शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

पर्यटकांची सुरक्षा धोक्यात !

By admin | Updated: June 28, 2016 02:35 IST

शनिवारी रात्री बळी घेतल्यानंतर गडावर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

महाड : रायगड किल्ल्यावर आलेल्या पुण्याच्या २८ वर्षीय आयटी इंजिनीअर असलेल्या पर्यटकाचा गडाच्या कड्यावरून कोसळलेल्या दगडाने शनिवारी रात्री बळी घेतल्यानंतर गडावर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे रायगड किल्ल्याच्या डागडुजीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्यानेच गडदर्शनासाठी येणाऱ्या शिवभक्त पर्यटकांचे बळी जाण्याच्या दुर्घटना घडत असल्याचा आरोप पर्यटकांकडून केला जात आहे. आणखी किती बळी गेल्यावर निद्रिस्त असलेल्या पुरातत्त्व विभागाला जाग येणार, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे.शनिवारी रात्री पथमार्गाने पायऱ्या उतरणाऱ्या अजयप्रतापसिंह प्रदीपसिंह सिकरवार या ट्रेकरच्या अंगावर पथमार्गाच्या कडेलाच असलेल्या कड्यावरून दगड कोसळून त्याचा मृत्यू झाला होता. गेल्यावर्षी देखील गड उतरणाऱ्या एका पर्यटकाच्या अंगावर दगड कोसळून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी या दगडी कोसळणाऱ्या कड्याला संरक्षण जाळ्या बसवण्याची मागणी पर्यटकांकडून करण्यात आली होती. मात्र पुरातत्त्व विभागाने पर्यटकांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेतली नाही. गड दर्शनासाठी येणारे हौशी पर्यटक रोप-वेऐवजी पायऱ्यांनी चढून गडावर जातात. मात्र या पायऱ्यांच्या मार्गाची अत्यंत दुरवस्था झालेली असून बाजूूंचे कठडे देखील अनेक ठिकाणी कोसळलेल्या अवस्थेत आहेत. कोसळलेल्या पायऱ्यांवरून तोल जावून पर्यटक पडून गंभीर जखमी होण्याच्या घटना नियमितपणे घडतात, तर दोन वर्षांपूर्वी कोसळलेल्या पायऱ्यांवर घसरून पडलेल्या एका सहलीबरोबर आलेल्या शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. पायऱ्यांच्या मार्गाने गडावर जाणाऱ्या शैक्षणिक सहलीतील विद्यार्थी पडून गंभीर जखमी होण्याच्या घटना नियमित घडतात. मात्र कोसळलेले कठडे व पायऱ्यांची दुरुस्तीकडे पुरातत्त्व विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे येथील दुरवस्थेवरून लक्षात येते.रायगड महोत्सवाचा निधी गड संवर्धनासाठी उपयोगी आणावयास हवा होता, अशी अपेक्षा शिवभक्तांनी या घटनेनंतर व्यक्त केली. (वार्ताहर)>सुरक्षेची काळजी घ्यावीया दुर्घटनेत मरण पावलेल्या अजयप्रतापसिंह यांची बहीण मनीषा सिंह यांनी आपल्या भावाच्या मृत्यूच्या दु:खातून स्वत:ला सावरत किमान यापुढे तरी गडावर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी पुरातत्त्व विभागाने घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. माझा भाऊ गमावला आहे. मात्र भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटनेत कुणाला जीव गमावण्याची वेळ पुरातत्त्व विभागाने आणू नये, असे मनीषा सिंह यांनी भावुकपणे सांगितले.