शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादाची भावना टिळकांनीच रुजविली

By admin | Updated: August 2, 2016 05:17 IST

काँग्रेसची स्थापना एतद्देशीयांच्या भावना इंग्रज सरकारपर्यंत सनदशीर मार्गाने पोहोचवण्यासाठी झाली होती.

पुणे : काँग्रेसची स्थापना एतद्देशीयांच्या भावना इंग्रज सरकारपर्यंत सनदशीर मार्गाने पोहोचवण्यासाठी झाली होती. तिला संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करण्याच्या मार्गावर लोकमान्य टिळकांनी आणले. देशातील सर्वसामान्यापर्यंत राष्ट्रवादाची भावना सर्वप्रथम त्यांनीच नेली, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केले. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारे लोकमान्य टिळक राष्ट्रीय सन्मान पारितोषिक पवार यांना प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, महापौर प्रशांत जगताप,उपहापौर मुकारी अलगुडे, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे आदी या वेळी उपस्थित होते.पवार म्हणाले, लोकमान्यांच्या काळात देश अखंड नव्हता. राज्ये होती, त्यांना राजे होते. लोकमान्यांनीच सर्वप्रथम अखंड हिंदुस्थान ही भावना निर्माण केली. त्याला राष्ट्रवादाची जोड दिली. आपल्याला त्यांची स्वराज्याची घोषणा आठवते, मात्र स्वराज्याबरोबरच ते सुराज्याचाही विचार करीत होते. शेती, पाणी, उद्योग, जोडधंदे, उपेक्षितांना न्याय याबद्दल आपण आज बोलत असतो, पण लोकमान्यांनी त्या काळात या सर्व गोष्टींचा विचार केला होता. लोकांचे जीवन समृद्ध कसे होईल याच ध्यासाने ते काम करीत. शिंदे यांनी भाषणात महात्मा गांधी, नेहरू यांची शेतीबाबतची भूमिका पवार यांनी पुढे नेली, असे सांगितले. देशस्तरावर कृषीक्षेत्रात केलेले त्यांनी काम फार मोठे आहे. आज देश अन्नधान्यांची निर्यात करतो आहे त्याचे श्रेय त्यांनाच आहे. (प्रतिनिधी)पुरस्काराच्या १ लाख रूपयांमध्ये स्वत:चे ४ लाख रूपये जमा करून ही ५ लाख रूपयांची रक्कम पाषाण येथील डॉ. आशुतोष रेगे संचलित ‘संतुलन’ या दगडखाण कामगारांच्या मुलांसाठी गेली काही वर्षे शाळा चालविणाऱ्या संस्थेस देत असल्याचे पवार यांनी जाहीर केले. महापौर जगताप यांच्याकडे त्याचा धनादेश देत ही रक्कम संस्थेकडे द्यावी, असे त्यांनी सांगितले.