शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

तीन हजारांत भारतात ‘एन्ट्री’

By admin | Updated: October 24, 2015 03:19 IST

बांगलादेशी नागरिकांना अवघ्या तीन हजार रुपयांत सीमेवरून भारतात ‘एन्ट्री’ दिली जात असल्याची कबुली दोन बांगलादेशी संशयित आरोपींनी पुसद पोलिसांपुढे दिली आहे.

- प्रकाश लामणे,  पुसद (यवतमाळ)बांगलादेशी नागरिकांना अवघ्या तीन हजार रुपयांत सीमेवरून भारतात ‘एन्ट्री’ दिली जात असल्याची कबुली दोन बांगलादेशी संशयित आरोपींनी पुसद पोलिसांपुढे दिली आहे. बनावट कागदपत्रांच्या तपासणीसाठी पुसद ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी मुंबईच्या कारागृहातून मोहम्मद आझीम गाझी माजेद गाझी (२७) व हबीब ऊर्फ हबील रूबल शेख (२५) या संशयित आरोपींना ताब्यात घेतले. पुसदच्या न्यायालयाने त्यांना २५ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांनी पोलिसांना सांगितले की, बांगलादेशच्या नडाईल जिल्ह्यातील रघुनाथपूर तालुक्याच्या कालिया येथील ते रहिवासी आहेत. त्यांनी तेथील ‘नुस्लम’ नामक एजंटाला प्रत्येकी तीन हजार रुपये दिले. त्याच्या माध्यमातून भारतीय सीमेपर्यंत व तेथून हावडा एक्स्प्रेसने मुंबईपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली गेली.दीड वर्षांपूर्वी हबीबचे वडील रूबल शेख (५०) यांनीसुद्धा भारतात घुसखोरी केली. त्यांनी भंगाराचा व्यवसाय सुरू केला. मोहम्मद आझीम व हबीब हे दोघे आठ महिन्यांपूर्वी भारतात घुसले. नवी मुंबई परिसरातील वडिलांच्या भंगार व्यवसायाला हातभार लावणे सुरू केले. दोन महिने हा व्यवसाय सुरळीत चालला. मात्र विनापरवाना भारतात घुसखोरी केल्याच्या आरोपावरून मुंबई पोलिसांनी आझीम व हबीब या दोघांना अटक केली. ठाणे न्यायालयाने त्यांना सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली. हे दोघे कारागृहात असताना सलीम नावाच्या दलालाच्या माध्यमातून हबीबच्या वडिलांकडे मुंबईतील एक वकील आला. कारागृहात असलेल्या दोघांचेही भारतीयत्व सिद्ध करण्यासाठी बनावट कागदपत्रे बनवून देण्याची तयारी त्याने दर्शविली. मात्र त्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. भारतीयत्वही मिळते आणि कारागृहातून सुटकाही होते, म्हणून रूबल शेख यांनी एक लाख रुपये दिले. त्या वकिलानेच पुसद तालुक्याच्या (यवतमाळ) वेणी (खुर्द) येथील महा ई-सेवा केंद्रातून बनावट कागदपत्रे तयार केली. हा प्रकार उघडकीस आल्याने पुसद पोलिसांनी याच गुन्ह्यात मो. आझीम व हबीब या यांना अटक केली आहे. केवळ अडीचशे किलोमीटरचे अंतरबांगलादेशातील बेनातल व भारतातील अंबासा (त्रिपुरा राज्य) ही बांगला-भारत सीमा आहे. रघुनाथपूरपासून या सीमेचे अंतर २५० किलोमीटर आहे. अशाच पद्धतीने दीड वर्षांपूर्वी हबीबचे वडील रूबल शेख (५०) यांनीसुद्धा भारतात घुसखोरी केली. त्यांनी आपली बनावट कागदपत्रे मुंबईतच तयार केली असून ते आता ‘भारतीय नागरिक’ बनले आहेत. त्यांनी मुंबईतच भंगाराचा व्यवसाय सुरू केला, अशी माहिती त्यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.दोन महिने हा व्यवसाय सुरळीत चालला. मात्र विनापरवाना भारतात घुसखोरी केल्याच्या आरोपावरून मुंबई पोलिसांनी आझीम व हबीब या दोघांना अटक केली. ठाणे न्यायालयाने त्यांना सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली. याप्रकरणी वकील आणि रूबल शेख हे पोलिसांना हुलकावण्या देत आहेत.