शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
2
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
3
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
4
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
6
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
7
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
8
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
9
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
10
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
11
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
12
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
13
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
14
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
15
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
16
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
17
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
18
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
19
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
20
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?

तक्रारींसाठी रेल्वे प्रवाशांचा ‘टिवटिवाट’

By admin | Updated: June 27, 2017 14:20 IST

तक्रारींसाठी रेल्वे प्रवाशांनी ट्विटरचा प्रभावीपणे वापर सुरू केला आहे.

ऑनलाइन लोकमत/ संतोष हिरेमठ

औरंगाबाद, दि. 27-  रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफॉर्म, स्वच्छतागृह, बोगींमध्ये अस्वच्छता आणि इतर सोयी-सुविधांच्या अभावामुळे रेल्वे प्रवास अवघड होतो. काही वर्षांपूर्वी या समस्यांच्या तक्रारींसाठी कागदोपत्री पत्रव्यवहार करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यात बराच वेळ जात असल्याने शक्यतो प्रवासी त्या भानगडीत पडत नव्हते. परंतु गेल्या काही वर्षात तक्रारींसाठी रेल्वे प्रवाशांनी ट्विटरचा प्रभावीपणे वापर सुरू केला आहे. त्यातून महिनो-न्-महिने न सुटणाऱ्या समस्या काही वेळेत निकाली लागण्यास मदत होत आहे. 
 
सोशल मीडियाचा वापर आज केवळ स्वत:ची छायाचित्रे टाकण्या पुरताच राहिलेला नाही. या माध्यमाचा वापर करून सकारात्मक बदल घडविला जात आहे. काही महिन्यांपूर्वी निवडणुकांच्या निकालाने सोशल मीडियाचे महत्त्व समोर आले होते. त्याप्रमाणे आता प्रत्येक क्षेत्रातही त्याचा वापर वाढत आहे. रेल्वे प्रवासीही त्यामध्ये मागे नाही. सर्वसामान्यांना किफायतशीर प्रवासासाठी रेल्वेचा मोठा आधार मिळतो. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. प्रवासादरम्यान अनेकदा गैरसोयींना सामोरे जावे लागते. अशावेळी सोशल मीडियामुळे ऐन प्रवासातही या समस्या सहन करण्याऐवजी त्यास वाचा फोडणे शक्य झाले आहे.
 रेल्वे प्रवासात भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी ‘ट्विटरची मदत घेण्याकडे अलीकडे प्रवाशांचा कल वाढत आहे. आजघडीला प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहेत. त्यामुळे या माध्यमाचा प्रभावीपणे वापर करून रेल्वेच्या समस्या अधिकाऱ्यांपासून थेट रेल्वेमंत्र्यांपर्यंत पोहोचविल्या जात आहेत. यातून प्रवाशांच्या अडचणींची तात्काळ दखल घेतली जाते. त्यामुळे समस्या, अडचणी काही वेळेतच मार्गी लागतात. समस्यांबरोबर नवीन रेल्वे सोडणे, बोगी वाढविणे, रेल्वेचा विस्तार करणे अशा विविध मागण्याही टिष्ट्वटरवरून केल्या जात आहे. त्यास रेल्वे अधिकाऱ्यांकडून प्रतिदास मिळून त्यासंदर्भातील उत्तर दिले जातात.
 
रेल्वे प्रवाशांना टिष्ट्वटरच्या माध्यमातून कशी मदत मिळाली, याची काही उदाहरणे.
ट्विटनंतर निघाले चोकअप
औरंगाबादेतील रेल्वेस्टेशनवर २८ नोव्हेंबर २०१६ रोजी विश्रामगृहातील अस्वच्छ आणि तुंबलेल्या स्वच्छतागृहाच्या तक्रारीकडे कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे प्रवाशाने या प्रकाराची थेट रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार केली. या तक्रारीची रेल्वे मंत्रालयाने गंभीर दखल घेतल्याने स्थानिक अधिकारी-कर्मचाºयांची चांगलीच धावपळ उडाली. अवघ्या काही वेळत युद्धपातळीवर स्वच्छतागृहाची दुरुस्ती करण्यात आली.
 
रेल्वेस्टेशनवर स्वच्छतेकडे दुर्लक्ष
रेल्वेस्टेशनवरील स्वच्छतेकडे सहा महिन्यांपासून दुर्लक्ष होत असल्याची तक्रार ८ जून रोजी ट्विटरवरून थेट रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे करण्यात आली. रमेशचंद्रा झा यांनी ट्विटद्वारे ही तक्रार केली. रेल्वेस्टेशनवरील अस्वछतेचे छायाचित्र काढून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना ट्विटरवरून पाठविण्यात आले. या तक्रारीची दखल घेत रेल्वेमंत्रालयाने यासंदर्भात ‘दमरे’च्या नांदेड विभागास तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर  औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरील स्वच्छता विभागाला स्वच्छतेची सूचना करण्यात आली.
 
अधिक दराने जेवण
२० जून रोजी तपोवन एक्स्प्रेसमधून रक्षित मेहता हे प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान त्यांच्या हाती पेंट्री कारमधील जेवणाचे दरपत्रक लागले. या दरपत्रकातील सर्वच खाद्यपदार्थांचे दर हे नियमित दरापेक्षा अधिक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ‘आयआरसीटीसी’च्या नियमांकडे दुर्लक्ष करून हे दरपत्रक तयार करण्यात आले होते. याविषयी शंका आल्याने त्यांनी ट्विटरवरुन  दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या व्यवस्थापकांकडे (डीआरएम) तक्रार केली. डीआरएम ए. के. सिन्हा यांनी तक्रारीची दखल घेत पेंट्री कार चालकावर पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले.