शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

बस कंटेनरवर धडकून तीन ठार, १५ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 05:26 IST

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगावजवळील इंदापूर येथे कारला ओव्हरटेक करून पुढे गेलेली खासगी प्रवासी बस, समोरून येणा-या कंटेनरवर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात कंटेनर व बसचालकासह तिघांचा मृत्यू झाला

माणगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगावजवळील इंदापूर येथे कारला ओव्हरटेक करून पुढे गेलेली खासगी प्रवासी बस, समोरून येणा-या कंटेनरवर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात कंटेनर व बसचालकासह तिघांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले. जखमींमध्ये ८ जण गंभीर झाले असून, ७ जणांना किरकोळ दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हा अपघात सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास घडला.या अपघाताची फिर्याद कारचालक रोहन रवींद्र लोकेगावकर (२६, रा. प्रभादेवी, मुंबई) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. रोहन लोकेगावकर हे कारने (एम एच ०१ बीटी ०१६२) कणकवलीहून मुंबई येथे जात होते. त्यांची गाडी इंदापूर येथे आली असता,गाडीमागून येणाºया चिराग ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसने (क्र . एम.एच ०४ जीपी १६२७) कारला ओव्हरटेक केले व बसचालकाने मुंबईकडून येणाºया कंटेनरला (क्र . एम एच ४६ एच ५५३०) ला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बस व कंटेनरच्या दर्शनी भागाचा चुराडा होऊन, कंटेनरचालक रामकिशन जायभाये (३८, रा. दिवळनेर, ता. शिरूर), बाळकृष्ण दापले (४५, रा. मालाड मुंबई) हे दोन जण जागीच ठार झाले, तर बसचा चालक राजकुमार यादव (४५) याचा मुंबईला उपचाराकरिता नेत असताना मृत्यू झाला. या अपघातात लियाकत कासम रमदूल (४५), रजिया लियाकत रमदूल (४०), योगेश कृष्णा महाडिक (३२), सुनील कृष्णा नटे (४१), राहुल प्रकाश चौगुले (२४), वृषाली राहुल चौगुले (२४), प्राजक्ता प्रदीप गलांडे (३७), विनोद चेताराम राहू (१८) हे आठ जण गंभीर जखमी असून, इतर सात जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर माणगाव उपजिल्हा रु ग्णालय व इंदापूर येथील रु ग्णालयात प्राथमिक औषधोपचार करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच, माणगाव पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल होऊन, त्यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत करून जखमींना रु ग्णालयात दाखल केले. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करून, बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिल मेश्राम करीत आहेत.माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी सकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ज्ञानदेव कदम (३६, रा. महाड) जीप घेऊन मौजे लाखपाले गावाच्या हद्दीत आले असता, रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने जीप उलटून अपघात झाला. या अपघातात फिर्यादी ज्ञानेश्वर कदम, काशीराम कदम (६५), जितेंद्र कदम (३४), श्रुती कदम (३२), पूनम कदम (३२) सर्व रा. मुलुंड, मुंबई हे जखमी झाले असून, त्यांच्यावर महाड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद गोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार भिलारे हे करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात