शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

देशात १० मनोरुग्णांपैकी एकावरच होतात उपचार

By admin | Updated: May 21, 2016 05:13 IST

देशात आरोग्य सुविधा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून केंद्रासह राज्य सरकार विविध कार्यक्रम राबवित आहे.

मुंबई : देशात आरोग्य सुविधा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून केंद्रासह राज्य सरकार विविध कार्यक्रम राबवित आहे. या आरोग्य कार्यक्रमांत शारीरिक आजारांचा प्रामुख्याने विचार केला जातो. पण, देशातील नागरिकांच्या मानसिक आरोग्याविषयी सर्वांनाच अजूनही कमालीची अनभिज्ञनता आहे. कारण, १० मनोरुग्णांपैकी एकच मनोरुग्ण उपाचार घेतो. तर, तीन लाख लोकसंख्येमागे एकच मानसोपचार तज्ज्ञ देशात असल्याचे लॅन्सेट जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.सध्या सर्वांचीच जीवनशैली ताणतणावाची झालेली आहे. जागतिकीकरणामुळे प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढत आहे. त्यामुळे कामाच्या डेडलाइन, वाढीव कामाचे तास या सगळ्याचा ताण सतत येत असतो. त्यातच बदलत्या नातेसंबंधांमुळे मानसिक ताणात भर पडते आहे. पण, या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केले जाते. अजूनही मानसिक आजारांबाबतची जनजागृती हवी तशी न झाल्याने लोक डॉक्टरांकडे जाणे टाळतात. याचा गंभीर परिणाम मोठ्या समूहांच्या मानसिकतेवर होताना दिसत असल्याचे लॅन्सेटमध्ये नमूद केले आहे.जगातील एक तृतीयांश मनोरुग्ण हे भारत आणि चीन या देशांमध्ये आहेत. मनोरुग्णांची सर्वाधिक संख्या चीनमध्ये आहे. पण, २०२५पर्यंत भारत मानसिक आजारांमध्ये पहिल्या क्रमांकावर जाईल, अशी भीतीही या अहवालात नमूद केली आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील रुग्णांना कमी मानसिक उपचार मिळत आहेत. मनोविकारांकडे दुर्लक्ष होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.देशात मानसोपचारतज्ज्ञांची संख्या कमी असल्याचेही या अहवालातून स्पष्ट झाले आहे. ३ लाख लोकसंख्येमागे फक्त १ मानसोपचारतज्ज्ञ आहे. चिंता आणि उदासीनता या दोन प्रमुख आजारांनी सर्वाधिक व्यक्ती ग्रस्त आहेत. व्यक्ती किती वर्षे जगतो. त्यापेक्षा किती वर्षे सुदृढ आयुष्य जगला याला ‘हेल्दी लाइफ इयर’ असे वैद्यकीय भाषेत संबोधले जाते. या संकल्पनेनुसार, २०१४ या वर्षात देशात ३१ दशलक्ष वर्षे फुकट गेलेली आहेत. तर, हा आकडा २०२५पर्यंत ३८ दशलक्षांपर्यंत पोहोचेल. म्हणजेच दरवर्षी ३८ दशलक्ष वर्षे फुकट जातील, असेही लॅन्सेटच्या अहवालात स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)>मानसिक रोगांवर उपचार करणाऱ्यांची गरज वाढत जाणारवाढत्या लोकसंख्येचा विचार करता येत्या १० वर्षांमध्ये मानसिक आजारांवर उपचार करणाऱ्या तज्ज्ञांची गरजही वाढणार आहे. भारतीय लोकांचे जीवन उत्तरोत्तर गतिमान होत चालले आहे, त्याचप्रमाणे सामाजिक बंधांमध्ये झालेले बदलही नव्या ताणांची निर्मिती करते. अशा स्थितीत येत्या दशकभरात मानसोपचार करणारे तज्ज्ञही तितक्याच संख्येने निर्माण होणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे अभियांत्रिकी किंवा इतर करिअरकडे पाहिले जाते त्याचप्रमाणे या करिअरकडे पाहिले पाहिजे. एक मनोविकारतज्ज्ञ पूर्ण क्षमतेने तयार होण्यासाठी नऊ ते दहा वर्षांचा कालावधी लागतो, त्यामुळे पुढील गरज ओळखून आताच तयारी करावी लागते. मानसिक आजारांवरील उपचार करण्यास तज्ज्ञ नसतील तर ती पोकळी भोंदू किंवा अंधश्रद्धा पसरवणारे लोक घेण्याची भीती मोठी आहे. - डॉ. राजेंद्र बर्वे, मनोविकारतज्ज्ञ