्यमाच्या शाळांना सवलत देऊन त्यांच्यासाठी किमान विद्यार्थी संख्या १५ एवढी ठरविलेली दिसते. म्हणजेच त्यावेळी ऊर्दू शाळांना इतर सर्वसाधारण शाळांप्रमाणे मानल्याचे दिसत नाही. त्यामुळे सन २०११ च्या ‘जीआर’मध्ये त्यांना तसे मानणे ही पक्षपाती वागणूक आहे.या सुनावणीत याचिकाकर्त्यांसाठी अ‍ॅड. व्ही. डी. सकपाळ यांनी तर राज्य सरकारसाठी सहाय्यक सरकारी वकील व्ही. एच. दिघे यांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)मुलभूत हक्कांचा दाखलाराज्यघटनेने अल्पसंख्य समाजाच्या शिक्षण संस्थांना अनुच्छेद २९ व ३० अन्वये दिलेल्या मुलभूत हक्कांचा दाखला देत याचिकाकर्त्यांनी असाही युक्तिवाद केला की, महाराष्ट्रातील मुस्लिम समाज शैज्ञणिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळे या समाजातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी त्यांना त्यांच्या उर्दू या मातृभाषेत शिक्षण देण्याची गरज आहे.