शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

गाड्या वाढताहेत; सुरक्षेचे काय?

By admin | Updated: July 10, 2014 00:57 IST

अर्थसंकल्पात नागपूरला नव्या दोन गाड्या मिळून आठ गाड्या नागपूरमार्गे धावणार आहेत. प्रत्येक अर्थसंकल्पात नव्या गाड्यांची घोषणा होते. परंतु सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलाच विचार होत नाही.

अपुरी सुरक्षा यंत्रणा : चोऱ्या वाढल्या, रेल्वे रूळही दुर्लक्षितचदयानंद पाईकराव - नागपूर अर्थसंकल्पात नागपूरला नव्या दोन गाड्या मिळून आठ गाड्या नागपूरमार्गे धावणार आहेत. प्रत्येक अर्थसंकल्पात नव्या गाड्यांची घोषणा होते. परंतु सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलाच विचार होत नाही. यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितताच धोक्यात आली असून नव्या गाड्या नकोत आधी सुरक्षा पुरवा, असे म्हणण्याची पाळी प्रवाशांवर आली आहे.नागपूर शहर देशाच्या केंद्रस्थानी आहे. नागपूर शहरातून दररोज १५० ते १६० रेल्वेगाड्या आणि ५० ते ६० हजार प्रवासी ये-जा करतात. रेल्वेगाड्यात प्रवाशांचे साहित्य चोरीला जाणे, पाकीट मारणे, मोबाईल पळविणे या घटना दररोजच्या झाल्या आहेत. रेल्वेगाड्यांच्या स्लिपर क्लासमध्ये तर सोडा एसी कोचमधील प्रवासी सुरक्षित नाहीत. अनेक गाड्यात ‘आरपीएफ’ जवानांची संख्या पुरेशी नसल्याने गस्त होत नाही. याचा फायदा चोरट्यांना मिळून ते थेट कोचमध्ये शिरून प्रवाशांची रोख रक्कम, दागिने, महागडे साहित्य लंपास करीत आहेत. नागपूर-सेवाग्राम या मार्गावर मागील अर्थसंकल्पात थर्ड लाईनच्या कामाला मंजुरी मिळाली. या मार्गाची रेल्वेगाड्या चालविण्याची क्षमता १०० असताना तेथे १५० रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. हा थेट रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेशी खेळ आहे. त्यामुळे थर्ड लाईनचे काम तातडीने पूर्ण करण्याची गरज आहे. परंतु या थर्डलाईनच्या १५०० कोटींच्या प्रकल्पासाठी मागील वर्षी २६.३६ कोटी आणि या वर्षी १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या थर्डलाईनसाठी अशाच पद्धतीने निधीची तरतूद केल्यास हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आणखी १० वर्षे लागतील, यात शंका नाही. नागपूर-वर्धा मार्गावर रनिंग कर्मचाऱ्यांच्या ड्युटीचे प्रमाणही १० तासांच्या वर होत असून विभागात लोकोपायलटची संख्याही कमी असल्यामुळे अधिक काम करणाऱ्या लोकोपायलटच्या हातून अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने नव्या गाड्यांची घोषणा करण्यापूर्वी सुरक्षेच्या बाबतीत विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)