शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

जहाजाच्या स्वच्छतेवेळी तीन खलाशांचा मृत्यू

By admin | Updated: February 12, 2017 02:07 IST

भरसमुद्रात धान्यवाहू बार्जच्या सफाईसाठी उतरलेल्या एका खलाशाला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याच्या बचावासाठी अन्य खलाशी खाली उतरले. मात्र त्याच दरम्यान आतील विषारी

मुंबई : भरसमुद्रात धान्यवाहू बार्जच्या सफाईसाठी उतरलेल्या एका खलाशाला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याच्या बचावासाठी अन्य खलाशी खाली उतरले. मात्र त्याच दरम्यान आतील विषारी वायूच्या संपर्कात आल्याने त्यापैकी तिघांना जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना शुुक्रवारी घडली. तिघा जखमींवर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी यलोगेट पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. अरबी समुद्रात साडेचार नाविक मैल अंतरावर एमव्ही ओरियन - २ या धान्यवाहू बार्जमध्ये धान्य भरण्यात येत होते. अचानक सांडपाण्याची टाकी जास्त भरल्याने जहाज एका दिशेला कलले. पातळी कमी करण्यासाठी तात्काळ एक खलाशी आत उतरला. मात्र आत उतरताक्षणी त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि तो तिथेच कोसळला. त्याला वाचविण्यासह आतील सफाईसाठी बार्जच्या मास्टरसह इतर खलाशी उतरले, त्यांनाही आतील विषारी वायूने अस्वस्थ वाटू लागले. बार्जच्या पोकळीमध्ये साचलेले पाणी आणि धान्य यामुळे तयार झालेल्या विषारी वायूच्या संपर्कात आल्याने त्यांना हा त्रास झाला. घटनेची माहिती मिळताच कोस्ट गार्ड बोट क्रमांक सी. १५४ तेथे दाखल झाली. त्यांनी सर्वांना बोटीतून इंदिरा डॉक येथे आणण्यात आले. तेथून त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे तिघांना मृत घोषित करण्यात आले. मंगेश भोसले (२७), जयंता चौधरी (२३) आणि क्रितीक कोच (२३) अशी मृतांची नावे आहेत. तिघांचेही मृतदेह विच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणी यलोगेट पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)- मास्टर एमडी दौड इब्राहीम कुरी (५०) यांच्यासह शर्मासन मंडल आणि गणेश बाहिया यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.