शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

चार वर्षांत राज्यातील जवळपास ३ कोटी रुग्णांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 06:09 IST

१०८ रुग्णवाहिका ठरतेय वरदान : १० महिन्यांत सेवा घेण्यात पुणे आघाडीवर, आठ लाख गर्भवतींनाही झाला लाभ

- स्नेहा मोरे

मुंबई : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना सेवा देणाऱ्या १०८ रुग्णवाहिकेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. २६ जानेवारी २०१४ रोजी ही सेवा राज्यात सुरू झाली, तेव्हापासून गेल्या चार वर्षांत तब्बल ३ कोटी ३९ लाख ५ हजार ८६३ रुग्णांवर या सेवेच्या माध्यमातून उपचार करण्यात आले आहेत. तर गेल्या जवळपास १० महिन्यांत या सेवेचा लाभ घेण्यात पुणे हे राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.

राज्यभरात १०८ रुग्णवाहिकेची सेवा घेण्यात पुणे शहर आघाडीवर असून या जिल्ह्यात ३ लाख ४१ हजार २६३ रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यानंतर सोलापूर आणि मुंबई जिल्ह्यातील रुग्णांवर उपचार करण्याचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय, गेल्या चार वर्षांत रुग्णवाहिकेने राज्यातील ८ लाख ३० हजार ४३५ गर्भवतींवर उपचार केले आहेत. तर याशिवाय, अन्य आरोग्यविषयक तक्रारींनी ग्रस्त असणाºया १६ लाख ३१ हजार ४८९ रुग्णांना नवसंजीवनी दिली आहे.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने ग्रामीण विशेषत: आदिवासीबहुल भागात आरोग्यविषयक सेवा-सुविधा जलदगतीने पोहोचाव्यात, या उद्देशाने ‘१०८’ रुग्णवाहिकेची संकल्पना मांडण्यात आली. या सेवेसाठी जिल्ह्यात ४६ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. राज्यभरात रात्रंदिवस या दोन सत्रांत ९३७ रुग्णवाहिका कार्यरत असून त्यातील २३३ रुग्णवाहिकांमध्ये अद्ययावत लाइफ सपोर्ट असून ७०४ रुग्णवाहिकांमध्ये बेसिक लाइफ सपोर्टची सेवा उपलब्ध आहे.अशी चालते यंत्रणारुग्ण किंवा नातेवाईक वा इतरांकडून १०८ क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी विचारणा केली असता, तो क्रमांक कुठला ते शोधले जाते. त्याच वेळी जीपीएस प्रणालीने त्या मार्गावर कोणते रुग्णालय आहे, हे पाहून तेथील ग्रामीण, उपरुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधत रुग्णाविषयी कल्पना दिली जाते. तेथील १०८ वरील वाहनचालकांशी संपर्क साधत, अवघ्या १५-२० मिनिटांत रुग्णवाहिका रुग्णांपर्यंत पोहोचते. दरम्यान, त्यानंतर रुग्णावर त्वरित प्राथमिक उपचार सुरू होतात. गरज भासल्यास अपघातग्रस्त वा आपत्कालीन स्थितीत असलेल्या रुग्णाला रुग्णालयातही नेले जाते.