शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

वेळ नदीला पूर

By admin | Updated: August 19, 2014 23:00 IST

गेल्या आठवडाभरापासून विश्रंती घेतलेल्या पावसाने मंगळावारी जिल्ह्यातील काही भागांत दमदार हजेरी लावली.

गेल्या आठवडाभरापासून विश्रंती घेतलेल्या पावसाने मंगळावारी जिल्ह्यातील काही भागांत दमदार हजेरी लावली. खेड, आंबेगाव तालुक्यांत काही भागात पाणीच पाणी असा चित्र निर्माण झाले होते. सातगाव पठार भागात वेळ नदीला पूर आला होता. तर पुरंदरवर रूसलेल्या पावसाने येथे 13.7 मि.मी.ची नोंद केली. पावसाने जिल्ह्यात एकीकडे असे चित्र असले तरी इंदापूरकरांवर शेतीला टँकरने पाणी देत असल्याचे विदारक चित्र आहे.
 
पेठ :  सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात आज दुपारी तीननंतर पावसाने अचानक दमदार हजेरी लावली. वेळ नदीला पूर येऊन पुराचे पाणी पेठ येथील गावातून जाणा:या पुणो-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर  असलेल्या ब्रिटिशकालीन पुलावरून या वेळ नदीचे पाणी बराच वेळ वाहत होते. कुरवंडी, कोल्हारवाडी, थुगाव, भावडी, कारेगाव व पेठ परिसरात हा पाऊस पडला. काही प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा झाला होता. गेले सात ते आठ दिवस पावसाने विश्रंती घेतली होती. शेतक:यांची बटाटा लागवड नुकतीच संपली आहे. शेतकरी थोडा तरी पाऊस पडावा ही अपेक्षा बाळगून होते. ती अपेक्षा आजच्या पावसाने पूर्ण केल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे.
सातगाव पठार भागात खरीप हंगामातील बटाटा पिकाच्या खुरपणीचे काम चालू आहे. मात्र दुपारनंतर अचानक पावसामुळे हे काम बंद झाले असून, या पावसाने शेतात पाणी साठून राहणार असल्याने खुरपणीची कामे खोळंबणार असल्याची शक्यता शेतक:यांनी वर्तविली. 
चाकण/ कडूस : खेड तालुक्यात चाकणकरांना अक्षरश: झोडपून काढले. सायंकाळी 5 वाजता धो धो पाऊस सुरु  झाला अन् सगळीकडे पाणीच पाणी करून टाकले . पुणो- नाशिक महामार्गावरून पावसाचे पाणी वाहत होते. येथील कोहिनूर सेंटर मधील तळघरातील आवारात पाणी घुसले होते. त्यामुळे दुकानदारांची चांगलीच तारांबळ उडाली . 
कडूस परिसरातील ओढे-नाले पाण्याने भरून वाहत होते. अचानक जोरदार आलेल्या पावसामुळे दोंदे येथील ओढय़ावरील पुलावरून पावसाचे पुराचे पाणी आल्यामुळे दोंदे येथील लक्ष्मण रोकडे (वय 52) वाहून गेल्याची घटना घडली आहे. दोंदे, कडूस, रानमळा आदी भागांत एक तास  हजेरी लावली. 
कडूस रस्त्यावरील ओढय़ावर पुराचे पाणी आल्यामुळे राजगुरुनगरकडून कडूसकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. सायंकाळी सहानंतर पाणी ओसरल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. (वार्ताहर)
 
वाहतूक ठप्प : दोंदे येथील सुकाळेवस्ती येथील ओढय़ावरील पुलावरून पुराचे पाणी वाहत होते. त्यामुळे कडूस गावाकडे जाणारी वाहतूक जवळपास तीन तास  खोळंबली होती.
 
पुरंदर  तालुक्यात 13.7 मिमी. 
 
सासवड : सासवडसह पुरंदरमध्ये दुपारी 1 ते 2 दरम्यान 13.7 मिमी. पाऊस पडला आहे. अजून दोन दिवस असे वातावरण राहण्याची शक्यता आहे. 
जून महिन्यापासून आतार्पयत 254.7 मिमी. पाऊस झाला असून, ऑगस्टच्या अखेरीस जून व जुलै महिन्याची सरासरी गाठली आहे.  जून ते ऑगस्टअखेर्पयत 35क् मिमी.र्पयतची पावसाची सरासरी आहे. वाटाणा, कांदा व पालेभाज्याचे बी महागाईचे घेऊन शेतात पेरणी केली ते उगवण्यासाठी पावसाची आवश्यकता होती. 
 
4गेल्या 15 दिवसांपासून 
पावसाने ओढ दिल्याने शेतकरीवर्गामध्ये चिंतेचे वातावरण होते. बाजरी, वाटाणा, कांदा व पालेभाज्या ही पिके पाऊस वेळेवर न पडल्याने घेता आली नाहीत. खरीप हंगाम वाया गेला. रब्बी हंगामात पुरेसा पाऊस झाला, तर शेतकरी  ज्वारी, गहू, कांदा, हरभरा, वाटाणा  व पालेभाज्या ही पिके घेता येतील.