शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल; पित्याच्या आत्महत्याप्रकरणी चार जणांना अटक
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

नव्या बांधकामांचा आज फैसला

By admin | Updated: May 5, 2015 01:30 IST

घनकचरा व्यवस्थापनाबाबत उचित कार्यवाही न करणाऱ्या केडीएमसीला फटकारताना नव्या बांधकामांना परवानगी देण्यात येऊ नये,

कल्याण : घनकचरा व्यवस्थापनाबाबत उचित कार्यवाही न करणाऱ्या केडीएमसीला फटकारताना नव्या बांधकामांना परवानगी देण्यात येऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. यावर महापालिकेतर्फे आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहिती देताना बांधकामांवरील स्थगिती उठविण्यासंदर्भात विनंतीअर्ज न्यायालयात सादर करण्यात आला आहे. मंगळवारी सुनावणीदरम्यान न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात दोन वर्षांपूर्वी उचित कार्यवाहीचे आदेश न्यायालयाने दिले होते. परंतु, याकडे दुर्लक्ष केल्याने १३ एप्रिल रोजीच्या सुनावणीत केडीएमसीला न्यायालयाने चांगलेच फटकारले होते. महापालिका क्षेत्रात कोणत्याही नवीन बांधकामांना परवानगी देण्यात येऊ नये, असे आदेश न्यायालयाने दिले होते. या आदेशाने जाग आलेल्या केडीएमसी प्रशासनाने अखेर कार्यवाहीला प्रारंभ केला असून कचरा डम्पिंगसंदर्भात कृती आराखडा तयार केला आहे. आधारवाडी येथील डम्पिंग बंद करण्याबरोबरच उंबर्डे येथे कचरा टाकण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, या ठिकाणी घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी १८ महिन्यांचा लागणारा कालावधी पाहता तोपर्यंत कचरा मांडा आणि बारावे येथील आरक्षित जागांवर तूर्तास टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याला जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दाखविल्याने त्या ठिकाणी कचरा टाकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष बाब म्हणजे उंबर्डे येथील प्रकल्पाबाबत निविदाही काढण्यात आली आहे. ही सर्व माहिती न्यायालयात दिली असून नवीन बांधकामांवर टाकलेली स्थगिती उठवावी, अशी विनंती महापालिका प्रशासनातर्फे केली आहे. (प्रतिनिधी)