शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
2
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
3
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकली; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
4
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
5
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
6
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
7
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
8
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
9
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
10
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
11
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
12
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
13
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
14
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
15
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
16
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
17
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
18
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
19
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
20
त्याने आरडाओरड केली, पण तिला जराही दया आली नाही! नवऱ्याला घरात कोंडून बायकोने लावली आग
Daily Top 2Weekly Top 5

बस कंटेनरवर धडकून तीन ठार, १५ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 05:26 IST

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगावजवळील इंदापूर येथे कारला ओव्हरटेक करून पुढे गेलेली खासगी प्रवासी बस, समोरून येणा-या कंटेनरवर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात कंटेनर व बसचालकासह तिघांचा मृत्यू झाला

माणगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगावजवळील इंदापूर येथे कारला ओव्हरटेक करून पुढे गेलेली खासगी प्रवासी बस, समोरून येणा-या कंटेनरवर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात कंटेनर व बसचालकासह तिघांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले. जखमींमध्ये ८ जण गंभीर झाले असून, ७ जणांना किरकोळ दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हा अपघात सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास घडला.या अपघाताची फिर्याद कारचालक रोहन रवींद्र लोकेगावकर (२६, रा. प्रभादेवी, मुंबई) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. रोहन लोकेगावकर हे कारने (एम एच ०१ बीटी ०१६२) कणकवलीहून मुंबई येथे जात होते. त्यांची गाडी इंदापूर येथे आली असता,गाडीमागून येणाºया चिराग ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसने (क्र . एम.एच ०४ जीपी १६२७) कारला ओव्हरटेक केले व बसचालकाने मुंबईकडून येणाºया कंटेनरला (क्र . एम एच ४६ एच ५५३०) ला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बस व कंटेनरच्या दर्शनी भागाचा चुराडा होऊन, कंटेनरचालक रामकिशन जायभाये (३८, रा. दिवळनेर, ता. शिरूर), बाळकृष्ण दापले (४५, रा. मालाड मुंबई) हे दोन जण जागीच ठार झाले, तर बसचा चालक राजकुमार यादव (४५) याचा मुंबईला उपचाराकरिता नेत असताना मृत्यू झाला. या अपघातात लियाकत कासम रमदूल (४५), रजिया लियाकत रमदूल (४०), योगेश कृष्णा महाडिक (३२), सुनील कृष्णा नटे (४१), राहुल प्रकाश चौगुले (२४), वृषाली राहुल चौगुले (२४), प्राजक्ता प्रदीप गलांडे (३७), विनोद चेताराम राहू (१८) हे आठ जण गंभीर जखमी असून, इतर सात जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर माणगाव उपजिल्हा रु ग्णालय व इंदापूर येथील रु ग्णालयात प्राथमिक औषधोपचार करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच, माणगाव पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल होऊन, त्यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत करून जखमींना रु ग्णालयात दाखल केले. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करून, बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिल मेश्राम करीत आहेत.माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी सकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ज्ञानदेव कदम (३६, रा. महाड) जीप घेऊन मौजे लाखपाले गावाच्या हद्दीत आले असता, रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने जीप उलटून अपघात झाला. या अपघातात फिर्यादी ज्ञानेश्वर कदम, काशीराम कदम (६५), जितेंद्र कदम (३४), श्रुती कदम (३२), पूनम कदम (३२) सर्व रा. मुलुंड, मुंबई हे जखमी झाले असून, त्यांच्यावर महाड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद गोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार भिलारे हे करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात