शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

""जीएसटीच्या जाचक अटी रद्द केल्या नाही तर व्यापारीही आत्महत्या करतील""

By admin | Updated: June 22, 2017 21:13 IST

जीएसटी कायद्यातील जाचक अटी सरकारने रद्द केल्या नाहीत तर व्यापा-यांना व्यापार करणे अवघड होणार असून शेतक-यांप्रमाणे व्यापा-यांवरही

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - जीएसटी कायद्यातील जाचक अटी सरकारने रद्द केल्या नाहीत तर व्यापा-यांना व्यापार करणे अवघड होणार असून शेतक-यांप्रमाणे व्यापा-यांवरही आत्महत्या करण्याची वेळ येईल. त्यामुळे काँग्रेस पक्षाने जीएसटी कायद्यातील जाचक नियमांना विरोध करावा अशी मागणी व्यापा-यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे केली.
 
राज्यभरातील विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी आज टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन जीएसटी कायद्यासंदर्भात चर्चा केली. जीएसटी कायद्यामध्ये सरकारने अनेक जाचक अटी घातल्या आहेत. त्यामुळे व्यापारांची मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक पिळवणूक होणार आहे. काँग्रेस सरकारने मांडलेला जीएसटी कायद्यापेक्षा हा कायदा पूर्णपणे वेगळा असून हा कायदा फक्त व्यापा-यांची पिळवणूक करण्यासाठीच आहे की काय अशी शंका येते अशी व्यथा व्यापा-यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांपुढे मांडली.
 
जीएसटी कायद्यात अनेक जाचक अटी असून ब्रँडेड अन्न धान्य आणि डाळीवर पाच टक्के कर लावला जाणार आहे. आतापर्यंत देशात जीवनावश्यक गोष्टीवर कधीच कर लावला नव्हता मात्र मोदी सरकारने जीएसटीच्या माध्यमातून अन्न धान्य आणि डाळींवर कर लावला आहे. दारिद्र्य रेषेखालील लोकांना अन्न मिळावे म्हणून युपीए सरकारने अन्नसुरक्षा कायदा आणला होता. पण या सरकारने जीवनावश्यक वस्तूंवर कर लावून अन्नसुरक्षा कायद्याच्या मूळ उद्द्येशालाच हरताळ फासला आहे. 25 लाखांच्या वर शेतीमाल विक्री करणा-या शेतक-यांना देखील जीएसटी साठी नोंदणी करून रिटर्न दाखल करावे लागणार आहेत. शेतकरी आणि शेतीमालावर कुठलाही कर नसताना जीएसटी नोंदणी आणि रिटर्न फाईल का करायचे असा सवाल आहे ?
 
काँग्रेस पक्ष शेतक-यांप्रमाणेच व्यापा-यांच्यासोबत आहे. जीएसटी कायद्यासंदर्भात काँग्रेस पक्ष व्यापा-यांच्या सोबत असून व्यापा-यांच्या न्याय मागण्यासाठी काँग्रेस पक्ष सरकारकडे पाठपुरावा करेल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी व्यापा-यांना सांगितले.