शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
4
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
5
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
6
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
7
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
8
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
9
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
10
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
11
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
12
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
13
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
14
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
15
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
16
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
17
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
18
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
19
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
20
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

मुंगळे आहेत, तोवर हे सरकार टिकेल!

By admin | Updated: October 15, 2015 03:10 IST

गुळाच्या ढेपेला जसा मुंगळा चिटकतो, तसा राज्यातील भाजपा सरकारला चिटकून बसलेला मुंगळा जात नाही, तोपर्यंत सरकार टिकेल पण चालेल की नाही याची खात्री देता येत नाही

मुंबई : गुळाच्या ढेपेला जसा मुंगळा चिटकतो, तसा राज्यातील भाजपा सरकारला चिटकून बसलेला मुंगळा जात नाही, तोपर्यंत सरकार टिकेल पण चालेल की नाही याची खात्री देता येत नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेला लगावला. त्याचवेळी या सरकारमध्ये राष्ट्रवादी कदापि सहभागी होणार नाही, हेही स्पष्ट केले. राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि फडणवीस सरकारची निष्क्रियता यावर माहिती देण्यासाठी शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. दुष्काळी भागातील जनतेला सरकारने वाऱ्यावर सोडल्याची टीका करून ते म्हणाले, दुष्काळ निवारणासाठी सरकारने केलेल्या योजना केवळ कागदावरच आहेत. दुष्काळी भागातील एकाही विद्यार्थ्याचे शुल्क राज्य सरकारने भरलेले नाही. ३४ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला होता. पण अजून त्यांना पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही. दुष्काळी भागातील लोकांसाठी अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत काढलेले आदेश अद्याप कागदावरच असल्याचे त्यांनी सांगितले.इंदू मिलच्या कार्यक्रमात सरकारने विरोधकांना बोलावले नाही. वास्तविक विधिमंडळाच्या सदस्यांना सरकारी कार्यक्रमांना बोलावण्याचा प्रघात आहे. मात्र या सरकारला ते महत्त्वाचे वाटले नसावे, असा चिमटाही पवारांनी घेतला. (विशेष प्रतिनिधी)>>भाजपाने सरकारमधून बाहेर पडावे, असा सल्ला शिवसेनेने दिला आहे. त्यावर भाष्य करताना पवार म्हणाले, ज्यांनी सरकार स्थापन केले तेच त्यामधून कसे काय बाहेर पडतील? जे पाठीमागून गेले, त्यांना कारभार पटत नसेल, तर त्यांनी बाहेर पडावे. पण तसे होईल, असे वाटत नाही. स्वाभिमानी लोकांकडून सत्तेसाठी सोशिकपणा दाखवला जातो आहे. त्यामुळे तूर्त तरी कोणी सत्ता सोडेल, असे वाटत नाही, असे भाकीत त्यांनी व्यक्त केले. जर शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढलाच, तर आम्ही सरकारला पाठिंबा देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.