शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

अचलपुरातून तीन विद्यार्थिनींचे अपहरण?

By admin | Updated: July 17, 2014 00:58 IST

शिकवणी वर्गातून परतणाऱ्या तीन विद्यार्थिनींचे चाकूचा धाक दाखवून मारुती व्हॅनमधून अपहरण केल्याची घटना अचलपूर शहरात बुधवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

सर्वत्र नाकाबंदी: दोन दिवसांत आणखी दोघांच्या अपहरणाचा प्रयत्न अमरावती : शिकवणी वर्गातून परतणाऱ्या तीन विद्यार्थिनींचे चाकूचा धाक दाखवून मारुती व्हॅनमधून अपहरण केल्याची घटना अचलपूर शहरात बुधवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. गेल्या दोन दिवसांत आणखी दोन विद्यार्थ्यांच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली आहे. या घटनेने संपूर्ण अचलपूर तालुका हादरला असून जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू हे अचलपुरात तळ ठोकून आहेत. परंतु अपहरण कुणाचे झाले हे बुधवारी रात्री ८.२० वाजतापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. प्रत्यक्षदर्शी मुलीच्या तक्रारीवरुन अचलपूर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.अचलपूर येथील व्यंकटेश विद्यालयाच्या विद्यार्थिनी दर्शना प्रमोद तिखिले व प्रतिभा श्रीकृष्ण अकोलकर यांनी तीन विद्यार्थिनींचे अपहरण झाल्याची माहिती अचलपूर पोलिसांना दिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी बिनतारी संदेश देऊन सर्व पोलीस ठाण्यांना अलर्ट केले. अकोला, अमरावती, बैतूल व धारणी मार्गावर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली व घटनेची माहिती जाणून घेतली. दोन विद्यार्थिनींनी अचलपूर पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्या विद्यार्थिनी सकाळी शिकवणी वर्गातून घराकडे जाताना सुलतानपुरा इदगाहजवळ त्यांच्यासमोर असलेल्या तीन विद्यार्थिनींजवळ पांढऱ्या रंगाची मारुती व्हॅन येऊन थांबली. त्यातून काही जण उतरले व चाकूचा धाक दाखवून त्यांनी तीन विद्यार्थिनींना जबरीने आपल्या वाहनात बसवून नेले. त्यातील काही जण बुरखाधारी होते, अशी माहिती अचलपूर पोलिसांना या दोन विद्यार्थिनींनी दिली. तीन मुलींच्या अपहरणप्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी एकाही मुलीचे पालक पुढे आले नाही. त्यामुळे रात्री अचलपूर पोलिसांनी घटनेची प्रत्यक्षदर्शी दर्शना तिखिले या मुलीच्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपींविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान, बुधवारी सकाळी १०.४५ वाजता आणखी एका विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची तक्रार अचलपूर पोलिसात दाखल झाली. स्थानिक व्यंकटेश विद्यालयाची विद्यार्थिनी गायत्री दीपक डाके ही सायकलने शाळेत जात असताना विलायतपुरानजीक पांढऱ्या रंगाची मारुती व्हॅन आली. गायत्री सायकलवर असताना व्हॅनमधून एकाने तिची ओढणी ओढली आणि आपल्या वाहनात बसण्यासाठी दम भरला. परंतु तिने झटका मारुन आपली सुटका करुन घेतल्याचे गायत्रीने अचलपूर पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. यासंदर्भाची आणखी एक तक्रार मंगळवारी सरमसपुरा पोलीस ठाण्यात दाखल झाली. व्यंकटेश विद्यालयाचे इयत्ता ५ ते ७ वी पर्यंतचे विद्यार्थी समिक्षा संजय बेंडे, पल्लवी दीपक दाभाडे, उज्ज्वल सुनील दाभाडे, तुषार दीपक दाभाडे हे विद्यार्थी मंगळवारी सकाळी शाळेत जात असता अचानक मारुती व्हॅन येऊन थांबली. वाहनातील एकाने उज्ज्वलचा हात पकडून वाहनात ओढण्याचा प्रयत्न केला. परंतु उज्ज्वलने हाताला झटका मारुन आपली सुटका केल्याने हे वाहन पुढे निघून गेले. यासंदर्भाची तक्रार व्यंकटेश विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीधर देशपांडे व शारीरिक शिक्षक सुनील पांडे यांनी सरमसपुरा पोलीस ठाण्यात दाखल केली. मारुती व्हॅनचा वापरअचलपूर येथे तिन्ही घटनांमध्ये पांढऱ्या रंगाच्या मारुती व्हॅनचा उल्लेख आला आहे. तर एका प्रकरणात त्या व्हॅनच्या काचावर बालाजीचे चित्र अंकित असल्याचे सांगण्यात आले.घटनांबाबत तर्कवितर्कअचलपुरात दोन दिवसांत दोन मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न व तीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटनांनी संपूर्ण अचलपूर तालुका हादरला असताना या घटनांबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. अपहृत मुलींची नावे अज्ञातएका पांढऱ्या रंगाच्या मारुती व्हॅनमधून तीन विद्यार्थिनींचे अपहरण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली असली तरी अपहृत मुलींची नावे अद्याप पोलिसांना कळू शकली नाही. ही नावे शोधण्याचा प्रयत्न पोलिसांनी मुख्याध्यापकांच्या माध्यमातून सुरु केला आहे.