शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

बस कंटेनरवर धडकून तीन ठार, १५ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 05:26 IST

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगावजवळील इंदापूर येथे कारला ओव्हरटेक करून पुढे गेलेली खासगी प्रवासी बस, समोरून येणा-या कंटेनरवर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात कंटेनर व बसचालकासह तिघांचा मृत्यू झाला

माणगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगावजवळील इंदापूर येथे कारला ओव्हरटेक करून पुढे गेलेली खासगी प्रवासी बस, समोरून येणा-या कंटेनरवर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात कंटेनर व बसचालकासह तिघांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले. जखमींमध्ये ८ जण गंभीर झाले असून, ७ जणांना किरकोळ दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हा अपघात सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास घडला.या अपघाताची फिर्याद कारचालक रोहन रवींद्र लोकेगावकर (२६, रा. प्रभादेवी, मुंबई) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. रोहन लोकेगावकर हे कारने (एम एच ०१ बीटी ०१६२) कणकवलीहून मुंबई येथे जात होते. त्यांची गाडी इंदापूर येथे आली असता,गाडीमागून येणाºया चिराग ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसने (क्र . एम.एच ०४ जीपी १६२७) कारला ओव्हरटेक केले व बसचालकाने मुंबईकडून येणाºया कंटेनरला (क्र . एम एच ४६ एच ५५३०) ला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बस व कंटेनरच्या दर्शनी भागाचा चुराडा होऊन, कंटेनरचालक रामकिशन जायभाये (३८, रा. दिवळनेर, ता. शिरूर), बाळकृष्ण दापले (४५, रा. मालाड मुंबई) हे दोन जण जागीच ठार झाले, तर बसचा चालक राजकुमार यादव (४५) याचा मुंबईला उपचाराकरिता नेत असताना मृत्यू झाला. या अपघातात लियाकत कासम रमदूल (४५), रजिया लियाकत रमदूल (४०), योगेश कृष्णा महाडिक (३२), सुनील कृष्णा नटे (४१), राहुल प्रकाश चौगुले (२४), वृषाली राहुल चौगुले (२४), प्राजक्ता प्रदीप गलांडे (३७), विनोद चेताराम राहू (१८) हे आठ जण गंभीर जखमी असून, इतर सात जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर माणगाव उपजिल्हा रु ग्णालय व इंदापूर येथील रु ग्णालयात प्राथमिक औषधोपचार करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच, माणगाव पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल होऊन, त्यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत करून जखमींना रु ग्णालयात दाखल केले. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करून, बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिल मेश्राम करीत आहेत.माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी सकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ज्ञानदेव कदम (३६, रा. महाड) जीप घेऊन मौजे लाखपाले गावाच्या हद्दीत आले असता, रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने जीप उलटून अपघात झाला. या अपघातात फिर्यादी ज्ञानेश्वर कदम, काशीराम कदम (६५), जितेंद्र कदम (३४), श्रुती कदम (३२), पूनम कदम (३२) सर्व रा. मुलुंड, मुंबई हे जखमी झाले असून, त्यांच्यावर महाड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद गोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार भिलारे हे करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात