शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

ऐरोली येथील तिघे अजूनही बेपत्ता

By admin | Updated: August 2, 2016 05:29 IST

गटारी साजरी करण्यासाठी नवी मुंबईतील ऐरोली येथून अंबाडीजवळील चिरंबे येथे आलेले तिघे जण रविवारी दुपारी भातसा नदीत बुडाले

वज्रेश्वरी : गटारी साजरी करण्यासाठी नवी मुंबईतील ऐरोली येथून अंबाडीजवळील चिरंबे येथे आलेले तिघे जण रविवारी दुपारी भातसा नदीत बुडाले होते. अग्निशमन दल, पोलीस स्थानिकांच्या मदतीने त्यांचा शोध घेत आहेत. परंतु, सोमवारी सायंकाळपर्यंत ते सापडलेले नाहीत.अंबाडीजवळील चिरंबे येथे एका नातेवाइकाच्या फार्महाऊसवर ऐरोली येथील ६ मित्र आले होते. रविवारी दुपारी जेवण झाल्यावर जवळच असलेल्या तानसा नदीवर ते अंघोळीसाठी गेले होते. तेथील एका खडकावर ते बसले असता अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. त्यात बबन मढवी (४५), विलास जोशी (४२), देविदास पाटील (३८) हे तीन जण वाहून गेले. तर रवी मढवी, राजा कोटकर, परशुराम म्हात्रे हे वेळीच पोहून बाहेर आल्याने बचावले. या घटनेची माहिती गणेशपुरी पोलिसांना समजताच त्यांनी स्थानिक तरु णांच्या मदतीने त्यांचा शोध घेतला. भिवंडी महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनीही रात्री उशिरापर्यंत त्यांचे शोधकार्य सुरू ठेवले. मात्र, ते सापडले नाहीत. सोमवारी सकाळी भिवंडी आणि वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या १२ ते १५ जणांच्या चमूने स्थानिक तरु णांच्या मदतीने अंबाडी ते अकलोली गणेशपुरीपर्यंत शोध घेतला. परंतु, सायंकाळी उशिरापर्यंत वाहून गेलेल्या एकही जणाचा शोध लागला नाही. घटनास्थळी वाहून गेलेल्यांच्या नातेवाइकांनी गर्दी केली होती. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. (वार्ताहर)