शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

टायरअभावी १२ बस धूळखात

By admin | Updated: August 4, 2016 01:50 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या परिवहन सेवेच्या भोंगळ कारभारामुळे महिनाभरापासून सात बस टायरविना धूळखात आहेत

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या परिवहन सेवेच्या भोंगळ कारभारामुळे महिनाभरापासून सात बस टायरविना धूळखात आहेत. नवीन टायर खरेदी लालफितीत अडकल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. परिणामी, महिनाभरात सुमारे २५ लाखांचे उत्पन्न बुडाले आहे. जेएनएनयूआरएम योजनेतून मीरा-भार्इंदर महापालिकेस मिळालेल्या बसचे उद्घाटन गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. सध्या परिवहन सेवेच्या ताफ्यात ४४ बस आहेत. त्यात १० मिनी, तर ३४ मोठ्या आकाराच्या बस आहेत. टाटा मोटर्सकडून खरेदी केलेल्या या बस सध्या वॉरंटी काळात असल्या तरी टायरचा यात समावेश नाही. बहुतांश बस ६० हजार किलोमीटर धावल्या असून त्यांचे टायर झिजून खराब झाले आहेत, तर काही फुटले आहेत. परिवहन सेवा सध्या महापालिकाच चालवत असून टायरसह अन्य आवश्यक बाबींचा पुरवठा वेळेवर करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. परंतु, प्रशासनाची परिवहन सेवेबद्दलची अनास्था व ढिसाळ कारभार सातत्याने समोर येत आहे. यामुळे बसची दुरवस्था होऊन त्यांचे आयुष्य कमी होत आहे. शिवाय, पालिकेला आर्थिक तोटा सहन करावा लागून प्रवाशांना समाधानकारक सेवा देण्यात पालिका प्रशासन व सत्ताधारी अपयशी ठरत असल्याची टीका होत आहे. दीड महिन्यापासून नवीन टायर खरेदीअभावी सात बस प्लेझंट पार्क येथील आगारात धूळखात आहेत. यामध्ये तीन मिनी, तर चार मोठ्या आकाराच्या बसचा समावेश आहे. काही टायर काढून अन्य बसना लावून शक्य तेवढ्या जास्त बस सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या तातडीने मोठ्या बसचे सुमारे ३५ तर, मिनी बसचे २५ टायर तरी खरेदी करणे गरजेचे आहे. टायर पंक्चरचे कामही खर्चिक असून प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. सात बस महिनाभरापासून टायरअभावी बंद आहेत. महिन्याला सुमारे २५ लाखांच्या उत्पन्नावर पालिकेला पाणी सोडावे लागत आहे. (प्रतिनिधी)