शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
3
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
4
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
5
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
6
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
7
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
8
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
9
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
10
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
11
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
12
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
13
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
14
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
15
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
16
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
17
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
18
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
19
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
20
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस

अकोल्यात तीन शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: March 29, 2016 02:34 IST

कर्जबाजारीपणाला कंटाळून तेल्हारा आणि बाश्रीटाकळी तालुक्यातील शेतक-यांची आत्महत्या.

अकोला : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून तेल्हारा तालुक्यातील २ आणि बाश्रीटाकळी तालुक्यातील एक, अशा तीन शेतकरी आत्महत्येच्या घटना सोमवारी उघडकीस आल्या.तेल्हारा तालुक्यातील भांबेरी येथील अशोक हरिभाऊ सरोदे (५४) यांनी सोमवारी सकाळी स्वत:च्या शेतातील कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या नावे साडेतीन एकर शेती असून, मुलगा धीरज याच्या नावे अडीच एकर शेत आहे. गत दोन-तीन वर्षांपासून त्यांना नापिकीचा सामना करावा लागला. त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढला. अशातच या वर्षीही पीक झाले नाही. त्यामुळे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत सरोदे यांनी जीवनयात्रा संपविली. त्यांच्या मुलावरही बँकेचे दीड लाख रुपयांचे कर्ज आहे. याच तालुक्यातील हिंगणी खुर्द येथील एका तरुण शेतकर्‍याने सोमवारी गावालगतच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. अंबादास बाबूसिंग सोळंके (२७ ) हे मृताचे नाव आहे. त्यांच्या वडिलांच्या नावे तीन एकर शेती असून, अंबादास यांच्या पत्नीचे निधन तीन महिन्यांपूर्वीच झाले होते. शेतकरी आत्महत्येची तिसरी घटना बाश्रीटाकळी तालुक्यातील पार्डी येथे घडली. येथील माणिक प्रल्हाद काकड या शेतकर्‍याने हलाखीच्या परिस्थितीला कंटाळून स्वत:ला जाळून घेतले. त्यांच्याकडे चार एकर शेती असून, त्यावर ४0 हजार रुपयांचे कर्ज आहे. २६ मार्च रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास त्यांनी अंगावर रॉकेल घेऊन, पेटवून घेतले होते. अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. २७ मार्च रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.