शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

अभ्यासाच्या नावाखाली पर्यटन

By admin | Updated: September 23, 2015 01:18 IST

रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांकडे साफ दुर्लक्ष करून संचालक मंडळाने मनमानी कर्जवाटप व तारण मालमत्तेची विक्री केल्यामुळे बँकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेच;

नामदेव मोरे, नवी मुंबईरिझर्व्ह बँकेच्या निर्देशांकडे साफ दुर्लक्ष करून संचालक मंडळाने मनमानी कर्जवाटप व तारण मालमत्तेची विक्री केल्यामुळे बँकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेच; शिवाय रिझर्व्ह बँकेने ठोठावलेल्या दंडाचा भुर्दंडही सोसावा लागला. अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली संचालकांनी केलेले केरळ व काश्मीरचे पर्यटन बँकेला ७ लाख ३० हजार रुपयांना पडले. राज्यातील सहकारी संस्थांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी १९११ मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची स्थापना करण्यात आली आहे. सहकार चळवळ रुजविण्यामध्ये या बँकेने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे; परंतु मागील काही वर्षांत संचालक मंडळाच्या कारभारामुळे या शिखर बँकेची प्रतिमा मलिन झाली आहे. संचालक मंडळाच्या दुर्लक्षामुळे बँकेला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. सहकारी संस्थांमधील पदाधिकारी विविध ठिकाणी अभ्यासदौरे करीत असतात. संबंधित संस्थेला फायदा व्हावा, असा अंतस्थ हेतू या दौऱ्यांमागे असतो. परंतु राज्य शिखर बँकेच्या संचालकांनी अभ्यासाच्या नावाखाली चक्क केरळ व काश्मीरची पर्यटन ‘एन्जॉय’ केले. त्यासाठी बँकेतून घेतलेली ७ लाख ३० हजार रुपयांची आग्रीम रक्कमही भरलेली नाही. या आरोपांसंदर्भात २८ सप्टेंबरपासून सुनावणी सुरू होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेग्युलेशन अ‍ॅक्ट १९४९ चे कलम ३५ (ए) अन्वये राज्य शिखर बँकेची तपासणी केली होती. त्यानंतर बँकेच्या कामकाजामध्ये आढळलेल्या गंभीर बाबींसंदर्भात पूर्तता करण्याबाबत निर्देश दिले होते. परंतु बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने त्या निर्देशांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने ५ लाख रुपये दंड ठोठावला. नाबार्डचे नियम डावलून संचालक मंडळाने ‘आदित्य नेचरफे्रश प्रॉडक्ट’ या खासगी कंपनीस सवलतीच्या दराने कर्ज दिले. यामुळे बँकेचे ३ लाख २७ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी चौकशी अधिकारी शिवाजी पहिणकर यांनी ७७ संचालकांवर १० आरोप ठेवले आहेत. या आरोपांसंदर्भात २८ सप्टेंबरपासून सुनावणी सुरू होणार आहे.