शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेला सुटी देण्याची हीच वेळ - मुख्यमंत्री

By admin | Updated: February 11, 2017 05:19 IST

माझा विरोध शिवसेनेला नाही; मुंबई महापालिकेतील त्यांच्या कार्यपद्धतीला आहे. अनेक वर्षे सत्तेत राहिले की, पराकोटीची बेपर्वाई येते.

यदु जोशी, मुंबईमाझा विरोध शिवसेनेला नाही; मुंबई महापालिकेतील त्यांच्या कार्यपद्धतीला आहे. अनेक वर्षे सत्तेत राहिले की, पराकोटीची बेपर्वाई येते. आपण कसेही वागलो तरी आपले कोणी काही बिघडवू शकत नाही, अशी वृत्ती येते. अशा लोकांना सुटी देण्याची वेळ कधी ना कधी येते. ती नेमकी वेळ आता आली आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला सत्तेबाहेर काढण्याचे संकेत दिले.मराठी माणसाच्या नावावर बरीच वर्षे भावनिक राजकारण खेळले गेले. आता ते मराठी माणसाला नीट कळले आहे. मुंबई महाराष्ट्रापासून कधीही तुटूच शकत नाही, त्यामुळे भावनिक राजकारणाला यापढे थारा मिळणार नाही, असेही त्यांनी सांगितले....तर मंत्रिमंडळ बैठक खुली करण्याची तयारीपारदर्शकतेसाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विरोधी पक्षनेते, पत्रकार यांना बसू देण्याची घटनेमध्ये तरतूद असेल तर आपली पूर्ण तयारी आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. हार्दिक पटेलला बोलावून अंगावर शाल टाकल्याने गुजराती मते फुटणार नाहीत; पण त्यांची मराठी मते विचलित झाली आहेत, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी काढला.

प्रश्न : नेमक्या कोणत्या मुद्द्यावर मुंबईत युती तुटली? मुख्यमंत्री : पारदर्शकतेचा मुद्दा संयुक्त जाहीरनाम्यात टाकावा, अशी आमची भूमिका होती. ते आपल्याच महापालिकेच्या विरुद्ध जाईल, असे त्यांचे म्हणणे होते. मला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी युतीबाबत निर्णयाचे पूर्ण स्वातंत्र्य दिलेले होते. मी युतीसाठी पारदर्शकतेचा आग्रह धरला. त्यातूनच युती तुटली. प्रश्न : शंकराचार्य बसायचे त्या भाजपाच्या मंचावर आता गुंडाचार्य बसू लागलेत, या उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेचे काय?मुख्यमंत्री : आम्ही फार गुंड लोकांना घेतलेले नाही. पक्षाचा विस्तार झाला, पक्ष मोठा झाला की अनेक लोक येत असतात, पण आमच्यावर जे आरोप करतात त्यांच्या पक्षाची काय स्थिती आहे? प्रश्न : पंतप्रधान मोदींसोबत पप्पू कलानीचा फोटो असलेले पोस्टर व्हायरल झाले, त्याचे काय?मुख्यमंत्री : उल्हासनगरमध्ये ओमी कलानी आमच्यासोबत आहेत. तुम्ही जे पोस्टर म्हणता ना ते आमच्याविरुद्ध सुडो वॉर छेडलेल्यांनी बनविलेले आहेत. त्यासाठी त्यांनी खास टीम तयार केल्या आहेत. स्वत:च पोस्टर करून ते व्हायरल करीत आहेत. प्रश्न : उद्धव ठाकरे यांनी पूर्ण प्रचारात आपल्याला टार्गेट केले आहे? मुख्यमंत्री : त्यांच्यावर टीका करीत सुटणे हा माझा अजेंडा नाही. माझा अजेंडा पारदर्शकतेचा आहे. त्या अनुषंगाने घोटाळ्यावर मी बोलणारच. दुर्दैवाने ठाकरे यांच्याकडे सांगण्यासारखे फारसे काही नाही. प्रश्न : आपण मुंबईची तुलना पाटण्याशी केली हे आपल्याला योग्य वाटते? मुख्यमंत्री : तक्रार निवारण हा पारदर्शकतेचा पाया आहे. त्याबाबत मुंबई महापालिका आणि पाटण्याला या अहवालात समान गुण दिलेले आहेत. तिरुअनंतपुरम, हैदराबादसह अनेक शहरे आपल्या पुढे आहेत. मी तुलना केलेली नाही. पाटण्याला मुंबईच्या बरोबरीने आणले याबद्दल तर बिहारच्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले पाहिजे. प्रश्न : जिल्हा परिषदांत भाजपाचे अस्तित्व नगण्य आहे. आपण कोणते मुद्दे घेऊन जात आहात?मुख्यमंत्री : लोकांमध्ये सरकारबद्दल विश्वासाची भावना आहे. दुष्काळ निवारणासाठी सरकारने केलेले काम, जलयुक्त शिवार योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, महात्मा फुले जीवनदायी योजनेची वाढविलेली व्याप्ती, मागेल त्याला तळे, कृषी वीज पंपांचे दिलेले सर्वाधिक कनेक्शन, हजारो शाळा डिजिटल केल्या, महात्मा फुले जनआरोग्य योजनेत १२०० आजार समाविष्ट करून लाभार्थ्यांची संख्या दीडपट करणे, या आमच्या उपलब्धी आहेत. लोकांना या सरकारबद्दल असलेला भरवसा मला प्रत्येक सभांमधून जाणवतो.