शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

'भारत बंद'ला पाठिंबा देण्याचे कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 15:57 IST

मागील १० महिन्यांपासून देशातील शेतकरी मोदी सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी विरोधी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत.

नितिन पंडीत

भिवंडी: मागील १० महिन्यांपासून देशातील शेतकरी मोदी सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी विरोधी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. बड्या कॉर्पोरेट कंपन्यांना भारतातील शेती ताब्यात घेण्यासाठी मदत करणारेच हे तीन कायदे असून या कायद्यामुळे छोटे शेतकरी उध्वस्त होणार असून देशातील गरीब नागरिकांच्या जगण्याचा आधार असलेली रेशन व्यवस्था देखील पूर्णपणे नष्ट करणार आहेत. 

हे नवीन कायदे बड्या कॉर्पोरेट्स कंपन्यांना जीवनावश्यक अन्नधान्याची साठेबाजी आणि काळा बाजार करण्याची खुली सूट देऊन महागाई वाढवण्याला हातभार लावणार असल्याचा आरोप विविध शेतकरी व कामगार संघाटांनी केला असून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी सोमवारी २७ सप्टेंबर २०२१ रोजी करण्यात येणाऱ्या भारत बंदला ठाणे जिल्ह्यासह भिवंडीतील व्यवसायिकांबरोबरच रिक्षा व टेक्सी चालकांनी देखील समर्थन देऊन २७ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजे पर्यंत आपली वाहने व दुकाने बंद ठेऊन या भारत बंद आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे निमंत्रक विजय खाने , कॉ. बळीराम चौधरी ,ऍड. किरण चन्ने , कॉ. सुनील चव्हाण , कॉ रमेश जाधव व सदस्यांच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे. 

बड्या कॉर्पोरेट कंपन्यांना खूष करण्यासाठी मोदी सरकारने आधा अस्तित्वात असलेले सर्व कामगार कायदे रद्द केले आणि त्यांच्या जागी चार कामगार विरोधी श्रमसहिता आणल्या असल्याचा आरोप करत मोदी सरकारच्या धोरणांमुळे वीज, पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचे दर गगनाला भिडले असून अदानी, अंबानी, ऍमेझॉन आणि वॉलमार्ट यांची प्रचंड भरभराट होत आहे आणि छोट्या उद्योगधंद्यांना, दुकानदारांना मात्र नोटाबंदी आणि जीएसटीखाली चिरडले जाते आहे. बेरोजगारांच्या संख्येत वाढ होत असून देशातील युवक, युवतीचे भवितव्य अंधारात असल्याचा आरोप देखील कृती समितीने जाहीर निवेदनात केला आहे. 

मोदी सरकारने केलेले शेतकरी विरोधी, कामगार विरोधी, जनविरोधी कायदे आणि धोरणे रद्द करावेत या मागणीसाठी २७ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजे पर्यंत आपली वाहने व दुकाने बंद ठेऊन या भारत बंद आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडी