शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

टोल हरला; कोल्हापूर जिंकले--शहरात साखर वाटून जल्लोष

By admin | Updated: December 24, 2015 01:02 IST

मुख्यमंत्र्यांची टोल रद्दची घोषणा : शहरात जल्लोष; तीन दिवसांत अधिसूचना निघणार : चंद्रकांतदादा

नागपूर/कोल्हापूर : कोल्हापूरचा टोल रद्द करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केली. अनेक वर्षांपासून राज्यभरात चर्चेत असलेला हा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे; परंतु ‘आयआरबी’ कंपनीचे रस्त्यांचे पैसे कसे देणार आणि टोल रद्दची अंतिम अधिसूचना कधी निघणार यासंबंधीची स्पष्टता मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली नाही.गेली पाच वर्षे कोल्हापूरकरांनी एकजूट राखत टोलविरोधात आयआरबी कंपनी व सरकारविरोधात नेटाने लढा दिला. मोर्चे, निदर्शने, ठिय्या, धरणे आंदोलनाबरोबरच न्यायालयीन लढाईतही कोल्हापूरकरांनी सरकार व कंपनीशी दोन हात केले. टोल रद्दच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे ‘टोल हरला; कोल्हापूर जिंकले’ हीच भावना समस्त करवीरवासीयांत दिसून आली. टोल रद्दच्या घोषणेनंतर कोल्हापुरात पेढे, साखर वाटून फटाक्यांच्या आतषबाजीसह जल्लोष साजरा करण्यात आला.कोल्हापुरातील टोलवसुलीला सध्या ३१ डिसेंबरपर्यंत स्थगिती आहे. यामुळे शहरात टोलवसुली सुरू नाही; परंतु, या प्रश्नातून कोल्हापूरकरांची कायमची कधी सुटका होणार, अशी विचारणा टोलविरोधी कृती समितीने केली होती. त्यासाठी आंदोलनाचे रणशिंगही नव्याने फुंकण्यात येणार होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. विधानसभेत हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले. कामकाजाच्या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांनी स्वत:च हा विषय उपस्थित केला. कोल्हापूरच्या टोलबद्दल सरकारने निर्णय घेतल्याचे सांगून, ‘टोल रद्द’ची घोषणा करून त्यांनी साऱ्यांनाच सुखद धक्का दिला. नंतर सभागृहाबाहेर सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपकामासह) मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना या प्रकल्पाचे ‘आयआरबी’चे पैसे कसे द्यायचे या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व स्वत: असे एकत्रित बसून निर्णय घेणार आहोत. निर्णय झाल्यानंतर टोल रद्दची अंतिम अधिसूचना काढण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले. ‘आयआरबी’ने या प्रकल्पाचा खर्च म्हणून शासनाकडे ८११ कोटींची मागणी केली आहे. राज्य शासनाने नेमलेल्या मूल्यांकन समितीने १९० कोटी रुपये देण्याची शिफारस केली आहे. मात्र, नोव्हेंबरमध्ये झालेल्या बैठकीत शासनाने प्रकल्पाचा खर्च म्हणून साडेचारशे कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविली आहे. कोल्हापूर शहरातील शंभर टक्के खासगीकरणातून साकारलेल्या या प्रकल्पातून ४९.