शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

टोलपोटी १४५ कोटींचा भुर्दंड, मोदींच्या नोटाबंदीचा ठाणे जिल्ह्याला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 05:40 IST

गेल्या वर्षी ८ नाव्हेंबर २०१६ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा करून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. त्यानंतर देशभरातील टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी पैसे नसल्याने वाहनांच्या रांगा लागल्या

नारायण जाधवठाणे : गेल्या वर्षी ८ नाव्हेंबर २०१६ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा करून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. त्यानंतर देशभरातील टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी पैसे नसल्याने वाहनांच्या रांगा लागल्या, यामुळे केंद्र शासनाने महाराष्ट्रासह इतर राज्यांतील सर्व टोलनाक्यांवर ९ नोव्हेंबर २०१६ ते २ डिसेंबर २०१६ या काळाकरिता सर्व वाहनांना पथकरातून सूट दिली. या २४ दिवसांत टोल वसूल करणाºया कंपन्यांचे जे नुकसान झाले होते, त्याची भरपाई म्हणून राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आता संबंधित कंपन्यांना १४४ कोटी ६८ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या १९ टोलनाक्यांसह रस्ते विकास महामंडळाच्या मालकीच्या १४ टोलनाक्यांचा समावेश आहे. केंद्राच्या निर्णयामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला टोलच्या भरपाईपोटी हा भुर्दंड बसला आहे. यात सर्वाधिक टोलनाके ठाणे जिल्ह्यातील आहेत.या २४ दिवसांसाठी मुंबईच्या वाशी, ऐरोली, मुलुंड, दहिसर या प्रवेशद्वारावरील टोलसाठी प्रतिदिन १ कोटी १५ लाख, मुंबई-पुणे महामार्गावर (दोन्ही मार्ग) मिळून दररोज २ कोटी, ठाणे-घोडबंदर रोड टोलनाक्यावर दररोज १३ लाख ५० हजार, भिवंडी -कल्याण-शीळफाटा टोलनाक्यासाठी प्रतिदिन साडेपाच लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. हे सर्व टोलनाके रस्ते विकास महामंडळाच्या मालकीचे आहेत. याशिवाय राज्यातील इतर ९ मार्गांचाही समावेश आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या ठाणे-भिवंडी-वडपा टोलनाक्यावर दररोज १० लाख ८० हजार,अंजुर ते मानकोली रस्ता - ५ लाख ८७ हजार, मनोर-वाडा मार्गावर १५ लाख ४२ हजार आणि सायन-पनवेल महामार्गावरील टोलनाक्यावरील प्रतिदिन भरपाईपोटी ३९ हजार ८१ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय राज्यातील इतर १५ टोलनाक्यांनाही भरपाई देण्यात येणार आहे.टोल कंपन्यांना २०३७पर्यंत ८१३१.३७ कोटी देण्याचा निर्णयजनतेचा असंतोष लक्षात घेऊन शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या २७ टोल नाक्यांसह रस्ते विकास महामंडळाच्या मालकीच्या २६ टोलनाक्यांवर एसटी, जीप, कार व तत्सम वाहनांना पथकरातून सरसकट सूट दिली आहे. त्यांच्या नुकसानभरपाईपोटी संबंधित कंपन्यांना २०१५-१६ ते २०१३६-३७पर्यंत ८१३१ कोटी ३७ कोटींची भरपाई देण्याचाही निर्णयही शासनाने घेतला आहे. यात सार्वजनिक बांधकाम ७३३७ कोटी ४४ लाख तर रस्ते विकास महामंडळ ७५३ कोटी ९३ लाख रुपये भरपाई अटी व शर्ती ठेवून देणार आहे.