शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

नाशिकमधून पळालेले तिघे ठाण्यात

By admin | Updated: June 8, 2016 05:02 IST

घरात काम करावे लागते, अभ्यासाचाही ताण आणि आई-वडील रागावल्याने नाशिकमधून तीन अल्पवयीन मुलांनी घरातून पळून ठाणे गाठले

ठाणे : घरात काम करावे लागते, अभ्यासाचाही ताण आणि आई-वडील रागावल्याने नाशिकमधून तीन अल्पवयीन मुलांनी घरातून पळून ठाणे गाठले... ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर पडल्यानंतर त्यांनी अपहरणाचा बनाव केला. चौकशीत त्यांची बनवाबनवी उघड झाली. पुढील अनर्थ टाळण्यासाठी या तिघांनाही वाहतुक नियंत्रण शाखेच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी त्यांच्या पालकांना पाचारण करून त्यांच्या स्वाधीन केले. अवघ्या २४ तासांतच आपली मुले सुखरुप मिळाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले.निखिल पितांबर जाधव (१४), विशाल पितांबर जाधव (१५) हे दोघे भाऊ आणि त्यांचा मित्र कुणाल विश्वनाथ साबळे (१२) अशी ही मुले आहेत. तिघेही नाशिकच्या पवार संकुल भागातील रहिवासी आहेत. त्यांचे आई वडील मोलमजुरीचे काम करतात. घरातील काम आणि अभ्यासावर होणारी कटकट नको म्हणून विशालने पळून जाण्याची कल्पना निखिल आणि कुणाल यांना सांगितली. मुंबईत फिरु. नंतर बघू कुठे जायचे ते.... अशी चर्चा करीत ते तिघेही ६ जूनला सकाळी दहाच्या सुमारास घराबाहेर पडले. रेल्वेने इगतपुरीला आले. तिथून एका पीसीओवरुन त्यांनी घरी फोन केला... पण बोलले काहीच नाहीत. नंतर पुन्हा रेल्वेने ठाणे गाठले. सायंकाळी ७.३० वा. च्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर भेदरलेल्या अवस्थेत ही मुले ठाणे नगर वाहतूक उपशाखेचे हवालदार एस. एन. चौधरी यांच्या निदर्शनास आली. ‘नाशिकच्या सातपूर भागातून गुुंगीचे औषध देऊन तोंडावर रुमाल टाकून कारमधून आम्हाला पळवून आणले आहे,’ असा कांगावा करीत त्यांच्याकडे त्यांनी मदतीची याचनाही केली. ही गाडी जवळच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयाजवळ असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यातील एका मुलासह चौधरी तसेच नाईक आहेर यांनी नियंत्रण कक्षाला माहिती देऊन या कथित गाडीचा शोध घेतला. तशी गाडी तिथे मिळाली नाही. नियंत्रण कक्षातील संदेश बिनतारी संदेश यंत्रणेवर ऐकून उपायुक्त करंदीकर यांनीही ठाणे नगरच्या वाहतूक चौकीत धाव घेतली. त्यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चौधरी यांनी या मुलांकडे चौकशी करुन त्यांच्या पालकांची माहिती घेतली. आपली मुले सुखरुप असल्याची माहिती मिळताच विशालचे वडील पितांबर जाधव आणि कुणालचे काका नितिन शिरसाठ हे सोमवारी रात्री ११ वाजता ठाण्यात आल्यानंतर या तिघांनाही त्यांच्या ताब्यात देण्यात आले. घरातून पळून आल्यावर ठाण्यात येईपर्यंत रात्र झाली. त्यात घरच्यांची आठवण येऊ लागली. कोणालाही न सांगता घराबाहेर पडल्यामुळे आई-वडील रागावण्याच्या भीतीमुळे अपहरणाचा बनाव केल्याचे कुणाल साबळे याने ‘लोकमत’ ला सांगितले. ठाणे नगर पोलिसांनीही या प्रकरणी पालक, मुलांचा जबाब नोंदविला.>वाहतूक पोलिसांचा सत्कारहे संवेदनशील प्रकरण अतिशय जबाबदारीने हाताळून मुलांची माहिती नियंत्रण कक्षाकडे देत त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या हवालदार एस. एन. चौधरी आणि निरीक्षक दीपक चौधरी यांचा उपायुक्त करंदीकर यांनी विशेष सत्कार केला. >५० रुपयांमध्ये ठाण्यात घराबाहेर पडण्याचा निर्णय घेणाऱ्या विशालकडे खाऊचे ५० रुपये होते. उर्वरित दोघांकडे पैसेही नव्हते. काही ठिकाणी लिफ्ट मागत तर काही ठिकाणी रेल्वेने प्रवास करीत त्यांनी ठाणे गाठल्याचे पोलिसांना सांगितले.क्षुल्लक कारणावरुन सोमवारी मुलांनी घर सोडले. ठाणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुले सुखरुप मिळाल्याचा प्रचंड आनंद आहे.- पितांबर जाधव (निखील आणि विशालचे वडील)