शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

तक्रारींसाठी रेल्वे प्रवाशांचा ‘टिवटिवाट’

By admin | Updated: June 27, 2017 14:20 IST

तक्रारींसाठी रेल्वे प्रवाशांनी ट्विटरचा प्रभावीपणे वापर सुरू केला आहे.

ऑनलाइन लोकमत/ संतोष हिरेमठ

औरंगाबाद, दि. 27-  रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफॉर्म, स्वच्छतागृह, बोगींमध्ये अस्वच्छता आणि इतर सोयी-सुविधांच्या अभावामुळे रेल्वे प्रवास अवघड होतो. काही वर्षांपूर्वी या समस्यांच्या तक्रारींसाठी कागदोपत्री पत्रव्यवहार करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यात बराच वेळ जात असल्याने शक्यतो प्रवासी त्या भानगडीत पडत नव्हते. परंतु गेल्या काही वर्षात तक्रारींसाठी रेल्वे प्रवाशांनी ट्विटरचा प्रभावीपणे वापर सुरू केला आहे. त्यातून महिनो-न्-महिने न सुटणाऱ्या समस्या काही वेळेत निकाली लागण्यास मदत होत आहे. 
 
सोशल मीडियाचा वापर आज केवळ स्वत:ची छायाचित्रे टाकण्या पुरताच राहिलेला नाही. या माध्यमाचा वापर करून सकारात्मक बदल घडविला जात आहे. काही महिन्यांपूर्वी निवडणुकांच्या निकालाने सोशल मीडियाचे महत्त्व समोर आले होते. त्याप्रमाणे आता प्रत्येक क्षेत्रातही त्याचा वापर वाढत आहे. रेल्वे प्रवासीही त्यामध्ये मागे नाही. सर्वसामान्यांना किफायतशीर प्रवासासाठी रेल्वेचा मोठा आधार मिळतो. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. प्रवासादरम्यान अनेकदा गैरसोयींना सामोरे जावे लागते. अशावेळी सोशल मीडियामुळे ऐन प्रवासातही या समस्या सहन करण्याऐवजी त्यास वाचा फोडणे शक्य झाले आहे.
 रेल्वे प्रवासात भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी ‘ट्विटरची मदत घेण्याकडे अलीकडे प्रवाशांचा कल वाढत आहे. आजघडीला प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहेत. त्यामुळे या माध्यमाचा प्रभावीपणे वापर करून रेल्वेच्या समस्या अधिकाऱ्यांपासून थेट रेल्वेमंत्र्यांपर्यंत पोहोचविल्या जात आहेत. यातून प्रवाशांच्या अडचणींची तात्काळ दखल घेतली जाते. त्यामुळे समस्या, अडचणी काही वेळेतच मार्गी लागतात. समस्यांबरोबर नवीन रेल्वे सोडणे, बोगी वाढविणे, रेल्वेचा विस्तार करणे अशा विविध मागण्याही टिष्ट्वटरवरून केल्या जात आहे. त्यास रेल्वे अधिकाऱ्यांकडून प्रतिदास मिळून त्यासंदर्भातील उत्तर दिले जातात.
 
रेल्वे प्रवाशांना टिष्ट्वटरच्या माध्यमातून कशी मदत मिळाली, याची काही उदाहरणे.
ट्विटनंतर निघाले चोकअप
औरंगाबादेतील रेल्वेस्टेशनवर २८ नोव्हेंबर २०१६ रोजी विश्रामगृहातील अस्वच्छ आणि तुंबलेल्या स्वच्छतागृहाच्या तक्रारीकडे कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे प्रवाशाने या प्रकाराची थेट रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार केली. या तक्रारीची रेल्वे मंत्रालयाने गंभीर दखल घेतल्याने स्थानिक अधिकारी-कर्मचाºयांची चांगलीच धावपळ उडाली. अवघ्या काही वेळत युद्धपातळीवर स्वच्छतागृहाची दुरुस्ती करण्यात आली.
 
रेल्वेस्टेशनवर स्वच्छतेकडे दुर्लक्ष
रेल्वेस्टेशनवरील स्वच्छतेकडे सहा महिन्यांपासून दुर्लक्ष होत असल्याची तक्रार ८ जून रोजी ट्विटरवरून थेट रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे करण्यात आली. रमेशचंद्रा झा यांनी ट्विटद्वारे ही तक्रार केली. रेल्वेस्टेशनवरील अस्वछतेचे छायाचित्र काढून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना ट्विटरवरून पाठविण्यात आले. या तक्रारीची दखल घेत रेल्वेमंत्रालयाने यासंदर्भात ‘दमरे’च्या नांदेड विभागास तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर  औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरील स्वच्छता विभागाला स्वच्छतेची सूचना करण्यात आली.
 
अधिक दराने जेवण
२० जून रोजी तपोवन एक्स्प्रेसमधून रक्षित मेहता हे प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान त्यांच्या हाती पेंट्री कारमधील जेवणाचे दरपत्रक लागले. या दरपत्रकातील सर्वच खाद्यपदार्थांचे दर हे नियमित दरापेक्षा अधिक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ‘आयआरसीटीसी’च्या नियमांकडे दुर्लक्ष करून हे दरपत्रक तयार करण्यात आले होते. याविषयी शंका आल्याने त्यांनी ट्विटरवरुन  दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या व्यवस्थापकांकडे (डीआरएम) तक्रार केली. डीआरएम ए. के. सिन्हा यांनी तक्रारीची दखल घेत पेंट्री कार चालकावर पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले.