शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

‘इसिस’कडे जाणारे तीन विद्यार्थी जेरबंद

By admin | Updated: December 27, 2015 02:52 IST

इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅण्ड सीरिया (इसिस) या खतरनाक दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या हैदराबादच्या तीन युवकांना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी पहाटे

- नरेश डोंगरे, नागपूर

इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅण्ड सीरिया (इसिस) या खतरनाक दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या हैदराबादच्या तीन युवकांना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी पहाटे ताब्यात घेण्यात आले. अब्दुल बासित मोहम्मद आरिफ (वय २१, रा. नसिबनगर, हैदराबाद), सय्यद ओमर फारूख हुसेन (२२, गुलशन इक्बाल कॉलनी, हैदराबाद) आणि माज हसन फारूख (२१, मुस्कान हयात हुमायुनगर) अशी त्यांची नावे असून, हे तिघेही उच्चशिक्षित तसेच सधन परिवारातील आहेत. दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) स्थानिक अधिकाऱ्यांनी आणि हैदराबाद काउंटर इंटेलिजन्स टीम(सीआयटी)ने ही संयुक्त कारवाई केली. प्राथमिक चौकशीनंतर त्यांना सीआयटीचे अधिकारी हैदराबादला घेऊन गेले. हे तिघे गेल्या अनेक महिन्यांपासून इसिसच्या आॅनलाइन संपर्कात होते. पालकांना आणि पोलिसांनाही त्यांची माहिती होती. त्यामुळे त्यांच्या हालचालीवर तेलंगण सुरक्षा यंत्रणेची नजर होती. हे तिघे बुधवारी घरून अचानक बेपत्ता झाले. त्यांचे मोबाइलही ‘आऊट आॅफ कव्हरेज’ असल्यामुळे पोलीस आणि सीआयटी सक्रिय झाली. तिघांच्या पालकांनी चंद्रयाण गुप्तनगर आणि हुमायुनगर पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीवरून देशभरातील सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले. ते शुक्रवारी दुपारी नागपूरकडे जात असल्याचा आणि नागपुरातून सीरियात जाणार असल्याचा अंदाज आल्यामुळे स्थानिक एटीएसला या तिघांची सचित्र माहिती देण्यात आली. त्यानुसार, त्यांना पकडण्यासाठी शुक्रवारी रात्रीपासूनच नागपुरात आॅपरेशन सुरू करण्यात आले. एकीकडे हॉटेल, लॉज तपासणे सुरू झाले, दुसरीकडे शुक्रवारी मध्यरात्रीपासून एटीएसच्या स्थानिक पथकाने विमानतळावर सापळा लावला. आज पहाटे ३ च्या सुमारास हे तिघेही विमानतळावर पोहोचले. त्यांच्या काही वेळेपूर्वीच पीआय भास्कर यांच्या नेतृत्वात सीआयटी हैदराबादचे पथक नागपूर विमानतळावर दाखल झाले होते. विमानतळाच्या प्रवेशद्वारावर पोहोचलेल्या बासित, ओमर आणि माजवर सीआयटीच्या अधिकाऱ्यांनी नजर रोखत एटीएसच्या अधिकाऱ्यांना इशारा करताच, त्यांच्यावर झडप घालण्यात आली. या तिघांना जेरबंद करून त्यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली. त्यात कपडे, सुकामेवा, पासपोर्ट आणि ९० हजार रुपये आढळले. या तिघांना जेरबंद केल्यानंतर विमानतळावरून एटीएसच्या कार्यालयात आणण्यात आले. येथे त्यांची तब्बल चार तास चौकशी करण्यात आली. त्यांच्याकडून विविध प्रकारची माहिती घेतल्यानंतर, सीआयटीचे पथक त्यांना हैदराबादकडे घेऊन गेले....तरीही डोक्यातील ‘भूत’ कायम- सधन परिवारातील हे तिघेही उच्चशिक्षित आहेत. बासित बीटेक फायनलचा, ओमर बीएस्सी मायक्रोलॉजी (फायनल) तर माज बीईचा विद्यार्थी आहे. - बासित आणि माज तसेच त्यांचे दोन साथीदार असे चौघे चार महिन्यांपूर्वीच सीरियात जाणार होते. प. बंगाल, पाकिस्तानमार्गे ते सीरियात जाण्याच्या तयारीत असताना कोलकाता विमानतळावर त्यांना पकडण्यात आले होते. - घरवापसीनंतर हैदराबाद सीआयटीने त्यांचे समुपदेशन केले. चारपैकी दोघे मागे फिरले. मात्र, बासित व फारुख यांच्या डोक्यातून इसिसचे भूत काही उतरले नाही. त्यांनी ‘त्या दोघां’चा नाद सोडून ओमरला ‘मिशन इसिस‘मध्ये सहभागी करून घेतले. त्यानंतर घरच्यांना गुंगारा देऊन गुरुवारी सायंकाळी गायब झाले.आॅनलाइन शोध या तिघांचा शोध घेताना सुरक्षा यंत्रणांनी त्यांचे मोबाइल, फेसबुक, ई-मेल, व्हॉटस् अ‍ॅप तपासणे सुरू केले. या तिघांचेही मोबाइल स्वीच्ड आॅफ होते. मात्र, मोबाइल आॅफ करताना त्यांनी नागपूर विमानतळावरून विमानाची श्रीनगरपर्यंतची ३ तिकिटे बुक केल्याचे उघड झाले. ते नागपूरहून इंडिगोच्या विमानाने इंदोर, दिल्लीमार्गे श्रीनगरला जाणार होते. सकाळी ८.१५ला हे विमान नागपूर विमानतळावरून इंदोरकडे झेपावते. त्यासाठी ते पहाटे ३च्या सुमारास विमानतळावर आले. आॅनलाइन प्रभाव कोलकाता येथून पकडून आणल्यानंतर बासित आणि माज या दोघांचे नातेवाईक, डॉक्टर, पोलीस अधिकारी आणि काही समाजसेवक समुपदेशन करीत होते. मात्र, ते इसिसच्या पुरत्या प्रभावात गेले होते. ते तासन्तास इसिसच्या आॅनलाइन प्रपोगंडा वॉरच्या संपर्कात राहायचे. ते पालकांच्याही लक्षात आले होते. पालकही त्रस्त होते. ते कोणत्याही क्षणी पळून जाऊ शकतात, असा संशय असल्यामुळे त्यांचे पालक अन् सीआयटी त्यांच्यावर सूक्ष्म नजर ठेवून होती. याच पार्श्वभूमीवर, गुरुवारी ते गायब होताच घरच्यांनी पोलिसांनी कळविले. हैदराबादमधील पोलीस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दिली.