शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
3
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
4
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
5
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
6
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
7
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
8
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
9
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
10
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
11
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
12
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
13
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
14
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
15
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
16
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
17
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
18
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
19
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
20
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर

आदिवासी विकास विभाग घोटाळा : उच्च न्यायालयाने सहसचिवांना घेतले फैलावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 06:08 IST

आदिवासी विकास विभागाच्या ६,००० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदविण्याचे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही, आदिवासी विभागाचे सहसचिव आरोपींना सुनावणी देण्यास इच्छुक आहेत.

मुंबई : आदिवासी विकास विभागाच्या ६,००० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदविण्याचे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही, आदिवासी विभागाचे सहसचिव आरोपींना सुनावणी देण्यास इच्छुक आहेत. तशी भूमिका त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट केली आहे. आदेशाविरुद्ध सहसचिव सुनिल पाटील यांनी भूमिका घेतल्याने न्यायालयाने त्यांना सुनावले. आरोपींना पाठीशी घालत असल्याने तुमच्यावरच गुन्हा का नोंदविण्यात येऊ नये, असा सवाल न्यायालयाने पाटील यांना मंगळवारी केला. तसेच प्रतिज्ञापत्र मागे घेण्याचे आदेश देत आरोपींवर काय कारवाई केली, याची माहिती देण्याचे निर्देश दिले.विजय गावीत आदिवासी विकास विभागाचे मंत्री असताना, आदिवासी विभाग वस्तू वाटपात सुमारे ६,००० कोटींचा घोटाळा झाला. या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. राजेंद्र रघुवंशी, रत्नेश दुबे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. न्यायालयाने चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एम.जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. तिने फेब्रुवारी २०१७ मध्ये न्यायालयात अहवाल सादर केला. घोटाळ्यात तत्कालीन मंत्री विजय गावीत व विभागातील कर्मचाºयांची भूमिकेबाबत सखोल माहिती दिली. तसेच संबंधित अधिकाºयांवर गुन्हा नोंदविण्याची शिफारसही केली. कारवाईचा बडगा उगारला जाईल, या भीतीने संबंधित अधिकाºयांनी आपल्यावर थेट गुन्हा न नोंदविता, नैसर्गिक न्यायदान तत्त्वाप्रमाणे आधी सुनावणी घ्यावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने १४ जूनला ती फेटाळत अधिकाºयांवर थेट गुन्हे नोंदविण्याचे तसेच याबाबत माहिती देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले.न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे मंगळवारच्या सुनावणीत आदिवासी विकास विभागाचे सहसचिव हजर होते. आतापर्यंत किती आरोपींवर गुन्हा नोंदविला, असा सवाल न्यायालयाने करताच, मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी तीन जणांवर गुन्हा नोंदविल्याची माहिती दिली. या प्रकरणात ११० हून अधिक आरोपींचा समावेश असताना, दीड वर्षात केवळ तिघांवरच गुन्हा नोंदविलात? असे संतापत न्यायालयाने म्हटले. त्यावर यादव यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. ते वाचून न्यायालय वैतागले. आरोपींना सुनावणी न देण्याचे आदेश असतानाही (सुनिल पाटील) त्यांना सुनावणी का देताय? हा आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न आहे. याबद्दल तुमच्यावरच गुन्हा का नोंदवू नये? हा न्यायालयाचा अवमान आहे, असे म्हणत न्यायालयाने पाटील यांना प्रतिज्ञापत्र मागे घेण्यास सांगितले.दोन आठवड्यांनी नवे प्रतिज्ञापत्र सादर करा तसेच राज्य सरकारने किती जणांवर गुन्हा नोंदविला याची माहिती देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.

टॅग्स :Courtन्यायालयnewsबातम्या