शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील तीन तरुण गेले इसिसच्या वाटेवर?

By admin | Updated: December 22, 2015 03:16 IST

दहशतवादी कारवायांनी अवघे जग त्रस्त असतानाच मुंबईतून बेपत्ता झालेले तीन तरुण दहशतवादाच्या आकर्षणातून स्थलांतरित झाले असण्याच्या शक्यतेने महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक हादरले आहे.

एटीएस हादरले : मध्य पूर्वेत गेल्याची शक्यता अद्याप धूसरडिप्पी वांकाणी,  मुंबईदहशतवादी कारवायांनी अवघे जग त्रस्त असतानाच मुंबईतून बेपत्ता झालेले तीन तरुण दहशतवादाच्या आकर्षणातून स्थलांतरित झाले असण्याच्या शक्यतेने महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक हादरले आहे. २३ ते २६ वयोगटातील हे तरुण मुंबईतील मालवणी भागातून बेपत्ता झाले आहेत. या तिघांचा ठावठिकाणा शोधण्यास आम्ही सुरुवात केली आहे, असे एटीएसच्या वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले. या तिघांनी देश सोडल्याचा पुरावा मात्र एटीएसकडे नाही. हे तिघे इसिसच्या वाटेवर असल्याच्या शक्यतेचाही तपास पोलीस करत आहेत. कॉल सेंटरमध्ये कामाला असलेला अयाझ सुलतान (२३) आणि आॅटोरिक्षा चालविणारा मोहसीन सय्यद (२६) व लिंबू विक्रेता वाजीद बशीर शेख (२५) हे तिघेही मालवणी भागातून बेपत्ता झाले आहेत. अयाझ हा ३० आॅक्टोबरपासून तर इतर मोहसीन व वाजीद हे दोघे १५ डिसेंबरपासून बेपत्ता आहेत. यांचा अतिरेकी कारवायांत सहभागी होण्याचा उद्देश असू शकतो, असा त्यांच्या कुटुंबीयांना संशय आहे. एकाच्या पत्नीने तिचा पती अतिरेकी संघटनेत सहभागी होण्यावर गेल्या दोन महिन्यांपासून भर देत असल्याचे सांगितल्याने एटीएसने चौकशी सुरू केली आहे. त्यांच्या बेपत्ता होण्याचा हेतू नेमका हाच होता याला आम्ही दुजोरा देऊ शकत नाही व त्यांचा ठावठिकाणाही सांगू शकत नाही, असे एटीएसमधील सूत्रांनी सांगितले. सर्व बाजूंनी तपास सुरूहे तिघेही देशाबाहेर गेलेले आहेत असा कोणताही पुरावा सध्या आमच्याकडे नाही. त्यांना शोधण्यासाठी आम्ही आमच्या तुकड्या कामाला लावल्या आहेत. जिहादी स्वरूपाचे कोणतेही काम करण्याचा त्यांचा हेतू होता का; हेही आम्ही तपासून बघत आहोत, असेही एटीएसच्या सूत्रांनी सांगितले. वाजीदने त्याचे वर्तन गेल्या दोन महिन्यांपासून बदलले होते, असे त्याची पत्नी व माझी बहीण फातिमाने आम्हाला सांगितले. तिने पोलिसांना सांगितले की एखाद्याने जिहादमध्ये कसे सहभागी व्हावे यावर तो बोलायचा. नंतर नंतर त्याने त्याच्या मित्रांसोबत जास्त वेळ घालवायला सुरुवात केली. तो घरी खूप कमी असायचा, असे फातिमाच्या भावाने सांगितले. वाजीद बेपत्ता झाल्याच्या दिवसापासून फातिमाने पतीचे घर का सोडले, असे विचारल्यानंतर तिचा भाऊ म्हणाला की, ‘‘भोवळ आल्यासारखे वाटल्यामुळे मी तिला माझ्या घणसोलीतील घरी आणले.’’वाजीदचे वडील बशीर म्हणाले की, वाजीद १५ डिसेंबरच्या रात्री एक वाजेपर्यंत परत न आल्यामुळे आम्ही तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली. दुपारी तीनच्या सुमारास तो घरातून आधारकार्डमध्ये काही दुरुस्त्या करायच्या असल्यामुळे अधिकाऱ्याला भेटायला जातो असे सांगून गेला. परंतु सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मला जवळच्याच विक्रेत्याचा वाजीद आला नव्हता व बीएमसीची मोठी धाड पडल्याचे सांगणारा फोन आला. आम्ही त्याच्याशी संपर्क साधण्याचा बराच प्रयत्न केला, परंतु त्याचा मोबाइल फोन घरीच होता. त्याच्या नावाने तर पासपोर्टही नाही, असेही ते म्हणाले.घरून दुकानावर जायचा व रात्री परतायचा अशी त्याची दैनंदिनी होती, असे वाजीदच्या शेजाऱ्याने सांगितले.मोहसिनचे वडील इब्राहिम यांनी सांगितले की त्याने सूरतमध्ये मित्राच्या लग्नाला जायचे आहे असे सांगून १५ डिसेंबर रोजी घर सोडले. तो २-३ दिवसांत येणार होता. दिवसाकाठी पाचवेळा नियमित प्रार्थना करणाऱ्या मोहसिनच्या वर्तनात कोणताही लक्षणीय बदल जाणवत नव्हता. त्याच्याकडे पासपोर्टही नव्हता.अयाज स्वभावाने साधासरळ. तो असल्या मार्गाने जाऊ शकत नाही. कुवैतमध्ये नोकरी मिळाल्याने व्हिसाच्या कामासाठी पुण्याला जायचे म्हणून ३० आॅक्टोबर रोजी त्याने घर सोडले. काम आटोपून परत येईल, असे तो म्हणाला होता, असे त्याची बहीण शैना यांनी सांगितले.>>>कोण हे तिघे?वाजिद 25धंदा : लिंबू विक्रेता शिक्षण : बी. कॉम. (दालमिया कॉलेज) : कुटुंबात सर्वात लहान. त्याला पाच बहिणी. त्या आई-वडिलांसोबत मालवणीतील एमएचबी कॉलनी गेट नंबर ८ येथे राहतात. दहा महिन्यांपूर्वीच त्याचे फातिमाशी लग्न. मूळचा कर्नाटकातील होसपेठचा.अयाझ सुल्तान 23धंदा : कॉल सेंटरमध्ये नोकरी शिक्षण : एस.वाय. बी. कॉमपर्यंत, त्याचे वडील पाकिस्तानी आणि आई भारतीय आहे. चौथीपर्यंत कुवैतमध्ये शिक्षण. त्याला दोन भाऊ आणि दोन बहिणी आहेत. दीड वर्षापासून मालवणीत भाड्याच्या घरात राहतात.मोहसिन 26धंदा : रिक्षाचालक शिक्षण : नववीत शाळा सोडली. त्याला चार बहिणी आणि भाऊ असून हे सर्व आई-वडिलांसोबत राहतात. त्याची पत्नी आणि दोन मुलेही त्याच्या आई-वडिलांकडे राहतात. मूळचा परभणीतील असून २००६ पासून म्हाडा कॉलनीत राहतो.