शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

तीन मैत्रिणींचा शेततळयात बुडून मृत्यू

By admin | Updated: August 3, 2014 19:53 IST

रिसोड (जि. वाशिम) येथील घटना : फ्रेंन्डशिप डे च्या दिवशी काळाचा घाला

रिसोड : फ्रेंडशिप डे साजरा करण्याचे निमित्ताने तीन मैत्रिणी घराजवळ असलेल्या शेतामध्ये गेल्या होत्या. शेतामध्येच असलेल्या शेततळ्यातील पाण्याचा आनंद लुटण्यासाठी काठावर गेल्या असता तिघींचाही पाय मेनकापडावरून घसरल्याने पाण्यात पडल्या. त्यात तीघींचीही प्राणज्योत मालवली. हृदयाला हेलावणारी ही घटना रिसोड येथे ३ ऑगस्ट रोजी दुपारी ३:३0 वाजता उघडकीस आली. प्राप्त माहितीनुसार ३ ऑगस्ट रोजी दूपारी ३.३0 वाजताच्या सुमारास रिसोड शहराच्या उत्तर दिशेस अकोला मार्गाला लागून असलेल्या गणेश गवळी यांच्या फार्महाउसमध्ये आधूनिकतेची कास धरुन केलेल्या शेतीविकासाची माहिती रिसोड येथीलच एका कृषी व्यावसायीकाला देण्याच्या उद्देशाने गवळी त्यांच्या शेतातील शेततळ्य़ाजवळ गेले त्यावेळी हा प्रकार उजेडात आला. यासंदर्भात घटनास्थळावरील चर्चा व पोलिस सुत्रांकडून प्रथमदर्शनी समोर आलेल्या माहितीनुसार रिसोड येथीलच प्रज्ञा विलास मोरे, ऐश्‍वर्या गणेश गवळी व शिवानी गजानन साळेगावकर या तिघी मैत्रीणी दूपारी १२ वाजताच्या सुमारास ऐश्‍वर्या गवळीच्या फार्महाउसमध्ये जमल्या. ऐश्‍वर्याच्या घरी फराळपाणी केल्यानंतर त्यांनी फ्रेण्डशिप डे साजरा करण्याच्या अनुशंगाने शेतात मनमुराद फेरफटका मारण्याचा बेत आखला. द्राक्षाच्या बागेत फेरफटका मारल्यानंतर शेतामध्ये असलेल्या शेततळ्य़ाकडे पाण्याचा आनंद लुटण्यासाठी गेल्या. शेततळ्याभोवती असलेले मेनकापड शेवाळाने माखलेले होते. मात्र, त्याची पुसटशीही कल्पना या मैत्रिणींना नव्हती. नेमका नियतीने येथेच या मैत्रीणींचा घात केला. शेततळ्य़ाची पाहणी करतानाच पाय घसरुन तिघीही शेततळ्य़ात पडल्या व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दूपारी ३.३0 वाजताच्या सुमारास ज्यावेळी गवळी यांच्याकडे शेतीची माहिती घेण्याच्या अनुषंगाने एक कृषी व्यावसायीक आला व त्याला शेततळे दाखविण्यासाठी गवळी शेततळ्य़ाकडे गेले . त्यावेळी त्यांना शेततळ्य़ात त्यांच्या मुलीसह तिच्या दोन मैत्रीनींचे मृतदेह तरंगलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी लागलीच उपस्थितांच्या मदतीने तिघींनाही बाहेर काढून स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, या तिघींचीही उपचारापुर्वीच प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. सदर तीनही मैत्रिणी रिसोड येथील भारत माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता नवविच्या विद्यार्थीनी आहेत.काळजाला थरकाप सुटणार्‍या या घटनेची माहिती वार्‍यासारखी शहरात पसरताच अनेकांनी घटनास्थळी व ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. वृत्त लिहीस्तोवर घटनेची पोलिस स्टेशनमध्ये नोंद केली नव्हती.