शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

महाराष्ट्रात रोज तीन शेतक-यांच्या आत्महत्या

By admin | Updated: June 11, 2015 12:14 IST

राज्यातील शेतक-यांच्या आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून महाराष्ट्रात रोज तीन शेतकरी आत्महत्या करत असल्याचे समोर आले आहे. २०१५ मेपर्यंत राज्यात एकूण १,०८८ शेतक-यांनी आत्महत्या केली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - राज्यातील शेतक-यांच्या आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून महाराष्ट्रात रोज तीन शेतकरी आत्महत्या करत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. २०१५ मेपर्यंत राज्यात एकूण १,०८८ शेतक-यांनी आत्महत्या केली असून दोन महिन्यांत हे प्रमाण दुपटीने वाढले आहे. जानेवारी ते मार्चदरम्यान ६०१ शेतक-यांनी आत्महत्या केल्याचे राज्य सरकारने नमूद केले होते. गेल्या वर्षी आलेल्या दुष्काळामुळे अनेक पिकांचे अतोनात नुकसान झाले आणि त्यानंतर आलेला अवकाळी पाऊस व वादळामुळे परिस्थिती आणखीनच बिघडली. 
राज्यातील परिस्थिती इतकी भीषण असतानाच सरकारने निम्म्याहून अधिक शेतक-यांच्या आत्महत्या मदतीसाठी 'अपात्र' ठरवल्या आहेत. १०८८ पैकी अवघ्या ५४५  ( आत्महत्येच्या) केसेस नुकसानभरपाईसाठी पात्र ठरत असल्याचे समोर आले आहे. त्या पात्रतेचेही काही निकष आहेत. ज्या शेतक-याने जीव दिला त्याच्या नावावरच जमीन असेल आणि कर्जबाजारीपणाचा ठोस पुरावा असेल तरच ती आत्महत्या नुकसानभरपाईसाठी 'पात्र' ठरते. आत्महत्याग्रस्त शेतक-यांचा आकडा कमी दिसावा यासाठी हे निकष आहेत असे टीकाकारांचे म्हणणे आहे. मात्र असे असले तरीही मार्च ते मे महिन्यादरम्यान 'पात्र आत्महत्यांचे' प्रमाण २४१ वरून वाढून ५४५ वर पोचले आहे. 
ही माहिती महसूल विभागाच्या मुख्यालयातून मिळाली असून राज्य सरकारने ती अद्याप संकलित केलेली नाही. मात्र नॅशनल क्राईम ब्युरोकडून मिळालेल्या माहितीच्या तुलनेत हे आकडे अतिशय कमी असल्याचे टीकाकारांचे म्हणणे आहे. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांच्या विदर्भात शेतक-यांच्या आत्महत्येचे प्रमाण सर्वात अधिक आहे. १०८८ पैकी ५६४ केसेस या विदर्भातील आहेत. विदर्भातील शेतक-यांच्या आत्महत्येच्या प्रमाणात ७६ टक्के वाढ झाली असून मार्चमध्ये विदर्भात ३१९ शेतक-यांनी आपले जीवन संपवले होते. तर मराठवाड्यात ३६७ केसेस असून मार्चपर्यंत हेच प्रमाण २१५ इतके होते. 
अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसलेल्या नाशिकमध्येही मे अखेरपर्यंत १३० शेतक-यांनी आत्महत्या केली तर पुण्यात २६ व कोकणात एका शेतक-याने आपले जीवन संपवले आहे. 
शेतक-यांच्या आत्महत्या रोखणे हीच आमची प्राथमिकता असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केल्यानंतरही आत्महत्यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. त्यावर  'आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. शेतकरी आत्महत्येचा हा गंभीर प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून एका रात्रीतच तो सुधारता येऊ शकत नाही' असे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.
याप्रकरणी सरकारने आत्तापर्यंत ९० लाख शेतक-यांना ४ हजार कोटींची मदत नुकसानभरपाई जाहीर केली आह. तसेच ३५ लाख शेतकरी १६०० कोटींच्या पीक विम्यासाठी पात्र ठरल्याचेस सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. 
मात्र शेतक-यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देण्यात सरकार अपयशी ठरले, असे शेतकरी संघटनांच्या नेत्यांचे म्हणणे आहे. 'ही समस्या अतिशय बिकट बनली आहे. पीक पेरणीचा खर्च वाढतच चालला असला तरी विक्री किंमत मात्र अजूनही तितकीच (कमी) आहे' असे त्यांचे म्हणणे आहे.