शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

तळीरामांना अभयाची केडीएमसीची परंपरा

By admin | Updated: October 20, 2016 04:03 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दारूच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी दौलतजादा केली

प्रशांत माने,

कल्याण- कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दारूच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी दौलतजादा केली किंवा कार्यालयातच यथेच्छ दारुची पार्टी केली तरी प्रशासनाला त्याचे सोयरसुतक नाही. थातूरमातूर कारवाईचे नाटक करून तळीरामांना अभय देण्याचेच प्रशासनाचे धोरण असल्याचे यापूर्वीच्या घटनांवरून स्पष्ट झाल्याने कर्मचारी पुन:पुन्हा झिंग झिंग झिंगाट करायला धजावत आहेत.डोंबिवली विभागीय कार्यालयातील ‘ग’ प्रभागाच्या भांडारगृहात सोमवारी रात्री ओली पार्टी झोडण्यात आल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे संबंधित क र्मचारी हे ‘फेरीवाला हटाव’ पथकातील आहेत. फेरीवाल्यांचे अतिक्रमण हा चर्चेचा आणि प्रशासनावरील टीकेचा मुद्दा ठरत असताना या पथकातील कर्मचारी कार्यालयात दारू ढोसत असल्याचे कॅमेरात कैद झाल्याने महापालिकेची अब्रु वेशीला टांगली गेली आहे.कर्मचाऱ्यांच्या विलासी कृत्यांना राजकीय अभय आणि प्रशासनाचा कृपाशीर्वाद मिळत असल्यानेच वरचेवर हे प्रकार होत असल्याचे काही अधिकाऱ्यांचे मत आहे.यापूर्वी २६ जानेवारी २०१५ ला केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात माघी गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दारूच्या नशेत बीभत्स नाच करीत लावणी सादर करणाऱ्या नर्तिकेवर पैसे उधळल्याची घटना घडली होती. कर्मचाऱ्यांचे हे प्रताप मोबाईलमध्ये कैद होऊन व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून सर्वदूर पसरले होते. दौलतजादा करणाऱ्या तब्बल १४ कर्मचाऱ्यांना तत्कालीन आयुक्त मधुकर अर्दड यांनी निलंबित केले होते. या घटनेला दीड वर्षांचा कालावधी उलटत नाही तोच जुलै २०१६ मध्ये गटारी अमावस्येच्या दिवशी महापालिकेच्या ‘ड’ प्रभागक्षेत्र कार्यालयासमोरील पाण्याची टाकी परिसरातील आतमधल्या खोलीमध्ये पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी आॅनड्युटी मद्यपान करीत होते. हा प्रकारही सोशल मीडियावर छायाचित्रांसह प्रसारीत होताच आयुक्त ई. रवींद्रन यांनी संबंधित ७ कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. दौलतजादा असो अथवा गटारी प्रकरण असो आजमितीला हे सर्व कर्मचारी पालिका सेवेत कार्यरत आहेत.दौलतजादा प्रकरणात काही महिने कर्मचारी निलंबित होते. मात्र वाढत्या राजकीय दबावापुढे संबंधित कर्मचाऱ्यांना सेवेत रूजू करून घेणे प्रशासनाला भाग पडले होते. जुलै महिन्यात गटारीच्या दिवशी घडलेल्या प्रकरणात निलंबित कर्मचाऱ्यांना काही अवधीतच पालिका सेवेत रूजू करून घेण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे या कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा पाणीपुरवठा विभागातच वर्णी लावण्यात आली. (प्रतिनिधी)>ताज्या प्रकरणातही चौकशी होऊन अहवाल मागविले जातील आणि कारवाईचा फार्स केला जाईल. परंतु नेहमीप्रमाणे राजकीय दबावापोटी थातूरमाथूर कारवाई होईल. परिणामी कर्मचाऱ्यांवर कोणाचाही धाक नाही. गुरूवारच्या महासभेत या प्रकरणाचे पडसाद उमटतील, अशी अपेक्षा आहे. परंतु मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर, असेच चित्र कायम आहे.