४९ किलोमीटरचे रस्ते बांधण्यात आले आहेत. त्यासाठी ३० वर्षे टोलवसुली करण्यात येणार होती. ‘शहरांतर्गत रस्त्यांवर टोलवसुली करण्याचा देशातील पहिला प्रकल्प’ म्हणून याकडे पाहिले जात होते; पण रस्त्यांची निकृष्ट कामे, करारात पुरेशी पारदर्शकता न बाळगल्याने हा प्रकल्प सुरुवातीपासून वादग्रस्त ठरला. त्याविरोधात मोठे जनआंदोलन उभे राहिले. आंदोलनामुळे राज्य शासनाला एकूण टोलधोरणाचा फेरविचार करावा लागला. राज्यभरातील सुमारे ३६ टोलनाक्यांवरील टोलवसुली बंद करावी लागली. त्यामुळे या प्रकल्पाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते. ‘आयआरबी’चा आग्रह : बैठकांचे सत्रकोल्हापूरच्या टोलप्रश्नासंबंधी निर्णय घेण्यासाठी आठवडाभर राज्य शासन, राज्य रस्ते विकास महामंडळ, आयआरबी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांत बैठकांचे सत्र सुरू होते. बैठकीत नुकसानभरपाई म्हणून आयआरबीला किती पैसे द्यायचे, यावर एकमत झाल्याचे समजते. या प्रकल्पातून आपली लवकर सुटका व्हावी, असा आग्रह ‘आयआरबी’कडूनच शासनाकडे धरण्यात आला होता. सध्या टोलवसुली बंद आहे. कंपनीचे कर्मचारी, यंत्रणा ठप्प आहे. गुंतवणूक रकमेवर व्याज सुरू आहे. पुन्हा कोल्हापुरात टोलवसुली करण्याची मानसिकता कंपनीची नव्हती. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वत: घोषणा करून हा प्रश्न निकाली काढल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.राज्यातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोलवसुली म्हणजे दिवसाढवळ्या होत असलेली लूटमार आहे. कोल्हापूरचा टोल हद्दपार केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकारी मंत्र्यांचे अभिनंदन. ‘टोल हटाव’साठी अन्य शहरांनीही कोल्हापूरकरांची प्रेरणा घ्यावी. आयआरबी कंपनीच्या खोक्याचे आता पंचगंगेत विसर्जन झाले आहे. ‘टोल रद्द’चे श्रेय कोणा एका व्यक्तीचे नसून कोल्हापूरकरांचे आहे.- प्रा. एन. डी. पाटील, टोलविरोधी आंदोलनाचे ज्येष्ठ नेतेराजर्षी शाहू महाराजांच्या भूमीत कोणीही, काहीही करावे हे चालणार नाही, हे सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या आंदोलनाने दाखवून दिले आहे. या आंदोलनात सर्वपक्षीय लोक सहभागी झाले. या पूर्वीच्या सरकारने दखल घेतली नाही. मात्र, या सरकारने हा प्रश्न मार्गी लावला. येथील जनतेने ‘क्या बढा, तो दम बढा’ हे दाखवून दिले आहे.- निवासराव साळोखे, निमंत्रक, टोलविरोधी कृती समितीशासन ‘आयआरबी’ला ३३६ कोटी रुपये देणार ‘आयआरबी’ कंपनीला महापालिकेचा १२५ कोटींचा भूखंड आणि ३३६ कोटी रुपये शासन देणार आहे. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘टोल रद्द’ची घोषणा केली. सभागृहातील घोषणा म्हणजे कायद्याचे स्वरूप असते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा ही अधिकृत आहे. येत्या तीन दिवसांत नगरविकास विभाग रीतसर अंतिम अधिसूचना काढेल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मंत्री पाटील म्हणाले, टोल रद्द केल्यानंतर आयआरबी कंपनीला किती पैसे द्यायचे, यासंबंधी चर्चा झाली आहे. आयआरबी कंपनीचे अधिकारी, रस्ते विकास महामहामंडळ यांच्याशी झालेल्या बैठकीत चर्चेत ४६१ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, टेंबलाईवाडीतील १२५ कोटी रुपयांचा भूखंड देऊन उर्वरित ३३६ कोटी रुपये शासन रस्ते विकास महामंडळाकरवी आयआरबीला देईल. हे पैसे देताना कोल्हापूर शहरातील जनतेवर कोणत्याही स्वरूपाचा अतिरिक्त करांचा बोजा टाकण्यात येणार नाही. त्यामुळे आता कायमचा टोल हद्दपार झाला आहे.