शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

वाहकांच्या गळ्यात पुन्हा तिकिटांचा ट्रे

By admin | Updated: November 19, 2014 23:26 IST

रत्नागिरी विभाग : नऊ कोटींची तिकिटे शिल्लक

मेहरून नाकाडे - रत्नागिरी -राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे गेल्या तीन ते चार वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक्स तिकीट मशीनद्वारे (इटीआयएम) प्रवाशांना तिकिटेदेण्यात येत आहेत; परंतु रत्नागिरी विभागात नऊ कोटी १६ लाख ९४ हजार ६५१ रुपयांचा तिकीटसाठा शिल्लक राहिल्याने तो संपविण्यासाठी वाहकांच्या गळ्यात पुन्हा एकदा तिकिटांचा ट्रे आला आहे. महिनाभरात पाच कोटी ४५ लाख ४०० रुपयांची तिकिटे संपविण्यात आली.राज्य मार्ग परिवहन महामंडळानेही आता कात टाकण्यास प्रारंभ केला आहे. तिकीट आरक्षण संगणकीकृत केले आहे. इलेक्ट्रॉनिक्स तिकीट मशीनद्वारे शहरी व लांब फेऱ्यांच्या एस.टी.तून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिटांचे वितरण करण्यात येत होते.  या मशीनवरून तिकीट देणे वाहकांना सोपे होत असे. शिवाय इलेक्ट्रॉनिक्स मशीनमुळे प्रत्येक फेरीचा हिशेब लिहिण्याची कटकट संपली होती. मात्र, आता जुनी तिकिटे मोठ्या प्रमाणावर शिल्लक असल्याने एस.टी. पुन्हा चार वर्षे मागे गेली आहे. वाहकांच्या गळ्यात पुन्हा तिकिटांचा ट्रे देण्याचा निर्णय एस. टी. महामंडळाने घेतला.तिकीट ट्रेचा वापर सुरू झाला असून, त्यामुळे तिकिटे किती संपली, किती रुपयांची संपली, याचा सर्व हिशेब लिहून ठेवावा लागत आहे. मशीनचा वापर सुरू झाल्यानंतर हिशेबाची कटकट संपल्याने वाहकांनी समाधान व्यक्त केले होते, परंतु या मशीनचा वापर करण्यापूर्वी छपाई केलेला तिकीटसाठा संपविण्याचे आदेश प्रशासनाने प्रत्येक विभागाला दिले असून, सध्या वाहकांना इलेक्ट्रॉनिक्स मशीन वापरण्यास प्रशासनाने बंदी केली आहे.रत्नागिरी विभागातील नऊ कोटी १६ लाख ९४ हजार ६५१ रुपयांचा तिकीटसाठा शिल्लक राहिला होता. शिल्लक राहिलेला तिकिटांचा साठा खराब होऊ नये, शिवाय महामंडळाचा खर्च वाया जाऊ नये यासाठी पुन्हा एकदा तिकिटांचे वितरण सुरू करण्यात आले आहे. पाच कोटींचा साठा संपलाकेवळ दहा दिवसांसाठी लागणारा तिकीटसाठा शिल्लक ठेवून उर्वरित सर्व तिकिटे संपविण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. त्यानुसार वाहक सध्या तिकीट ट्रेमधील तिकिटे पंचिंग करून देत आहेत. सर्व आगारांतून आतापर्यंत पाच कोटी ४५ लाख ४०० रुपयांचा तिकीटसाठा संपविण्यात आला आहे.