शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

पेट्रोलपेक्षा टोमॅटो महाग

By admin | Updated: July 10, 2017 06:02 IST

महिन्यापूर्वी २० ते ३० रुपयांत मिळणाऱ्या टोमॅटोचे भाव आता ८० ते १०० रुपयांवर पोहोचले

मुंबई/ नागपूर : महिन्यापूर्वी २० ते ३० रुपयांत मिळणाऱ्या टोमॅटोचे भाव आता ८० ते १०० रुपयांवर पोहोचले असून स्वयंपाकघरातून टोमॅटो गायब झाले आहेत. शंभरी गाठल्यामुळे आता टोमॅटो पेट्रोलपेक्षा महाग असल्याची सर्वत्र चर्चा आहे. >दुप्पट भावाने विक्रीसध्या नारायणगाव, मदनफल्ली (आंध्र प्रदेश) आणि नाशिक येथून टोमॅटोची आवक आहे. नागपूर बाजार समितीत ५० ते ६० रुपये घाऊक भाव असला तरी किरकोळ विक्रेते दुपटीने विक्री करीत आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज जवळपास ५५० ते ६०० वाहनांमधून भाजीपाला विक्रीसाठी येत असतो; परंतु मागील काही दिवसांपासून आवक कमी झाली असून, सरासरी ४०० ते ५०० वाहनांचीच आवक होत आहे. मुंबई, नवी मुंबईकरांसाठी रोज ७०० ते ८०० टन टोमॅटोची गरज असते; परंतु सद्य:स्थितीमध्ये जेमतेम २०० ते ३०० टनच आवक होऊ लागली आहे. परिणामी, बाजारभाव प्रचंड वाढले आहेत. १ जुलैला ६ ते १४ रुपये किलो दराने टोमॅटो विकला जात होता. तुटवडा निर्माण झाल्यामुळे हे दर तब्बल २० ते ५० रुपये किलो झाले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये हेच दर ७० ते १०० रुपये किलो झाले आहेत. एक महिन्यापूर्वी फ्लॉवरची सरासरी १५० ते १७० टन आवक होऊ लागली होती. यामुळे फ्लॉवर फेकून देण्याची वेळ आली होती. १ जुलैला होलसेलमध्ये ५ ते ९ रुपये फ्लॉवरचे दर होते ते आता १५ ते २० रुपयांवर गेले असून, किरकोळ मार्केटमध्ये हे दर ६० रुपयांपेक्षा जास्त झाले आहेत. >कोथिंबीरचे ‘दुहेरी शतक’ : गावरानी कोथिंबीरचे भाव १६० ते १८० रुपये किलो आहे. किरकोळमध्ये २५० रुपये किलोपर्यंत विक्री सुरू आहे. उन्हाळ्यात लागवड केलेला माल संपत आल्यामुळे व नवीन पीक आले नसल्याने, राज्यभर भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबई बाजार समितीमध्येही आवक कमी होऊ लागली असून, बाजारभाव प्रचंड वाढले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये अनेक भाज्यांचे दर वाढल्याने किचनचे बजेट दुप्पट झाले आहे.