शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

'भारत बंद'ला पाठिंबा देण्याचे कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 15:57 IST

मागील १० महिन्यांपासून देशातील शेतकरी मोदी सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी विरोधी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत.

नितिन पंडीत

भिवंडी: मागील १० महिन्यांपासून देशातील शेतकरी मोदी सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी विरोधी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. बड्या कॉर्पोरेट कंपन्यांना भारतातील शेती ताब्यात घेण्यासाठी मदत करणारेच हे तीन कायदे असून या कायद्यामुळे छोटे शेतकरी उध्वस्त होणार असून देशातील गरीब नागरिकांच्या जगण्याचा आधार असलेली रेशन व्यवस्था देखील पूर्णपणे नष्ट करणार आहेत. 

हे नवीन कायदे बड्या कॉर्पोरेट्स कंपन्यांना जीवनावश्यक अन्नधान्याची साठेबाजी आणि काळा बाजार करण्याची खुली सूट देऊन महागाई वाढवण्याला हातभार लावणार असल्याचा आरोप विविध शेतकरी व कामगार संघाटांनी केला असून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी सोमवारी २७ सप्टेंबर २०२१ रोजी करण्यात येणाऱ्या भारत बंदला ठाणे जिल्ह्यासह भिवंडीतील व्यवसायिकांबरोबरच रिक्षा व टेक्सी चालकांनी देखील समर्थन देऊन २७ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजे पर्यंत आपली वाहने व दुकाने बंद ठेऊन या भारत बंद आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे निमंत्रक विजय खाने , कॉ. बळीराम चौधरी ,ऍड. किरण चन्ने , कॉ. सुनील चव्हाण , कॉ रमेश जाधव व सदस्यांच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे. 

बड्या कॉर्पोरेट कंपन्यांना खूष करण्यासाठी मोदी सरकारने आधा अस्तित्वात असलेले सर्व कामगार कायदे रद्द केले आणि त्यांच्या जागी चार कामगार विरोधी श्रमसहिता आणल्या असल्याचा आरोप करत मोदी सरकारच्या धोरणांमुळे वीज, पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचे दर गगनाला भिडले असून अदानी, अंबानी, ऍमेझॉन आणि वॉलमार्ट यांची प्रचंड भरभराट होत आहे आणि छोट्या उद्योगधंद्यांना, दुकानदारांना मात्र नोटाबंदी आणि जीएसटीखाली चिरडले जाते आहे. बेरोजगारांच्या संख्येत वाढ होत असून देशातील युवक, युवतीचे भवितव्य अंधारात असल्याचा आरोप देखील कृती समितीने जाहीर निवेदनात केला आहे. 

मोदी सरकारने केलेले शेतकरी विरोधी, कामगार विरोधी, जनविरोधी कायदे आणि धोरणे रद्द करावेत या मागणीसाठी २७ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजे पर्यंत आपली वाहने व दुकाने बंद ठेऊन या भारत बंद आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडी