शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

राष्ट्रवादाची भावना टिळकांनीच रुजविली

By admin | Updated: August 2, 2016 05:17 IST

काँग्रेसची स्थापना एतद्देशीयांच्या भावना इंग्रज सरकारपर्यंत सनदशीर मार्गाने पोहोचवण्यासाठी झाली होती.

पुणे : काँग्रेसची स्थापना एतद्देशीयांच्या भावना इंग्रज सरकारपर्यंत सनदशीर मार्गाने पोहोचवण्यासाठी झाली होती. तिला संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करण्याच्या मार्गावर लोकमान्य टिळकांनी आणले. देशातील सर्वसामान्यापर्यंत राष्ट्रवादाची भावना सर्वप्रथम त्यांनीच नेली, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केले. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारे लोकमान्य टिळक राष्ट्रीय सन्मान पारितोषिक पवार यांना प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, महापौर प्रशांत जगताप,उपहापौर मुकारी अलगुडे, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे आदी या वेळी उपस्थित होते.पवार म्हणाले, लोकमान्यांच्या काळात देश अखंड नव्हता. राज्ये होती, त्यांना राजे होते. लोकमान्यांनीच सर्वप्रथम अखंड हिंदुस्थान ही भावना निर्माण केली. त्याला राष्ट्रवादाची जोड दिली. आपल्याला त्यांची स्वराज्याची घोषणा आठवते, मात्र स्वराज्याबरोबरच ते सुराज्याचाही विचार करीत होते. शेती, पाणी, उद्योग, जोडधंदे, उपेक्षितांना न्याय याबद्दल आपण आज बोलत असतो, पण लोकमान्यांनी त्या काळात या सर्व गोष्टींचा विचार केला होता. लोकांचे जीवन समृद्ध कसे होईल याच ध्यासाने ते काम करीत. शिंदे यांनी भाषणात महात्मा गांधी, नेहरू यांची शेतीबाबतची भूमिका पवार यांनी पुढे नेली, असे सांगितले. देशस्तरावर कृषीक्षेत्रात केलेले त्यांनी काम फार मोठे आहे. आज देश अन्नधान्यांची निर्यात करतो आहे त्याचे श्रेय त्यांनाच आहे. (प्रतिनिधी)पुरस्काराच्या १ लाख रूपयांमध्ये स्वत:चे ४ लाख रूपये जमा करून ही ५ लाख रूपयांची रक्कम पाषाण येथील डॉ. आशुतोष रेगे संचलित ‘संतुलन’ या दगडखाण कामगारांच्या मुलांसाठी गेली काही वर्षे शाळा चालविणाऱ्या संस्थेस देत असल्याचे पवार यांनी जाहीर केले. महापौर जगताप यांच्याकडे त्याचा धनादेश देत ही रक्कम संस्थेकडे द्यावी, असे त्यांनी सांगितले.