शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

वाहतूक कोंडी ठरतेय डोकेदुखी

By admin | Updated: July 20, 2016 02:03 IST

येथील वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

कामशेत : येथील वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. रस्त्यांवरील व्यावसायिकांची अतिक्रमणे, बेशिस्तपणे रस्त्यातच उभी केलेली वाहने, व्यापाऱ्यांच्या वेळी-अवेळी येणाऱ्या मालाच्या गाड्या यामुळे वाहतूककोंडीत भर पडत असल्याने शहरवासीयांची डोकेदुखी अधिकच वाढली आहे. कामशेत ही मावळ तालुक्यातील मध्यवर्ती बाजारपेठ असून, नाणे, पवन व आजूबाजूच्या सुमारे सत्तर गावांचे हे प्रमुख व्यापारी केंद्र आहे. दररोज हजारो नागरिक विविध कामांसाठी शहरात येतात. शाळा, महाविद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, अनेक खासगी दवाखाने, मध्यवर्ती रेल्वे स्थानक, एसटी स्थानक आदी महत्त्वाची ठिकाणेही येथे आहेत. यामुळे विद्यार्थी, नोकरदारवर्ग, शेतकरी व व्यावसायिकांची शहरात मोठी वर्दळ असते. महामार्ग व लोहमार्ग शहरात असल्याने आजूबाजूच्या गावातील नागरिकांना पुणे-मुंबईला जाण्यासाठी कामशेतमध्ये यावे लागते. रोज लाखोंची उलाढाल असणाऱ्या कामशेतमध्ये पार्किंगची व्यवस्था नसल्याने अनेक लोक रस्त्याच्या कडेलाच वाहने लावतात. मुख्य रस्त्यावर दुकानदारांची अतिक्रमणे असून, यामुळे रस्त्याच्या साइडपट्ट्याच गायब झाल्या आहेत. दुकानदारांचा माल रस्त्यावर येत आहे. त्यात हातगाडीवाले, पथारीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते हेदेखील वाहतूककोंडीत भर घालत असल्याने शहरात वाहतूककोंडी नित्याची बाब झाली आहे. सकाळी, दुपारी व सायंकाळी होणाऱ्या वाहतूककोंडीची छत्रपती शिवाजी चौक, पवनानगर रोड, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक, साईबाबा चौक, बाजारपेठ व रेल्वे स्टेशन रोड आदी ठिकाणे आहेत. (वार्ताहर)कामशेत शहरात स्वतंत्र पोलीस ठाणे अस्तित्वात आल्यानंतर पार्किंगला शिस्त लावण्यासाठी व वाहतूककोंडी सोडविण्यासाठी सम-विषम पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती. पण, सम-विषम तारखेचे बोर्ड फक्त नावापुरतेच उरले आहेत. अनेक नागरिक रस्त्यावरच वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे दहा मिनिटांच्या अंतरावर जाण्यासाठी अर्धा ते एक तास लागतो. या वाहतूककोंडीतून पायी जात असताना नागरिक, विद्यार्थी व महिलांना मोठी कसरत करावी लागत आहे. यातूनच अनेक वेळा वाहनांचे धक्के लागून किरकोळ अपघातही होतात. बाचाबाचीचे प्रकार घडत असतात. शहरातील व्यापाऱ्यांच्या मालांच्या गाड्या माल उतरविण्यासाठी आणण्याबाबत पोलिसांनी ठरावीक वेळ दिली असताना ती वेळ पाळली जात नाही. भर रस्त्यात तासन्तास मालवाहतूक ट्रक थांबवून माल खाली केला जातो. या सर्वांमुळे वाहतुकीस अडथळा होत असून पोलिसांची कारवाई ठरावीक दिवस सोडले, तर होत नाही. शहरातील वाहतूककोंडी सोडविण्याकडे पोलीस दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. वाहनचालकांचा बेशिस्तपणा, व्यापाऱ्यांची उदासीनता व पोलिसांची कारवाईबाबत ठोस भूमिका नसल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.