शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
8
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
9
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
10
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
11
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
12
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
13
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
14
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
15
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
16
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
17
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
18
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
19
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
20
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय

वाहतूक कोंडी ठरतेय डोकेदुखी

By admin | Updated: July 20, 2016 02:03 IST

येथील वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

कामशेत : येथील वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. रस्त्यांवरील व्यावसायिकांची अतिक्रमणे, बेशिस्तपणे रस्त्यातच उभी केलेली वाहने, व्यापाऱ्यांच्या वेळी-अवेळी येणाऱ्या मालाच्या गाड्या यामुळे वाहतूककोंडीत भर पडत असल्याने शहरवासीयांची डोकेदुखी अधिकच वाढली आहे. कामशेत ही मावळ तालुक्यातील मध्यवर्ती बाजारपेठ असून, नाणे, पवन व आजूबाजूच्या सुमारे सत्तर गावांचे हे प्रमुख व्यापारी केंद्र आहे. दररोज हजारो नागरिक विविध कामांसाठी शहरात येतात. शाळा, महाविद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, अनेक खासगी दवाखाने, मध्यवर्ती रेल्वे स्थानक, एसटी स्थानक आदी महत्त्वाची ठिकाणेही येथे आहेत. यामुळे विद्यार्थी, नोकरदारवर्ग, शेतकरी व व्यावसायिकांची शहरात मोठी वर्दळ असते. महामार्ग व लोहमार्ग शहरात असल्याने आजूबाजूच्या गावातील नागरिकांना पुणे-मुंबईला जाण्यासाठी कामशेतमध्ये यावे लागते. रोज लाखोंची उलाढाल असणाऱ्या कामशेतमध्ये पार्किंगची व्यवस्था नसल्याने अनेक लोक रस्त्याच्या कडेलाच वाहने लावतात. मुख्य रस्त्यावर दुकानदारांची अतिक्रमणे असून, यामुळे रस्त्याच्या साइडपट्ट्याच गायब झाल्या आहेत. दुकानदारांचा माल रस्त्यावर येत आहे. त्यात हातगाडीवाले, पथारीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते हेदेखील वाहतूककोंडीत भर घालत असल्याने शहरात वाहतूककोंडी नित्याची बाब झाली आहे. सकाळी, दुपारी व सायंकाळी होणाऱ्या वाहतूककोंडीची छत्रपती शिवाजी चौक, पवनानगर रोड, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक, साईबाबा चौक, बाजारपेठ व रेल्वे स्टेशन रोड आदी ठिकाणे आहेत. (वार्ताहर)कामशेत शहरात स्वतंत्र पोलीस ठाणे अस्तित्वात आल्यानंतर पार्किंगला शिस्त लावण्यासाठी व वाहतूककोंडी सोडविण्यासाठी सम-विषम पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती. पण, सम-विषम तारखेचे बोर्ड फक्त नावापुरतेच उरले आहेत. अनेक नागरिक रस्त्यावरच वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे दहा मिनिटांच्या अंतरावर जाण्यासाठी अर्धा ते एक तास लागतो. या वाहतूककोंडीतून पायी जात असताना नागरिक, विद्यार्थी व महिलांना मोठी कसरत करावी लागत आहे. यातूनच अनेक वेळा वाहनांचे धक्के लागून किरकोळ अपघातही होतात. बाचाबाचीचे प्रकार घडत असतात. शहरातील व्यापाऱ्यांच्या मालांच्या गाड्या माल उतरविण्यासाठी आणण्याबाबत पोलिसांनी ठरावीक वेळ दिली असताना ती वेळ पाळली जात नाही. भर रस्त्यात तासन्तास मालवाहतूक ट्रक थांबवून माल खाली केला जातो. या सर्वांमुळे वाहतुकीस अडथळा होत असून पोलिसांची कारवाई ठरावीक दिवस सोडले, तर होत नाही. शहरातील वाहतूककोंडी सोडविण्याकडे पोलीस दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. वाहनचालकांचा बेशिस्तपणा, व्यापाऱ्यांची उदासीनता व पोलिसांची कारवाईबाबत ठोस भूमिका नसल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.