शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
3
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
4
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
5
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
6
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
7
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
8
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
9
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
10
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
11
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
12
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
13
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
14
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
15
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
16
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
17
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
18
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
19
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
20
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?

उपनगरातील रेल्वेचा प्रवास धोक्याच्या ‘ट्रॅकवर’

By admin | Updated: February 14, 2017 04:49 IST

मुंबई रेल्वेतील ‘उपनगरीय मार्गावरील प्रवास’ हा धोक्याचा बनत चालला आहे. २0१६मध्ये झालेल्या विविध अपघातांत ३ हजार २0२ जणांना प्राण

मुंबई : मुंबई रेल्वेतील ‘उपनगरीय मार्गावरील प्रवास’ हा धोक्याचा बनत चालला आहे. २0१६मध्ये झालेल्या विविध अपघातांत ३ हजार २0२ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. यात ठाणे आणि कल्याण स्थानकांत सर्वाधिक अनुक्रमे १२९ व ११७ जणांचा मृत्यू झाल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली. माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झवेरी यांनी ही माहिती उघडकीस आणली आहे. त्यानंतर उपनगरातील गोरेगाव, बोरीवली, विरार, मानखुर्द या स्थानकांत व त्यादरम्यान मृत्यूंचे प्रमाण अधिक असल्याचे सांगण्यात आले. रेल्वे रूळ ओलांडताना सर्वांत जास्त अपघात होतात. त्यानंतर ट्रेनमधून पडणे, खांबांना धडकणे, ट्रेन व प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडणे, ओव्हरहेड वायरचा शॉक लागणे, रुळांवर आत्महत्या करणे, नैसर्गिक मृत्यू व अन्य अपघात रेल्वे स्थानक व हद्दीत होतात आणि त्यात अनेकांना जीव गमवावा लागताना काही गंभीर जखमीही होतात. २0१६मध्ये अशा प्रकारे झालेल्या विविध अपघातांमध्ये मध्य रेल्वे मेन लाइन, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील उपनगरीय मार्गावर झालेल्या अपघातांत मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे अपघात झाले आहेत. मध्य रेल्वेच्या मेन लाइनच्या ठाणे ते कल्याण या पट्ट्यात ४७८ जणांचे मृत्यू झाले असून, यामध्ये ठाण्यात सर्वाधिक १२९ जणांचा मृत्यू आणि ७१ जण जखमी, तसेच कल्याण स्थानकात ११७ जणांचा मृत्यू तर १४७ जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. दिवा स्थानकात तर ७१ जणांनी विविध अपघातांत प्राण गमावले आहेत. (प्रतिनिधी)