शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
3
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
4
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
5
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
6
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
7
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
8
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
9
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
10
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
11
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
12
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
13
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
14
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
15
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
16
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
17
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
18
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
19
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
20
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर

देशात १० मनोरुग्णांपैकी एकावरच होतात उपचार

By admin | Updated: May 21, 2016 05:13 IST

देशात आरोग्य सुविधा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून केंद्रासह राज्य सरकार विविध कार्यक्रम राबवित आहे.

मुंबई : देशात आरोग्य सुविधा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून केंद्रासह राज्य सरकार विविध कार्यक्रम राबवित आहे. या आरोग्य कार्यक्रमांत शारीरिक आजारांचा प्रामुख्याने विचार केला जातो. पण, देशातील नागरिकांच्या मानसिक आरोग्याविषयी सर्वांनाच अजूनही कमालीची अनभिज्ञनता आहे. कारण, १० मनोरुग्णांपैकी एकच मनोरुग्ण उपाचार घेतो. तर, तीन लाख लोकसंख्येमागे एकच मानसोपचार तज्ज्ञ देशात असल्याचे लॅन्सेट जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.सध्या सर्वांचीच जीवनशैली ताणतणावाची झालेली आहे. जागतिकीकरणामुळे प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढत आहे. त्यामुळे कामाच्या डेडलाइन, वाढीव कामाचे तास या सगळ्याचा ताण सतत येत असतो. त्यातच बदलत्या नातेसंबंधांमुळे मानसिक ताणात भर पडते आहे. पण, या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केले जाते. अजूनही मानसिक आजारांबाबतची जनजागृती हवी तशी न झाल्याने लोक डॉक्टरांकडे जाणे टाळतात. याचा गंभीर परिणाम मोठ्या समूहांच्या मानसिकतेवर होताना दिसत असल्याचे लॅन्सेटमध्ये नमूद केले आहे.जगातील एक तृतीयांश मनोरुग्ण हे भारत आणि चीन या देशांमध्ये आहेत. मनोरुग्णांची सर्वाधिक संख्या चीनमध्ये आहे. पण, २०२५पर्यंत भारत मानसिक आजारांमध्ये पहिल्या क्रमांकावर जाईल, अशी भीतीही या अहवालात नमूद केली आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील रुग्णांना कमी मानसिक उपचार मिळत आहेत. मनोविकारांकडे दुर्लक्ष होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.देशात मानसोपचारतज्ज्ञांची संख्या कमी असल्याचेही या अहवालातून स्पष्ट झाले आहे. ३ लाख लोकसंख्येमागे फक्त १ मानसोपचारतज्ज्ञ आहे. चिंता आणि उदासीनता या दोन प्रमुख आजारांनी सर्वाधिक व्यक्ती ग्रस्त आहेत. व्यक्ती किती वर्षे जगतो. त्यापेक्षा किती वर्षे सुदृढ आयुष्य जगला याला ‘हेल्दी लाइफ इयर’ असे वैद्यकीय भाषेत संबोधले जाते. या संकल्पनेनुसार, २०१४ या वर्षात देशात ३१ दशलक्ष वर्षे फुकट गेलेली आहेत. तर, हा आकडा २०२५पर्यंत ३८ दशलक्षांपर्यंत पोहोचेल. म्हणजेच दरवर्षी ३८ दशलक्ष वर्षे फुकट जातील, असेही लॅन्सेटच्या अहवालात स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)>मानसिक रोगांवर उपचार करणाऱ्यांची गरज वाढत जाणारवाढत्या लोकसंख्येचा विचार करता येत्या १० वर्षांमध्ये मानसिक आजारांवर उपचार करणाऱ्या तज्ज्ञांची गरजही वाढणार आहे. भारतीय लोकांचे जीवन उत्तरोत्तर गतिमान होत चालले आहे, त्याचप्रमाणे सामाजिक बंधांमध्ये झालेले बदलही नव्या ताणांची निर्मिती करते. अशा स्थितीत येत्या दशकभरात मानसोपचार करणारे तज्ज्ञही तितक्याच संख्येने निर्माण होणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे अभियांत्रिकी किंवा इतर करिअरकडे पाहिले जाते त्याचप्रमाणे या करिअरकडे पाहिले पाहिजे. एक मनोविकारतज्ज्ञ पूर्ण क्षमतेने तयार होण्यासाठी नऊ ते दहा वर्षांचा कालावधी लागतो, त्यामुळे पुढील गरज ओळखून आताच तयारी करावी लागते. मानसिक आजारांवरील उपचार करण्यास तज्ज्ञ नसतील तर ती पोकळी भोंदू किंवा अंधश्रद्धा पसरवणारे लोक घेण्याची भीती मोठी आहे. - डॉ. राजेंद्र बर्वे, मनोविकारतज्ज्ञ