शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

'भारत बंद'ला पाठिंबा देण्याचे कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 15:57 IST

मागील १० महिन्यांपासून देशातील शेतकरी मोदी सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी विरोधी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत.

नितिन पंडीत

भिवंडी: मागील १० महिन्यांपासून देशातील शेतकरी मोदी सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी विरोधी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. बड्या कॉर्पोरेट कंपन्यांना भारतातील शेती ताब्यात घेण्यासाठी मदत करणारेच हे तीन कायदे असून या कायद्यामुळे छोटे शेतकरी उध्वस्त होणार असून देशातील गरीब नागरिकांच्या जगण्याचा आधार असलेली रेशन व्यवस्था देखील पूर्णपणे नष्ट करणार आहेत. 

हे नवीन कायदे बड्या कॉर्पोरेट्स कंपन्यांना जीवनावश्यक अन्नधान्याची साठेबाजी आणि काळा बाजार करण्याची खुली सूट देऊन महागाई वाढवण्याला हातभार लावणार असल्याचा आरोप विविध शेतकरी व कामगार संघाटांनी केला असून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी सोमवारी २७ सप्टेंबर २०२१ रोजी करण्यात येणाऱ्या भारत बंदला ठाणे जिल्ह्यासह भिवंडीतील व्यवसायिकांबरोबरच रिक्षा व टेक्सी चालकांनी देखील समर्थन देऊन २७ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजे पर्यंत आपली वाहने व दुकाने बंद ठेऊन या भारत बंद आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे निमंत्रक विजय खाने , कॉ. बळीराम चौधरी ,ऍड. किरण चन्ने , कॉ. सुनील चव्हाण , कॉ रमेश जाधव व सदस्यांच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे. 

बड्या कॉर्पोरेट कंपन्यांना खूष करण्यासाठी मोदी सरकारने आधा अस्तित्वात असलेले सर्व कामगार कायदे रद्द केले आणि त्यांच्या जागी चार कामगार विरोधी श्रमसहिता आणल्या असल्याचा आरोप करत मोदी सरकारच्या धोरणांमुळे वीज, पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचे दर गगनाला भिडले असून अदानी, अंबानी, ऍमेझॉन आणि वॉलमार्ट यांची प्रचंड भरभराट होत आहे आणि छोट्या उद्योगधंद्यांना, दुकानदारांना मात्र नोटाबंदी आणि जीएसटीखाली चिरडले जाते आहे. बेरोजगारांच्या संख्येत वाढ होत असून देशातील युवक, युवतीचे भवितव्य अंधारात असल्याचा आरोप देखील कृती समितीने जाहीर निवेदनात केला आहे. 

मोदी सरकारने केलेले शेतकरी विरोधी, कामगार विरोधी, जनविरोधी कायदे आणि धोरणे रद्द करावेत या मागणीसाठी २७ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजे पर्यंत आपली वाहने व दुकाने बंद ठेऊन या भारत बंद आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडी