शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

टोलबंदी राज्य शासनाला भोवणार; हायकोर्टाने फटकारले

By admin | Updated: June 12, 2015 04:17 IST

लहान वाहनांना टोलच्या विळख्यातून काढणे राज्य शासनाला भोवण्याची चिन्हे आहेत. कारण गुरुवारी उच्च न्यायालयाने राज्य शासनाला लहान

मुंबई : लहान वाहनांना टोलच्या विळख्यातून काढणे राज्य शासनाला भोवण्याची चिन्हे आहेत. कारण गुरुवारी उच्च न्यायालयाने राज्य शासनाला लहान वाहनांच्या टोल बंदीतून कसा जनहितार्थ साध्य होतो, याचा खुलासा करून या टोलमुक्तीचा पुनर्विचार करा, असे आदेश दिले आहेत. एवढेच नव्हेतर, टोलबंदी केल्यानंतर योजना राबवण्यासाठी पैसा कोठून आणणार आहात, असेही न्यायालयाने शासनाला फटकारले आहे. टोलमुक्तीचा पुनर्विचार न केल्यास यासाठी न्यायालयच आदेश देईल, असेही मुख्य न्यायाधीश मोहित शहा व न्या. अनिल मेनन यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे. गेल्या महिन्यात शासनाने लहान वाहनांना टोलमुक्त केले. त्याची अंमलबजावणी १ जूनपासून लागू झाली. याला सायन-पनवेल टोल कंपनीने याचिका दाखल करून आव्हान दिले. ही टोलमुक्ती रद्द करावी, अशी मागणी कंपनीने याचिकेत केली आहे.खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. अशी टोलमुक्ती केल्याने कोणता जनहितार्थ साध्य होतो? अशी विचारणा करतानाच टोलमुक्तीचा शासनाने पुनर्विचार करावा, असे आदेश न्यायालयाने दिले. (प्रतिनिधी)