शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

आज जायकवाडीत पाणी!

By admin | Updated: November 3, 2015 03:03 IST

नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समूहातून सोडलेल्या विसर्गापैकी नाशिकचे पाणी जायकवाडीकडे झेपावले आहे, तर अहमदनगर धरणसमूहातील पाणी अद्याप

औरंगाबाद/नाशिक/नगर : नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समूहातून सोडलेल्या विसर्गापैकी नाशिकचे पाणी जायकवाडीकडे झेपावले आहे, तर अहमदनगर धरणसमूहातील पाणी अद्याप प्रवरेत दाखल झाले नसून या पाण्यास जायकवाडीत दाखल होण्यास निर्धारित वेळेपेक्षा १६ तास उशीर होण्याची शक्यता आहे. नाशिकच्या गंगापूर धरणातून दुपारी पाणी सोडण्यास सुरुवात झाली, मात्र शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर संध्याकाळी धरणाचे दरवाजे पुन्हा बंद करण्यात आले. सोमवारी मुळा धरणातून ५,६८४ क्युसेस, निळवंडे २,०००, दारणा ४,०००, मुकणे १,००० व कडवा ३,००० क्युसेस असा विसर्ग करण्यात येत होता. यापैकी नाशिक जिल्ह्यातील दारणा, मुकणे व कडवा धरण समूहातून सोडलेले पाणी नांदुर मधमेश्वर प्रकल्पातून सोमवारी दुपारी १२ वाजता गोदावरीच्या पात्रात दाखल झाले. एकत्रितपणे नांदूर-मधमेश्वरमधून ४७६९ क्युसेस असा विसर्ग होत असल्याने गोदावरीतून पाणी जायकवाडीकडे झेपावले आहे. हे पाणी मंगळवारी दुपारी २ वाजेपर्यंत जायकवाडी धरणात येऊन धडकणार आहे, असे जायकवाडी धरण नियंत्रण कक्षातून अभियंता अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.मुळा धरणातून सोडलेले पाणी सोमवारीप्रवरेच्या पात्रात दाखल झाले आहे, तर निळवंडे धरणातून सोडलेले पाणी ओझर वेअरपर्यंत आले असून ओझर वेअर रिकामा केल्याने जोपर्यंत तो भरत नाही तोपर्यंत तेथून पुढे पाणी प्रवरेत येणार नसल्याचे प्रशासनाने सोमवारी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)नाशिकमध्ये पाणी सोडले, पाणी रोखले...नाशिकमध्ये रविवारी रात्रीच्या आंदोलनानंतर गंगापूर धरणातून पाणी सोडण्यास स्थगिती देण्यात आली. सोमवारी कडेकोट बंदोबस्तात दुपारी बारा वाजता पाचशे क्युसेक पाणी सोडण्यासाठी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. मात्र दुपारी सर्वपक्षीय कृती समितीने जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांना घेराव घातल्यानंतर साडेचार वाजता निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची जाणीव करून दिली व गंगापूर धरणातून पाणी सोडण्याबाबत शासन पातळीवर चर्चा सुरू असल्यामुळे पाणी सोडणे बंद करण्याची सूचना दिली. त्यानंतर सव्वापाच वाजता पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी गंगापूर धरणाचे दरवाजे पुन्हा बंद केले. प्रवरेत ओझर वेअर ते पैठणदरम्यान १६ बंधारे असून ते सर्व पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत. त्यामुळे ते भरल्यानंतरच पाणी पुढे जाईल. नगरमध्ये बंदोबस्तमुळा, भंडारदरा-निळवंडे धरणातून रविवारी रात्री जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आले. त्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्यांचे सहा प्लाटून तैनात असून एका तुकडीमध्ये शंभर पोलीस कर्मचारी आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्यास कलम १८८ अन्वये थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असे नगरचे पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी सांगितले.