शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
3
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
4
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
5
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
6
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
7
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
8
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
9
पतीशी भांडण करून दुसऱ्या खोलीत झोपली पत्नी; मध्यरात्री पतीला आली जाग, खोलीत डोकावून पाहताच... 
10
आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना भोजन मोफत 
11
'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी', विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा दिवसभरासाठी बहिष्कार
12
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? फक्त परतावा नका पाहू, 'या' १० गोष्टी तपासाच! अन्यथा पैसे जातील पाण्यात
13
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!
14
'त्या' रात्री काय झालं? पतीला कसं मारलं? बॉयफ्रेंडसोबत पकडल्या गेलेल्या ९ मुलांच्या आईने 'असा' केला गुन्हा कबूल! 
15
कॉलर पकडली, फरफटत नेलं, बेदम मारलं; भाजपा नेत्याच्या समर्थकांची आयुक्तांना मारहाण
16
'आभाळमाया'तील चिंगीला असा मिळाला 'बाजीराव मस्तानी', सेटवर संजय भन्साळी चिडले तेव्हा...
17
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
18
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
19
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
20
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 

आज जायकवाडीत पाणी!

By admin | Updated: November 3, 2015 03:03 IST

नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समूहातून सोडलेल्या विसर्गापैकी नाशिकचे पाणी जायकवाडीकडे झेपावले आहे, तर अहमदनगर धरणसमूहातील पाणी अद्याप

औरंगाबाद/नाशिक/नगर : नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समूहातून सोडलेल्या विसर्गापैकी नाशिकचे पाणी जायकवाडीकडे झेपावले आहे, तर अहमदनगर धरणसमूहातील पाणी अद्याप प्रवरेत दाखल झाले नसून या पाण्यास जायकवाडीत दाखल होण्यास निर्धारित वेळेपेक्षा १६ तास उशीर होण्याची शक्यता आहे. नाशिकच्या गंगापूर धरणातून दुपारी पाणी सोडण्यास सुरुवात झाली, मात्र शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर संध्याकाळी धरणाचे दरवाजे पुन्हा बंद करण्यात आले. सोमवारी मुळा धरणातून ५,६८४ क्युसेस, निळवंडे २,०००, दारणा ४,०००, मुकणे १,००० व कडवा ३,००० क्युसेस असा विसर्ग करण्यात येत होता. यापैकी नाशिक जिल्ह्यातील दारणा, मुकणे व कडवा धरण समूहातून सोडलेले पाणी नांदुर मधमेश्वर प्रकल्पातून सोमवारी दुपारी १२ वाजता गोदावरीच्या पात्रात दाखल झाले. एकत्रितपणे नांदूर-मधमेश्वरमधून ४७६९ क्युसेस असा विसर्ग होत असल्याने गोदावरीतून पाणी जायकवाडीकडे झेपावले आहे. हे पाणी मंगळवारी दुपारी २ वाजेपर्यंत जायकवाडी धरणात येऊन धडकणार आहे, असे जायकवाडी धरण नियंत्रण कक्षातून अभियंता अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.मुळा धरणातून सोडलेले पाणी सोमवारीप्रवरेच्या पात्रात दाखल झाले आहे, तर निळवंडे धरणातून सोडलेले पाणी ओझर वेअरपर्यंत आले असून ओझर वेअर रिकामा केल्याने जोपर्यंत तो भरत नाही तोपर्यंत तेथून पुढे पाणी प्रवरेत येणार नसल्याचे प्रशासनाने सोमवारी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)नाशिकमध्ये पाणी सोडले, पाणी रोखले...नाशिकमध्ये रविवारी रात्रीच्या आंदोलनानंतर गंगापूर धरणातून पाणी सोडण्यास स्थगिती देण्यात आली. सोमवारी कडेकोट बंदोबस्तात दुपारी बारा वाजता पाचशे क्युसेक पाणी सोडण्यासाठी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. मात्र दुपारी सर्वपक्षीय कृती समितीने जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांना घेराव घातल्यानंतर साडेचार वाजता निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची जाणीव करून दिली व गंगापूर धरणातून पाणी सोडण्याबाबत शासन पातळीवर चर्चा सुरू असल्यामुळे पाणी सोडणे बंद करण्याची सूचना दिली. त्यानंतर सव्वापाच वाजता पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी गंगापूर धरणाचे दरवाजे पुन्हा बंद केले. प्रवरेत ओझर वेअर ते पैठणदरम्यान १६ बंधारे असून ते सर्व पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत. त्यामुळे ते भरल्यानंतरच पाणी पुढे जाईल. नगरमध्ये बंदोबस्तमुळा, भंडारदरा-निळवंडे धरणातून रविवारी रात्री जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आले. त्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्यांचे सहा प्लाटून तैनात असून एका तुकडीमध्ये शंभर पोलीस कर्मचारी आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्यास कलम १८८ अन्वये थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असे नगरचे पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी सांगितले.