शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

उपनगरातील रेल्वेचा प्रवास धोक्याच्या ‘ट्रॅकवर’

By admin | Updated: February 14, 2017 04:49 IST

मुंबई रेल्वेतील ‘उपनगरीय मार्गावरील प्रवास’ हा धोक्याचा बनत चालला आहे. २0१६मध्ये झालेल्या विविध अपघातांत ३ हजार २0२ जणांना प्राण

मुंबई : मुंबई रेल्वेतील ‘उपनगरीय मार्गावरील प्रवास’ हा धोक्याचा बनत चालला आहे. २0१६मध्ये झालेल्या विविध अपघातांत ३ हजार २0२ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. यात ठाणे आणि कल्याण स्थानकांत सर्वाधिक अनुक्रमे १२९ व ११७ जणांचा मृत्यू झाल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली. माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झवेरी यांनी ही माहिती उघडकीस आणली आहे. त्यानंतर उपनगरातील गोरेगाव, बोरीवली, विरार, मानखुर्द या स्थानकांत व त्यादरम्यान मृत्यूंचे प्रमाण अधिक असल्याचे सांगण्यात आले. रेल्वे रूळ ओलांडताना सर्वांत जास्त अपघात होतात. त्यानंतर ट्रेनमधून पडणे, खांबांना धडकणे, ट्रेन व प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडणे, ओव्हरहेड वायरचा शॉक लागणे, रुळांवर आत्महत्या करणे, नैसर्गिक मृत्यू व अन्य अपघात रेल्वे स्थानक व हद्दीत होतात आणि त्यात अनेकांना जीव गमवावा लागताना काही गंभीर जखमीही होतात. २0१६मध्ये अशा प्रकारे झालेल्या विविध अपघातांमध्ये मध्य रेल्वे मेन लाइन, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील उपनगरीय मार्गावर झालेल्या अपघातांत मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे अपघात झाले आहेत. मध्य रेल्वेच्या मेन लाइनच्या ठाणे ते कल्याण या पट्ट्यात ४७८ जणांचे मृत्यू झाले असून, यामध्ये ठाण्यात सर्वाधिक १२९ जणांचा मृत्यू आणि ७१ जण जखमी, तसेच कल्याण स्थानकात ११७ जणांचा मृत्यू तर १४७ जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. दिवा स्थानकात तर ७१ जणांनी विविध अपघातांत प्राण गमावले आहेत. (प्रतिनिधी)