शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

तृप्ती देसाई व त्यांच्या पतीविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

By admin | Updated: July 6, 2017 14:22 IST

भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई, त्यांचे पती आणि अन्य चौघांविरोधात हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत 

वाकड, दि. 6 -  भूमाता  ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई, त्यांचे पती आणि अन्य चौघांविरोधात हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्यक्तीला मारहाण करुन त्याच्याकडून पैसे उकळल्याचा आरोप तृप्ती देसाई आणि त्यांच्या पतीवर आहे.
 
विजय मकासरे यांनी हिंजवडी पोलिसांत ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार जातीवाचक शिवीगाळ करून खंडणी मागणे, मारहाण करणे, रस्ता अडविणे असे गुन्हे या सर्वांवर दाखल करण्यात आले आहेत.   याबाबत हिंजवडी पोलिसांकडून मिळालेली प्राथमिक माहिती अशी की,  २७ जून २०१७ रोजी सकाळी ११.३० वाजता फिर्यादी मकासरे बालेवाडी येथील व्हीनस ग्रॅनाईडकडे मोटरीतून तृप्ती देसाईंसोबत जात होते. 
 
आणखी वाचा 
 
दरम्यान प्रशांत देसाई, सतीश देसाई, कांतीलाल गवारे आणि इतर दोघे चारचाकी मोटारीतून आले. त्यांनी फिर्यादी विजय मकासरे यांना गाडी  थांबवायला भाग पाडले. तृप्ती देसाईसह सर्वांनी आपल्याला लाकडी दांडक्याने आणि लोखंडी रॉडने मारहाण केली तसेच प्रशांत देसाई यांनी गळ्यातील सव्वा तोळ्याची सोन्याची चैन आणि २७ हजार रुपये काढून घेतले. 
 
तृप्ती देसाई यांनी आमच्याविरोधात गेलास तर तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करेन, अशी धमकी दिली आणि जातीवाचक शब्दांचा वापर केला, असा आरोप विजय मकासरे यांनी हिंजवडी पोलिसांना दिलेल्या जबाबात केला आहे. 
 
शनी शिंगणापूर मंदिरातील चौथ-यावर महिलांना प्रवेश मिळवून देण्यासाठी केलेल्या आंदोलनानंतर तृप्ती देसाई चर्चेत आल्या. ज्या मंदिरात महिलांना प्रवेश दिला जात नाही त्यासाठी तृप्ती देसाईंची संघटना आंदोलन करते तसेच स्त्रियांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी आंदोलने केली आहेत. हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी सुद्धा त्यांनी आंदोलन केले आहे. 
 
मागच्यावर्षी त्यांनी नगररोडवरील शिक्रापूर चौकात एका तरुणाला बेदम मारहाण केली होती. श्रीकांत लोंढे असं मारहाण मारहाण केलेल्या तरुणाचे नाव होते. एका तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध होतं. लग्नाचं आमिष दाखवून तीच्याशी शरीरसंबंध ठेवले. मात्र मुलीला दिवस जाऊनही श्रीकांतने लग्न न केल्याने, तसंच पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप न केल्याने, या तरुणाला चोप दिल्याचं, तृप्ती देसाई यांनी सांगितले होते.