शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

मुंगळे आहेत, तोवर हे सरकार टिकेल!

By admin | Updated: October 15, 2015 03:10 IST

गुळाच्या ढेपेला जसा मुंगळा चिटकतो, तसा राज्यातील भाजपा सरकारला चिटकून बसलेला मुंगळा जात नाही, तोपर्यंत सरकार टिकेल पण चालेल की नाही याची खात्री देता येत नाही

मुंबई : गुळाच्या ढेपेला जसा मुंगळा चिटकतो, तसा राज्यातील भाजपा सरकारला चिटकून बसलेला मुंगळा जात नाही, तोपर्यंत सरकार टिकेल पण चालेल की नाही याची खात्री देता येत नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेला लगावला. त्याचवेळी या सरकारमध्ये राष्ट्रवादी कदापि सहभागी होणार नाही, हेही स्पष्ट केले. राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि फडणवीस सरकारची निष्क्रियता यावर माहिती देण्यासाठी शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. दुष्काळी भागातील जनतेला सरकारने वाऱ्यावर सोडल्याची टीका करून ते म्हणाले, दुष्काळ निवारणासाठी सरकारने केलेल्या योजना केवळ कागदावरच आहेत. दुष्काळी भागातील एकाही विद्यार्थ्याचे शुल्क राज्य सरकारने भरलेले नाही. ३४ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला होता. पण अजून त्यांना पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही. दुष्काळी भागातील लोकांसाठी अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत काढलेले आदेश अद्याप कागदावरच असल्याचे त्यांनी सांगितले.इंदू मिलच्या कार्यक्रमात सरकारने विरोधकांना बोलावले नाही. वास्तविक विधिमंडळाच्या सदस्यांना सरकारी कार्यक्रमांना बोलावण्याचा प्रघात आहे. मात्र या सरकारला ते महत्त्वाचे वाटले नसावे, असा चिमटाही पवारांनी घेतला. (विशेष प्रतिनिधी)>>भाजपाने सरकारमधून बाहेर पडावे, असा सल्ला शिवसेनेने दिला आहे. त्यावर भाष्य करताना पवार म्हणाले, ज्यांनी सरकार स्थापन केले तेच त्यामधून कसे काय बाहेर पडतील? जे पाठीमागून गेले, त्यांना कारभार पटत नसेल, तर त्यांनी बाहेर पडावे. पण तसे होईल, असे वाटत नाही. स्वाभिमानी लोकांकडून सत्तेसाठी सोशिकपणा दाखवला जातो आहे. त्यामुळे तूर्त तरी कोणी सत्ता सोडेल, असे वाटत नाही, असे भाकीत त्यांनी व्यक्त केले. जर शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढलाच, तर आम्ही सरकारला पाठिंबा देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.