शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

युती फुटीच्या उंबरठ्यावर

By admin | Published: September 22, 2014 2:43 AM

भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची २५ वर्षांपासूनची भगवी युती आता तुटण्याच्या उंबरठ्यावर आली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वापरली आक्रमक भाषा

जयशंकर गुप्त, नवी दिल्लीभारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची २५ वर्षांपासूनची भगवी युती आता तुटण्याच्या उंबरठ्यावर आली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वापरली आक्रमक भाषा आणि त्यानंतर नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत झालेली वरिष्ठ भाजपा नेत्यांची बैठक या घटनाक्रमानंतर ही युती जागावाटपावरून कधीही तुटेल, अशी स्थिती आल्याचे रात्री उशिरा स्पष्ट झाले. भाजपाच्या दिल्लीत झालेल्या बैठकीपूर्वी महाराष्ट्रातील अनेक भाजपा नेत्यांनी स्वबळावर महाराष्ट्रातील विधानसभेच्या सर्व जागा लढण्याचा आग्रह पक्षश्रेष्ठींकडे धरला होता. शिवसेना देऊ करीत असलेल्या ११९ जागांवर समझोता करण्यास भाजपा राजी नाही. जागावाटपाच्या बाबतीत दोन्ही पक्षांमधील कडवटपणा टोकाला गेल्यामुळे भाजपाची सगळी मदार आता मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर आहे. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक मंडळाची बैठक पार पडल्यानंतर मोदी आणि शहा यांनी १० मिनिटे स्वतंत्रपणे चर्चा केली. युती तोडून स्वतंत्रपणे लढल्यास कोणाचे किती नुकसान होईल आणि कोण किती फायद्यात राहील, याचा अंदाज घेणे भाजपाच्या गोटात अजूनही सुरू आहे. त्यासाठीच पक्षाध्यक्ष शहा यांनी महाराष्ट्रातील विभागीय संघटन प्रमुखांना दिल्लीत पाचारण केले आहे. त्यांच्याशी चर्चा होणे अपेक्षित आहे. भाजपाचा अधिकृत निर्णयही तोवर जाहीर केला जाणार नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले. युतीतील या दोन्ही मित्रपक्षांचे संबंध एकमेकांची उणीदुणी काढण्याच्या पातळीवर आले आहेत. पूर्वीच्या अनेक घटनांचे स्मरण परस्परांना करून दिले जात आहे. त्याचवेळी दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते एकच भाषा बोलत आहेत़ ती अशी, एकत्र लढलो तर सत्ता आमचीच आहे. स्वतंत्र लढल्याने दोघांचेही नुकसान होईल. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष एखादे पाऊल मागे घेण्याची शक्यता अजूनही आहे, असा भाजपातील सूत्रांचा दावा आहे. त्यानुसार ११९ पेक्षा दोन-चार अधिक जागा भाजपाच्या वाट्याला येऊ शकतात, अशी आशा दिल्लीत अजूनही शिल्लक आहे.