शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

तीनवेळा सिग्नल तोडल्यास लायसन्स रद्द

By admin | Updated: June 5, 2014 23:15 IST

एखाद्या वाहन चालकाने तीन वेळा वाहतूक नियम मोडला तर त्याचा वाहन चालविण्याचा परवाना सहा महिन्यांसाठी रद्द करण्यात येईल.

गडकरी यांची घोषणा : मोटार वाहन कायद्यात बदल करणारनबिन सिन्हा : नवी दिल्लीएखाद्या वाहन चालकाने तीन वेळा वाहतूक नियम मोडला तर त्याचा वाहन चालविण्याचा परवाना सहा महिन्यांसाठी रद्द करण्यात येईल. त्यानंतरही वाहन चालकाने पुन्हा वाहतुकीचे नियम तोडले तर मात्र त्याचा परवाना कायमचा रद्द केला जाईल. यासाठी येत्या महिनाभरात मोटार वाहन विधेयकाचा मसुदा नव्याने तयार करण्यात येईल, असे केंद्रीय रस्ता परिवहन, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी जाहीर केले.केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाच्या पार्श्वभूमीवर मोटार वाहन कायद्यात बदल करून वाहतूक नियम तोडणार्‍यांविरुद्ध कठोरपणे वागण्याचा हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. गडकरी यांनी गुरुवारी ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आणि भारतासाठी आदर्श असा कायदा तयार करण्यासाठी अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स व सिंगापूरसह काही प्रमुख देशांमधील मोटार वाहन कायद्याचा अभ्यास करण्याची सूचना अधिकार्‍यांना दिली.यापुढे वाहतुकीचे नियम तोडणार्‍यांना केवळ दंड आकारून सोडले जाणार नाही. तर तीनवेळा सिग्नल तोडणार्‍यांविरुद्ध आता कठोर कारवाई केली जाईल. आम्ही त्यांचा वाहन चालविण्याचा परवाना सहा महिन्यांसाठी रद्द करू. त्यानंतरही त्याने सिग्नल तोडल्यास परवाना कायमचा रद्द केला जाईल, असे गडकरी म्हणाले.सध्याच्या रस्ता सुरक्षा नियम आणि केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ मध्ये बदल करण्याची आपली इच्छा आहे. रस्ता अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व राज्ये व अन्य पक्षांची एक उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात येईल. यासोबतच रस्ता सुरक्षेवरील राष्ट्रीय जनजागृती कार्यक्रम लागू केला जाईल. तसेच राष्ट्रीय रस्ता सुरक्षा परिषदेची पुनर्रचना केली जाईल, असे गडकरी यांनी सांगितले. सर्व राज्य सरकारांशी समन्वय साधून सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी एक रोडमॅप तयार करण्याची सूचना गडकरी यांनी आपले उपमंत्री कृष्णा पाल यांना केली आहे.हा मुद्दा युद्धपातळीवर हाती घेण्यात येईल आणि संसदेच्या पुढील अधिवेशनात याबाबतचे विधेयक मांडले जाईल. आंतरराष्ट्रीय दर्जाची रस्ता सुरक्षात्मक उपाययोजना करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासाठी अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन यासारख्या विकसित देशांमधील वाहतूक नियम व कायद्यांचा अभ्यास करण्यात येईल. वाहतुकीचे नियम तोडणार्‍यांना सोडले जाणार नाही, असे गडकरी म्हणाले.भारतात दरवर्षी १.४ लाख लोक रस्ता अपघातात मृत्युमुखी पडतात आणि ५ लाखांवर लोक जखमी होतात, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले. अपघातांना आळा घालण्यासाठी अपघातप्रवण विभागांची ओळख पटविण्याच्या दिशेने विस्तृत अभ्यास करण्याचे राष्ट्रीय माहमार्ग प्राधिकरण आणि राज्य सरकारांना सांगण्यात आले आहे, असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.