शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

खुनानंतर तीन तास ‘ती’ मृतदेहाजवळच, अनैतिक संबंधांतून तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 11:59 IST

लग्नाच्या नावाखाली आपला विश्वासघात केल्यानेच त्याचा खून केल्याचे तिने मान्य केल्याचे उपायुक्तांनी सांगितले.

ठाणे : अनैतिक संबंधांनंतर लग्नाला नकार देणाऱ्या कबीर अहमद लष्कर (२५) या तरुणाचा अत्यंत निर्घृणपणे खून केल्यानंतर त्याच्याच मृतदेहाजवळ तीन तास बसून काढल्यानंतर भानावर आलेल्या रूमा बेगम लष्कर (२८) हिने बंगलोरला पळ काढला. तिला बंगलोरमधून ठाणे पोलिसांनी अटक केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आल्याचे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांनी सांगितले.कबीर हा रूमा बेगम हिचा पती अन्वर हुसैन याच्या जिगनी (जि. अनिकल, कर्नाटक) येथील सायकल दुकानात नोकरीला होता.

त्यामुळेच त्याची आणि रूमा बेगमची ओळख झाली होती. त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाल्यामुळे तिने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला होता. दरम्यान, तो कर्नाटकातून ठाण्यात आला आणि घोडबंदर रोडवरील एका दुकानात नोकरीला लागला. ‘माझ्याशी लग्न करायचे असेल, तर कर्नाटकातील घरदार सोडून तू ठाण्यात ये’, असे त्याने तिला प्रलोभन दाखवले. ठरल्याप्रमाणे ती १६ मार्च रोजी ठाण्यात आली. मात्र, त्याने लग्नाला नकार दिला. १७ मार्च रोजी रात्री त्यांच्यात वाद झाला. याच रागातून तिने १८ मार्च रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास झोपेतच त्याच्या डोक्यात वीट टाकून त्याला जखमी केले. झोपेतून जाग आल्यावर तो तिला मारण्यासाठी झेपावल्यानंतर तिने चाकूने त्याच्या गुप्तांगावर वार केला.

नंतर, गळाही आवळला आणि तो जिवंत राहू नये म्हणून उंदीर मारण्याचे औषधही त्याच्या तोंडात कोंबले. या झटापटीत त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे खुनानंतर त्याच्या मृतदेहाजवळ पहाटे ५ वाजेपर्यंत तिने बसून काढले. भानावर आल्यावर स्वत:च्या रक्ताचे डाग पुसण्यासाठी अंघोळ करून पहाटेच त्याचे घर सोडले. ठाण्यातून पुणेमार्गे बंगलोर येथून जिगनी गावी परतल्याची कबुली तिने पोलिसांना दिली. कबीरला त्याच्या ठाण्यातील सायकल दुकानाचा मालक शोधत त्याच्या घरी आला, त्यावेळी त्याचा खून झाल्याचे उघड झाले. कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता ढोले, निरीक्षक नासीर कुलकर्णी आणि वैभव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, कैलास टोकले, उपनिरीक्षक रूपाली रत्ने, जमादार मधुकर कोठारे, हवालदार अंकुश पाटील आणि दीपक बरले यांच्या पथकाने थेट विमानाने बंगलोर गाठून अवघ्या काही तासांतच तिला अटक केली. सुरुवातीला या खुनाशी संबंध नसल्याचा दावा करणाºया रूमा बेगमने नंतर अखेर या खुनाची कबुली दिली.

कबीरने लग्नाच्या नावाखाली आपला विश्वासघात केल्यानेच त्याचा खून केल्याचे तिने मान्य केल्याचे उपायुक्त लोखंडे यांनी सांगितले. तिच्याकडून खुनातील चाकू आणि वीट हस्तगत करण्यात आली असून तिला सात दिवसांची पोलीस कोठडी ठाणे न्यायालयाने दिली आहे.ओळख न पटण्यासाठी कागदपत्रे नेली...खुनानंतर कबीरची कोणतीही ओळख पटू नये, म्हणून रूमा त्याचे आधार आणि पॅनकार्डही बंगलोरला जाताना घेऊन गेली. बंगलोरला पोहोचल्यानंतर आता आपल्यापर्यंत कोणी पोहोचू शकणार नाही, अशा आविर्भावात असतानाच पोलिसांनी पाठोपाठ विमानाने जाऊन पकडल्यानंतर मात्र तिला चांगलाच धक्का बसला.कोणताही धागादोरा नसताना..कबीर याचा खून झाल्यानंतर त्याचा खून एका महिलेने केल्याची शक्यता वर्तविली जात होती. तीन दिवसांपूर्वीच एक महिला त्याच्या घरी आली होती. इतकीच त्रोटक माहिती पोलिसांकडे उपलब्ध होती. विशेष म्हणजे बेंगलोर येथून आलेली रुमाबेगम यापूर्वी कधीही ठाण्यात आली नव्हती. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तिला जेरबंद केले.