शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
3
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
4
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
5
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
6
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
7
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
8
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
9
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
10
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
11
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
12
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
13
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
14
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
15
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
16
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
17
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
18
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
19
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
20
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी

कोर्टाच्या आदेशानंतरही तीन ‘कोठडी मृत्यू’

By admin | Updated: December 9, 2015 01:16 IST

राज्यात एकही कोठडी मृत्यू होता कामा नये, असे उच्च न्यायालयाने बजावूनही दोनच महिन्यांत राज्यात तीन कोठडी मृत्यू झाले.

मुंबई : राज्यात एकही कोठडी मृत्यू होता कामा नये, असे उच्च न्यायालयाने बजावूनही दोनच महिन्यांत राज्यात तीन कोठडी मृत्यू झाले. उच्च न्यायालयाने या तिन्ही कोठडी मृत्यूंबाबत तपशिलावार माहिती देण्याचे निर्देश सरकारला दिले, तसेच कबुलीजबाब वदवून घेण्यापेक्षा तपासावर भर द्या, असा टोलाही पोलिसांना लगावला, तसेच अशा घटनांसाठी जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा असे प्रकार थांबणार नाही, असे अशा शब्दांमध्ये न्यायालयाने सरकारला आदेश दिले.२१ आॅक्टोबर रोजी उच्च न्यायालयाने राज्यात पुढील सहा महिने एकही कोठडी मृत्यू होता कामा नये, असे राज्य सरकारला बजावले होते. तरीही गेल्या दोन महिन्यांत राज्यात तीन कोठडी मृत्यू झाल्याची बाब न्या. व्ही. एम. कानडे व न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणली. आॅक्टोबरमध्ये दोन तर २७ नोव्हेंबर रोजी ठाण्यामध्ये एकाचा कोठडी मृत्यू झाल्याचे खंडपीठाला सांगितले. त्यावर खंडपीठाने या तिघांवर कोणता गुन्हा नोंदवण्यात आला? त् शवविच्छेदन अहवालात काय नमूद करण्यात आले आहे, याची तपशिलवार माहिती देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. काही महिन्यांपूर्वी वडाळा रेल्वे स्टेशन पोलिसांच्या कोठडीत एका तरुणाचा मृत्यू झाला. याविरोधात त्याच्या वडिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेची व्याप्ती वाढवत संपूर्ण राज्यासाठी ती लागू केली आहे. (प्रतिनिधी)