शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

बंधा-यात बुडून भावंडांसह तिघांचा मृत्यू, शनिवारपासून मुले होती बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2017 15:44 IST

शहरापासून काही अंतरावर असलेल्या कृषी विभागाच्या बंधा-यात पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडाल्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.

चिखलदरा (अमरावती), दि. 24 - शहरापासून काही अंतरावर असलेल्या कृषी विभागाच्या बंधा-यात पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडाल्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. तिघेही शनिवारपासून बेपत्ता होते. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. या घटनेने नजीकच्या मोथा गावात शोककळा पसरली आहे.राजेश राजाराम दहीकर (१७), अशोक प्यारेलाल भास्कर (८), प्रेम प्यारेलाल भास्कर (११) अशी मृतांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, शनिवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास तिघेही मोथा गावातील मखंजी रस्त्यावर कृषी विभागाने तयार केलेल्या बंधा-यात पोहण्यासाठी गेले. यातील दोघांना पाण्यात बुडताना पाहून तिस-याने उडी घेतली व त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना वाचवितानाच तोही बुडल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. अशोक व प्रेम हे दोघे भाऊ मोथा येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी होते. याप्रकरणी चिखलदरा पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.रात्रभर गावक-यांची शोधमोहीमशनिवारी दुपारी खेळण्यासाठी गेलेले तिघेही घरी परतले नाहीत. संध्याकाळपासून त्यांचा शोध सुरू झाला. नजीकच्या जंगलातही त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र, ते सापडले नाहीत. रविवारी पहाटे ६ वाजता मखंजी रस्त्यावरील बंधा-याजवळ कपडे, चपला आढळून आल्या. सकाळी ९ वाजता तिघांचे मृतदेह बंधा-यातून बाहेर काढण्यात आले. प्यारेलाल भास्कर यांना दोन, तर राजाराम दहीकर यांना एकुलता एक मुलगा होता. तिघांच्या अपघाती निधनाने मोथा गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.