शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

तीनवेळा सिग्नल तोडल्यास लायसन्स रद्द

By admin | Updated: June 5, 2014 23:15 IST

एखाद्या वाहन चालकाने तीन वेळा वाहतूक नियम मोडला तर त्याचा वाहन चालविण्याचा परवाना सहा महिन्यांसाठी रद्द करण्यात येईल.

गडकरी यांची घोषणा : मोटार वाहन कायद्यात बदल करणारनबिन सिन्हा : नवी दिल्लीएखाद्या वाहन चालकाने तीन वेळा वाहतूक नियम मोडला तर त्याचा वाहन चालविण्याचा परवाना सहा महिन्यांसाठी रद्द करण्यात येईल. त्यानंतरही वाहन चालकाने पुन्हा वाहतुकीचे नियम तोडले तर मात्र त्याचा परवाना कायमचा रद्द केला जाईल. यासाठी येत्या महिनाभरात मोटार वाहन विधेयकाचा मसुदा नव्याने तयार करण्यात येईल, असे केंद्रीय रस्ता परिवहन, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी जाहीर केले.केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाच्या पार्श्वभूमीवर मोटार वाहन कायद्यात बदल करून वाहतूक नियम तोडणार्‍यांविरुद्ध कठोरपणे वागण्याचा हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. गडकरी यांनी गुरुवारी ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आणि भारतासाठी आदर्श असा कायदा तयार करण्यासाठी अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स व सिंगापूरसह काही प्रमुख देशांमधील मोटार वाहन कायद्याचा अभ्यास करण्याची सूचना अधिकार्‍यांना दिली.यापुढे वाहतुकीचे नियम तोडणार्‍यांना केवळ दंड आकारून सोडले जाणार नाही. तर तीनवेळा सिग्नल तोडणार्‍यांविरुद्ध आता कठोर कारवाई केली जाईल. आम्ही त्यांचा वाहन चालविण्याचा परवाना सहा महिन्यांसाठी रद्द करू. त्यानंतरही त्याने सिग्नल तोडल्यास परवाना कायमचा रद्द केला जाईल, असे गडकरी म्हणाले.सध्याच्या रस्ता सुरक्षा नियम आणि केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ मध्ये बदल करण्याची आपली इच्छा आहे. रस्ता अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व राज्ये व अन्य पक्षांची एक उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात येईल. यासोबतच रस्ता सुरक्षेवरील राष्ट्रीय जनजागृती कार्यक्रम लागू केला जाईल. तसेच राष्ट्रीय रस्ता सुरक्षा परिषदेची पुनर्रचना केली जाईल, असे गडकरी यांनी सांगितले. सर्व राज्य सरकारांशी समन्वय साधून सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी एक रोडमॅप तयार करण्याची सूचना गडकरी यांनी आपले उपमंत्री कृष्णा पाल यांना केली आहे.हा मुद्दा युद्धपातळीवर हाती घेण्यात येईल आणि संसदेच्या पुढील अधिवेशनात याबाबतचे विधेयक मांडले जाईल. आंतरराष्ट्रीय दर्जाची रस्ता सुरक्षात्मक उपाययोजना करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासाठी अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन यासारख्या विकसित देशांमधील वाहतूक नियम व कायद्यांचा अभ्यास करण्यात येईल. वाहतुकीचे नियम तोडणार्‍यांना सोडले जाणार नाही, असे गडकरी म्हणाले.भारतात दरवर्षी १.४ लाख लोक रस्ता अपघातात मृत्युमुखी पडतात आणि ५ लाखांवर लोक जखमी होतात, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले. अपघातांना आळा घालण्यासाठी अपघातप्रवण विभागांची ओळख पटविण्याच्या दिशेने विस्तृत अभ्यास करण्याचे राष्ट्रीय माहमार्ग प्राधिकरण आणि राज्य सरकारांना सांगण्यात आले आहे, असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.