शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
2
एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 
3
एन चंद्रशेखरन यांच्या हाती पुन्हा टाटा सन्सची धुरा; IPO ची वाट पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका
4
वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..."
5
नोकरी सुरू होताच १५,००० रुपये तुमच्या खात्यात! मोदी सरकारने आणली 'ही' खास योजना, कंपनीलाही मिळेल फायदा!
6
दिल्लीतील बनावट कॉल सेंटरवर छापा, 'अशा' प्रकारे परदेशातून कमावलेले १०० कोटी!
7
माजी आमदाराची मुलगी अन् पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा रहस्यमय अंत; मृत्यूपूर्वीचा Video आला, मग...
8
Anil Ambani ED: अनिल अंबानींना ED नं चौकशीसाठी बोलावलं, १७ हजार कोटींच्या लोन फ्रॉड केसमध्ये टाकलेले छापे
9
ग्रीन टी, ब्लॅक टी सोडा... आता 'बनाना टी' एकदा प्या; स्ट्रेसला कराल बाय-बाय, हाडं होतील मजबूत
10
Stock Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; Sensex १७० अंकांची घसरण, FMCG Stocks मध्ये मोठी खरेदी
11
ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑईल घाबरली, रशियाकडून तेल खरेदी केली बंद; रिलायन्स मात्र...
12
ऑनलाईन गेममध्ये पैसे जिंकले, पार्टीसाठी बाहेर पडले अन्...; ५ तरुणांसोबत घडलं आक्रित
13
"तिने आमचं घर तोडलं असं लोक म्हणाले, पण...", RJ महावशसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलला युजवेंद्र चहल
14
Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन
15
धुळ्याची लेक मृणाल ठाकूरचा पहिलाच मराठी सिनेमा, 'या' अभिनेत्यासोबत केलेला रोमान्स
16
पती पत्नीसाठी बेस्ट आहे Post Office ची 'ही' स्कीम; ५ वर्षांत जमवू शकता १३ लाख रुपये, जाणून घ्या
17
नवऱ्याला सोडून पुतण्यासोबत लग्न, आता पुन्हा गावात येऊन पहिल्या पतीला दिलं थेट आव्हान! म्हणाली...
18
भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले
19
खुर्चीवरुन कोसळला अन्...; ३० वर्षीय डिलिव्हरी बॉयचा हार्ट अटॅकने मृत्यू, २ मुली झाल्या पोरक्या
20
मृत मुलाला जिवंत करण्यासाठी आईची धडपड; कधी CPR तर कधी ऑक्सिजन दिला, हृदयद्रावक Video व्हायरल

अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया आजपासून

By admin | Updated: July 12, 2014 23:41 IST

प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशाची प्रक्रिया रविवारपासून सुरू होत आहे.

भुजबळांची ग्वाही : उड्डाण पुलाच्या कार्यक्रमाला दोन मंत्र्यांसह दोन्ही खासदारांची दांडीगोंदिया : सध्या गोंदिया जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यभर पावसाअभावी बिकट परिस्थिती आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण अर्थव्यवस्थातच कोलमडत आहे. अशा परिस्थितीत केंद्राने तर मदत द्यावीच, पण नाही दिली तरी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी राहील, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली.गोंदियातील बहुप्रतीक्षित रेल्वे उड्डाणपुलाच्या लोकार्पणप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी आ.राजेंद्र जैन, आ.गोपालदास अग्रवाल, आ.डॉ.खुशाल बोपचे, आ.रामरतन राऊत, नगराध्यक्ष सुशीला भालेराव, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी. शिंदे उपस्थित होते. पंचायत समिती सभापती सरिता अंबुले, उपसभापती चमन बिसेन, सा.बां. विभागाचे कार्यकारी अभियंता के.पी. जनबंधू आदी प्रामुख्याने उपस्थित होते.गड्डाटोली भागातील पुलाच्या एका टोकावर फित कापून लोकार्पण केल्यानंतर आंबेडकर चौकानजिक उभारण्यात आलेल्या मंडपात इतर कार्यक्रम पार पडला. तत्पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला ना. भुजबळ यांच्या हस्ते हारार्पण करण्यात आला.यावेळी बोलताना ना.भुजबळ म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे पहिल्यांदाच असा रेल्वे उड्डाणपूल बनविण्यात आला आहे. यापूर्वी रेल्वेचे सर्व पूल रेल्वे विभागानेच बनविले आहे असे सांगून त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे विशेष कौतुक केले. हा पूल जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. ३५ कोटी रुपये केंद्र शासन व १६ कोटी रुपये राज्य सरकारद्वारा देऊन या आंतरराज्यीय पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यासाठी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रात विशेष प्रयत्न केल्याचा उल्लेखही त्यांनी केला. गोंदिया जिल्ह्यातील विकासकामांकरिता २६८ कोटी रुपये निधीतून ५५ कामे पूर्ण झाली असून १३४ कामे सुरू असल्याची माहिती ना.भुजबळ यांनी दिली. सुरूवातीला आ.राजेंद्र जैन, आ.गोपालदास अग्रवाल यांनी आपल्या भाषणात शहरात पुढील काळात येऊ होऊ घातलेल्या कामांची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री अनिल देशमुख, रोहयोमंत्री नितीन राऊत, खा.प्रफुल्ल पटेल आणि नवनिर्वाचित खा. नाना पटोले हे उपस्थित राहणार होते. त्यांची नावेही कार्यक्रम पत्रिकेत टाकण्यात आली होती. मात्र त्यांच्यापैकी कुणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे हा उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय होता. प्रास्ताविक सा.बां.विभागाचे मुख्य अभियंता सगणे यांनी तर संचालन अपूर्व अग्रवाल व श्रीमती देशपांडे यांनी केले. आभार कार्य.अभियंता के.पी. जनबंधू यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी)