शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

टोलपोटी १४५ कोटींचा भुर्दंड, मोदींच्या नोटाबंदीचा ठाणे जिल्ह्याला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 05:40 IST

गेल्या वर्षी ८ नाव्हेंबर २०१६ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा करून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. त्यानंतर देशभरातील टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी पैसे नसल्याने वाहनांच्या रांगा लागल्या

नारायण जाधवठाणे : गेल्या वर्षी ८ नाव्हेंबर २०१६ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा करून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. त्यानंतर देशभरातील टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी पैसे नसल्याने वाहनांच्या रांगा लागल्या, यामुळे केंद्र शासनाने महाराष्ट्रासह इतर राज्यांतील सर्व टोलनाक्यांवर ९ नोव्हेंबर २०१६ ते २ डिसेंबर २०१६ या काळाकरिता सर्व वाहनांना पथकरातून सूट दिली. या २४ दिवसांत टोल वसूल करणाºया कंपन्यांचे जे नुकसान झाले होते, त्याची भरपाई म्हणून राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आता संबंधित कंपन्यांना १४४ कोटी ६८ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या १९ टोलनाक्यांसह रस्ते विकास महामंडळाच्या मालकीच्या १४ टोलनाक्यांचा समावेश आहे. केंद्राच्या निर्णयामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला टोलच्या भरपाईपोटी हा भुर्दंड बसला आहे. यात सर्वाधिक टोलनाके ठाणे जिल्ह्यातील आहेत.या २४ दिवसांसाठी मुंबईच्या वाशी, ऐरोली, मुलुंड, दहिसर या प्रवेशद्वारावरील टोलसाठी प्रतिदिन १ कोटी १५ लाख, मुंबई-पुणे महामार्गावर (दोन्ही मार्ग) मिळून दररोज २ कोटी, ठाणे-घोडबंदर रोड टोलनाक्यावर दररोज १३ लाख ५० हजार, भिवंडी -कल्याण-शीळफाटा टोलनाक्यासाठी प्रतिदिन साडेपाच लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. हे सर्व टोलनाके रस्ते विकास महामंडळाच्या मालकीचे आहेत. याशिवाय राज्यातील इतर ९ मार्गांचाही समावेश आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या ठाणे-भिवंडी-वडपा टोलनाक्यावर दररोज १० लाख ८० हजार,अंजुर ते मानकोली रस्ता - ५ लाख ८७ हजार, मनोर-वाडा मार्गावर १५ लाख ४२ हजार आणि सायन-पनवेल महामार्गावरील टोलनाक्यावरील प्रतिदिन भरपाईपोटी ३९ हजार ८१ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय राज्यातील इतर १५ टोलनाक्यांनाही भरपाई देण्यात येणार आहे.टोल कंपन्यांना २०३७पर्यंत ८१३१.३७ कोटी देण्याचा निर्णयजनतेचा असंतोष लक्षात घेऊन शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या २७ टोल नाक्यांसह रस्ते विकास महामंडळाच्या मालकीच्या २६ टोलनाक्यांवर एसटी, जीप, कार व तत्सम वाहनांना पथकरातून सरसकट सूट दिली आहे. त्यांच्या नुकसानभरपाईपोटी संबंधित कंपन्यांना २०१५-१६ ते २०१३६-३७पर्यंत ८१३१ कोटी ३७ कोटींची भरपाई देण्याचाही निर्णयही शासनाने घेतला आहे. यात सार्वजनिक बांधकाम ७३३७ कोटी ४४ लाख तर रस्ते विकास महामंडळ ७५३ कोटी ९३ लाख रुपये भरपाई अटी व शर्ती ठेवून देणार आहे.