शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तीन आरोपींची जन्मठेप रद्द

By admin | Updated: June 4, 2014 01:06 IST

अमरावती जिल्ह्यातील एका हत्याप्रकरणात सरकारी पक्ष संशयाशिवाय गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तीन आरोपींची जन्मठेपेची शिक्षा रद्द केली आहे.

हायकोर्ट : अमरावती जिल्ह्यातील हत्याप्रकरणनागपूर : अमरावती जिल्ह्यातील एका हत्याप्रकरणात सरकारी पक्ष संशयाशिवाय गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यामुळे मुंबई  उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तीन आरोपींची जन्मठेपेची शिक्षा रद्द केली आहे.राजेश गाडाभाई पटेल (३0) रा. गुजरात, मोहम्मद तौफिक मोहम्मद शब्बीर शाह (२८) व राजू रामा जयस्वाल (३३) दोन्ही रा.  उत्तर प्रदेश अशी आरोपींची नावे आहेत. अचलपूर सत्र न्यायालयाने १९ जानेवारी २0१0 रोजी तिन्ही आरोपींना भादंविच्या कलम  ३0२ अंतर्गत जन्मठेप, तर कलम ३९२ अंतर्गत सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली होती. याविरुद्ध आरोपींनी उच्च  न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाने प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता आरोपींचे अपील स्वीकारून सत्र  न्यायालयाचा निर्णय रद्द केला. मृताचे नाव बजरंग खंडेलवाल आहे. खटल्यातील माहितीनुसार, ३ मार्च २00८ रोजी रात्री ९ च्या सुमारास फिर्यादी गिरधारी  सिरोया व बजरंग खंडेलवाल हे किराणा दुकान बंद करून घरी परतत होते. दोघांकडेही रोख रकमेच्या बॅगा होत्या. गोरक्षण  धर्मशाळेजवळ पोहोचल्यानंतर अचानक तीन जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. एकाने गिरधारीकडील बॅग हिसकावून पळ काढला.  गिरधारी त्याचा पाठलाग करीत काही दूर धावला.  अन्य दोन आरोपी बजरंगसोबत हातापाई करीत होते. त्यांनी बजरंगला  पिस्टलची गोळी झाडून ठार केले. तपासादरम्यान पोलिसांना सात आरोपींनी दरोड्याचा कट रचल्याची माहिती मिळाली. यामुळे  त्यांनी सातही आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. सुनावणीनंतर सत्र न्यायालयाने उपरोक्त तीन आरोपींना  शिक्षा ठोठावून अन्य आरोपींना निर्दोष सोडले होते. (प्रतिनिधी)