शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
2
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
3
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
4
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
7
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
10
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
11
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
12
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
13
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
14
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
15
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
16
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
17
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
18
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
19
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
20
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

ब्रिटिशकालीन कळवा पूल बंद झाल्याने वाहतूक कोंडी

By admin | Updated: August 6, 2016 04:44 IST

कळवा खाडीवरील ब्रिटिशकालीन पूल गुरुवारपासून वाहतुकीकरिता बंद केल्याने या परिसरात शुक्रवारी न भुतो न भविष्यती अशी वाहतूक कोंडी

ठाणे : ठाणे महापालिकेने ठाणे आणि कळव्याला जोडणारा कळवा खाडीवरील ब्रिटिशकालीन पूल गुरुवारपासून वाहतुकीकरिता बंद केल्याने या परिसरात शुक्रवारी न भुतो न भविष्यती अशी वाहतूक कोंडी झाली. ठाणे-बेलापूर मार्गावर विटाव्यापर्यंत तर जुन्या मुंबई-पुणे मार्गावर सह्याद्री सोसायटीपर्यंत वाहनांच्या रांगा पोहोचल्या होत्या. या कोंडीमुळे कळव्यातील रहिवासी अक्षरश: हैराण झाले होते. दुपारनंतर या भागातील वाहतूक हळूहळू सुरळीत झाली. त्याचबरोबर कल्याण-शीळ मार्गावरही वाहतूककोंडी झाल्याने अनेक वाहने अडकून पडली होती.मुंबई-गोवा मार्गावर महाडनजीक सावित्री नदीवरील पूल पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानंतर ठाणे-कळवा पुलाच्या स्ट्रक्चरल आॅडिटचा अहवाल येत नाही, तोपर्यंत हा पूल बंद ठेवण्यात येणार आहे. परंतु, हा पूल बंद झाल्याने आता बाजूच्या नवीन पुलावरून होणारी वाहतूक वाढल्याने आणि पुढे आणखी नव्या पुलाचे काम सुरू असल्याने येथील रस्त्यावरील वाहतूककोंडीत भर पडली आहे. ठाणे आणि कळवा या शहरांना जोडण्यासाठी दोन खाडीपूल आहेत. हे दोन्ही पूल या शहरांसाठी महत्त्वाचा दुवा आहे. त्यापैकी एक पूल ब्रिटिशकालीन आहे, तर दुसरा २० वर्षांपूर्वी बांधण्यात आला आहे. ब्रिटिशकालीन पूल १५० वर्षे जुना असून त्याचे आयुर्मान संपले आहे. असे असले तरी या पुलावरून रिक्षा तसेच दुचाकी वाहनांची वाहतूक सुरू होती. ठाणे महापालिका प्रशासनाने कळवा खाडीवरील ब्रिटिशकालीन पुलावर सुरू असलेली हलक्या वाहनांची वाहतूकही गुरुवारपासून बंद केली. या पुलावरून वाहतूक करणाऱ्या रिक्षा तसेच दुचाकी वाहनांचा आकडा मोठा असून ही वाहने गुरुवारपासून नवीन खाडीपुलावरून सोडण्यात येत आहेत. यामुळे शुक्र वारी सकाळी म्हणजेच ऐन गर्दीच्या वेळेस या भागात वाहतूककोंडी झाली. रिक्षा आणि दुचाकी अशी दोन्ही वाहने नवीन खाडीपुलावरून सोडण्यात येत असल्यामुळे कळवा पुलावर वाहनांचा भार वाढला. परिणामी, कळवा चौकातील वाहतूक संथगतीने सुरू असल्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कळवा खाडीपुलापासून ते विटाव्यापर्यंत आणि कळवानाक्यापासून सह्याद्री सोसायटीपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. कळवा पुलाच्या पश्चिमेस साकेत, कोर्टनाका, सिडको रस्ता अशा मार्गांवरही कोंडी झाली होती. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडत होती. (प्रतिनिधी)>ठाणे महापालिका प्रशासनाने कळवा खाडीवरील ब्रिटिशकालीन पुलावर सुरू असलेली हलक्या वाहनांची वाहतूकही गुरुवारपासून बंद केली. यावरून वाहतूक करणाऱ्या दुचाकी वाहनांचा आकडा मोठा असून ही वाहने गुरुवारपासून नवीन खाडीपुलावरून सोडण्यात येत आहेत.