शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
2
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
5
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
6
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
7
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
8
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
9
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
10
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
11
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
12
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
14
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
15
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
16
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
17
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
18
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
19
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
20
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

वेळ नदीला पूर

By admin | Updated: August 19, 2014 23:00 IST

गेल्या आठवडाभरापासून विश्रंती घेतलेल्या पावसाने मंगळावारी जिल्ह्यातील काही भागांत दमदार हजेरी लावली.

गेल्या आठवडाभरापासून विश्रंती घेतलेल्या पावसाने मंगळावारी जिल्ह्यातील काही भागांत दमदार हजेरी लावली. खेड, आंबेगाव तालुक्यांत काही भागात पाणीच पाणी असा चित्र निर्माण झाले होते. सातगाव पठार भागात वेळ नदीला पूर आला होता. तर पुरंदरवर रूसलेल्या पावसाने येथे 13.7 मि.मी.ची नोंद केली. पावसाने जिल्ह्यात एकीकडे असे चित्र असले तरी इंदापूरकरांवर शेतीला टँकरने पाणी देत असल्याचे विदारक चित्र आहे.
 
पेठ :  सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात आज दुपारी तीननंतर पावसाने अचानक दमदार हजेरी लावली. वेळ नदीला पूर येऊन पुराचे पाणी पेठ येथील गावातून जाणा:या पुणो-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर  असलेल्या ब्रिटिशकालीन पुलावरून या वेळ नदीचे पाणी बराच वेळ वाहत होते. कुरवंडी, कोल्हारवाडी, थुगाव, भावडी, कारेगाव व पेठ परिसरात हा पाऊस पडला. काही प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा झाला होता. गेले सात ते आठ दिवस पावसाने विश्रंती घेतली होती. शेतक:यांची बटाटा लागवड नुकतीच संपली आहे. शेतकरी थोडा तरी पाऊस पडावा ही अपेक्षा बाळगून होते. ती अपेक्षा आजच्या पावसाने पूर्ण केल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे.
सातगाव पठार भागात खरीप हंगामातील बटाटा पिकाच्या खुरपणीचे काम चालू आहे. मात्र दुपारनंतर अचानक पावसामुळे हे काम बंद झाले असून, या पावसाने शेतात पाणी साठून राहणार असल्याने खुरपणीची कामे खोळंबणार असल्याची शक्यता शेतक:यांनी वर्तविली. 
चाकण/ कडूस : खेड तालुक्यात चाकणकरांना अक्षरश: झोडपून काढले. सायंकाळी 5 वाजता धो धो पाऊस सुरु  झाला अन् सगळीकडे पाणीच पाणी करून टाकले . पुणो- नाशिक महामार्गावरून पावसाचे पाणी वाहत होते. येथील कोहिनूर सेंटर मधील तळघरातील आवारात पाणी घुसले होते. त्यामुळे दुकानदारांची चांगलीच तारांबळ उडाली . 
कडूस परिसरातील ओढे-नाले पाण्याने भरून वाहत होते. अचानक जोरदार आलेल्या पावसामुळे दोंदे येथील ओढय़ावरील पुलावरून पावसाचे पुराचे पाणी आल्यामुळे दोंदे येथील लक्ष्मण रोकडे (वय 52) वाहून गेल्याची घटना घडली आहे. दोंदे, कडूस, रानमळा आदी भागांत एक तास  हजेरी लावली. 
कडूस रस्त्यावरील ओढय़ावर पुराचे पाणी आल्यामुळे राजगुरुनगरकडून कडूसकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. सायंकाळी सहानंतर पाणी ओसरल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. (वार्ताहर)
 
वाहतूक ठप्प : दोंदे येथील सुकाळेवस्ती येथील ओढय़ावरील पुलावरून पुराचे पाणी वाहत होते. त्यामुळे कडूस गावाकडे जाणारी वाहतूक जवळपास तीन तास  खोळंबली होती.
 
पुरंदर  तालुक्यात 13.7 मिमी. 
 
सासवड : सासवडसह पुरंदरमध्ये दुपारी 1 ते 2 दरम्यान 13.7 मिमी. पाऊस पडला आहे. अजून दोन दिवस असे वातावरण राहण्याची शक्यता आहे. 
जून महिन्यापासून आतार्पयत 254.7 मिमी. पाऊस झाला असून, ऑगस्टच्या अखेरीस जून व जुलै महिन्याची सरासरी गाठली आहे.  जून ते ऑगस्टअखेर्पयत 35क् मिमी.र्पयतची पावसाची सरासरी आहे. वाटाणा, कांदा व पालेभाज्याचे बी महागाईचे घेऊन शेतात पेरणी केली ते उगवण्यासाठी पावसाची आवश्यकता होती. 
 
4गेल्या 15 दिवसांपासून 
पावसाने ओढ दिल्याने शेतकरीवर्गामध्ये चिंतेचे वातावरण होते. बाजरी, वाटाणा, कांदा व पालेभाज्या ही पिके पाऊस वेळेवर न पडल्याने घेता आली नाहीत. खरीप हंगाम वाया गेला. रब्बी हंगामात पुरेसा पाऊस झाला, तर शेतकरी  ज्वारी, गहू, कांदा, हरभरा, वाटाणा  व पालेभाज्या ही पिके घेता येतील.