अमरावती/वर्धा : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून रविवारी अमरावती जिल्ह्यात धामणगाव तालुक्यातील विनोद प्रभाकर काकडे व अक्षय रमेश राऊत (२१) आणि वर्धा जिल्ह्यात देवळी तालुक्यातील लोणी येथील शेतकरी कवडू पिंपळकर (५२) यांनी आत्महत्या केल्या.आष्टा येथील विनोद यांच्याकडे पाच एकर शेती आहे. यंदा त्यांनी शेतात कपाशीची लागवड केली होती. परंतु अपुऱ्या पावसाचा फटका पिकांना बसल्याने उत्पादनात घट होणार असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यांनी सोसायटीचे कर्ज घेतले होते. आष्टा येथीलच अक्षय राऊत हा गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह सोमवारी लक्ष्मण इंगळे यांच्या शेतात आढळून आला. सततचा दुष्काळ आणि पिके न उगवल्यामुळे बीडच्या अभिमान गावडे या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. (प्रतिनिधी)
विदर्भात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By admin | Updated: September 15, 2015 01:19 IST