शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

विदर्भातल्या तीन जिल्हा बँका तरणार

By admin | Updated: June 14, 2017 01:51 IST

सरकारने परवा घोषित केलेल्या ‘सरसकट’ कर्जमाफीने विदर्भातील नागपूर, बुलडाणा व वर्धा या तीन जिल्हा बँका दिवाळखोर होण्यापासून वाचणार आहेत.

- सोपान पांढरीपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सरकारने परवा घोषित केलेल्या ‘सरसकट’ कर्जमाफीने विदर्भातील नागपूर, बुलडाणा व वर्धा या तीन जिल्हा बँका दिवाळखोर होण्यापासून वाचणार आहेत.या तीनही बँका सध्या प्रशासकाच्या नियंत्रणाखाली असून कर्जमाफी झाली अथवा सरकारने ‘पॅकेज’ दिले तरच त्या तरतील असे भाकित ‘लोकमत’ने ११ मार्च २०१७ रोजी केले होते ते आता खरे ठरले आहे. या कर्जमाफीचा सर्वाधिक फायदा राज्यातील सर्वात जुन्या नागपूर जिल्हा बँकेला होणार आहे.नागपूर जिल्हा बँकेजवळ ३१ मार्च २०१७ रोजी ८४२ कोटींच्या ठेवी होत्या व कर्जवाटप ६६१ कोटी होते, त्यापैकी ४७८ कोटी कृषीकर्ज होते. बँकेचा संचित तोटा २१६ कोटी होता. कर्जमाफी पोटी बँकेला ४७८ कोटी मिळतील व संपूर्ण तोटा संपुष्टात येऊन बँकेजवळ २६२ कोटी अतिरिक्त निधी राहील व बँक आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल. ‘‘कर्जमाफीमुळे आम्ही संकटातून बाहेर पडून एक सक्षम बँक बनू’’ असे बँकेचे मुख्याधिकारी संजय कदम म्हणाले.बुलडाणा जिल्हा बँकेजवळ ५१९ कोटी ठेवी होत्या व ५२२ कोटी कर्जवाटप होते त्यापैकी ३९२ कोटी कृषी कर्ज होते. बँकेचा संचित तोटा २४७ कोटी होता. त्यामुळे बँकेला ३९२ कोटी कर्जमाफीतून मिळतील व बँकेला १५५ कोटी खेळते भांडवल मिळेल. ‘‘कर्जमाफी ही आमच्या बँकेसाठी अचानक मिळालेले वरदान आहे.’’ असे मुख्याधिकारी डॉ. अशोक खरात म्हणाले.वर्धा जिल्हा बँकेची स्थिती जरा वेगळी आहे. बँकेजवळ ३६५ कोटी ठेवी आहेत व कर्जवाटप ३१८ कोटी व कृषीकर्ज २४३ कोटी आहे. बँकेचा संचित तोटा २८० कोटी आहे. त्यामुळे बँकेला २४३ कोटी मिळाले तरी ३७ कोटी तोटा कायम राहील. ‘‘सरकारने आम्हाला आर्थिक मदत द्यावी व सक्षम जिल्हा बँक बनवावे’’ अशी अपेक्षा मुख्याधिकारी अरुण कदम यांनी व्यक्त केली.तक्ता (रु. कोटीत)नावठेवीएकूण कर्जकृषी कर्जसंचित तोटाबुलढाणा जिल्हा बँक ५१९.०९५२२.९१३९२.७८२४७.७०वर्धा जिल्हा बँक३६५.५६३१८.६५२४३.०९२८०.८५नागपूर जिल्हा बँक८४२.२२६६१.०४४७८.९७२१६.१०