शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

दोन भावांसह तीन आरोपी ३१ वर्षांनी खुनातून निर्दोष

By admin | Updated: December 10, 2015 03:08 IST

धंद्यातील वैमनस्यावरून ३१ वर्षांपूर्वी अंधेरी (प.) येथील अदिल रशिद या तरुणाच्या खून प्रकरणी खेरवाडी पोलिसांनी दाखल केलेल्या खटल्यातून उच्च न्यायालयाने, संशयाचा फायदा देत

मुंबई : धंद्यातील वैमनस्यावरून ३१ वर्षांपूर्वी अंधेरी (प.) येथील अदिल रशिद या तरुणाच्या खून प्रकरणी खेरवाडी पोलिसांनी दाखल केलेल्या खटल्यातून उच्च न्यायालयाने, संशयाचा फायदा देत, दोन भावांसह तीन आरोपींची अपिलात निर्दोष मुक्तता केली.नॅशनल पार्कमध्ये सहलीला जातो असे सांगून ढाकेधाके कॉलनी, एस. व्ही.रोड, अंधेरी (प.) येथील राहत्या घरातून १५ नोव्हेंबर १९८४ रोजी बाहेर पडलेल्या अदिल रशिदचा मृतदेह दुसऱ्या दिवशी ठाणे जिल्ह्याच्या पालघर तालुक्यातील दुर्वेश गावी पांडु पराडे या गावकऱ्यास प्रातर्विधीसाठी गेला असताना आढळला होता. आधी अदिल हरवल्याची तक्रार देणाऱ्या रझिया सुलताना या अदिलच्या बहिणीने खुनाचा संशय व्यक्त करणारी फिर्याद नोंदविल्यानंतर पोलिसांनी सईद अहमद हाजी अब्दुल रझाक मिस्त्री, झहीर व जमील ही त्यांची दोन मुले आणि उत्तर प्रदेशातील मेरठ येथील अब्दुल वाजीद ऊर्फ गुड्डु ऊर्फ अब्दुल जब्बार अब्दुल गनी शेखअशा चार आरोपींविरुद्ध खटला दाखल केला होता. सत्र न्यायालयाने मार्च १९९५ मध्ये चौघांनाही जन्मठेप ठोठावली होती. त्याविरुद्ध चारही आरोपींनी केलेले अपील गेली २० वर्षे उच्च न्यायालयात प्रलंबित होते. दरम्यान आरोपी सईद अहमद मिस्त्री यांचे निधन झाले. न्या. बी. पी. धमार्धिकारी व न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठाने अंतिम सुनावणीनंतर झहीर, जमील व अब्दुल वाजीद या तिन्ही आरोपींची सर्व आरोपांतून पूर्णपणे निर्दोष मुक्तता केली.या खटल्यात अभियोग पक्षाने २१ साक्षीदार तपासले असले तरी तो प्रामुख्याने परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित आहे. विशेषत: खून खटल्यात गुन्हा केवळ आरोपींनीच केला आहे, असे दर्शविणारी परिस्थितीजन्य पुराव्यांची नि:संदिग्ध व अखंड साखळी दिसत असेल तरच आरोपींना दोषी ठरविता येते. प्रस्तुत प्रकरणात तशी स्थिती नसल्याने संशयाचा फायदा देऊन सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे, असे खंडपीठाने नमूद केले. (विशेष प्रतिनिधी)न्यायालयाची अन्य निरीक्षणेअदिल रशिदच्या मृत्यूपूर्वी आरोपीच शेवटी त्याच्यासोबत होते, हा परिस्थितीजन्य पुरावाही नि:संशय नाही. कारण अदिल आरोपींसोबत घरातून बाहेर पडणे आणि त्याचा मृतदेह दुर्वेश गावात आढळणे या दरम्यान बराच काळ उलटून गेला होता. त्यामुळे दरम्यानच्या काळात अन्य कोणी अदिलचे बरेवाईट केले असण्याची शक्यता अगदीच अशक्यकोटीतील नाही.प्रवासासाठी ज्याच्याकडून अ‍ॅम्बॅसेडर मोटार भाड्याने घेतली होती त्या किशोर दधिच या ट्रॅव्हल एजन्टजवळ ‘आमच्याकडून एक खून झाला आहे,’ अशी आरोपींनी दिलेली कथित कबुली विश्वासार्ह नाही.पोलिसांनी गुन्हा नोंदवून शोधाशोध सुरू केल्यावर आरोपी मिस्त्री पिता-पुत्र मेरठला पळून गेले होते, हा प्रतिकूल परिस्थितीजन्य पुरावा मानून सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरविले होते. परंतु ते चूक ठरविताना उच्च न्यायालयाने म्हटले की, प्रतिकूल परिस्थितीत स्वत:चा बचाव करणे ही स्वाभाविक मानवी प्रवृत्ती आहे. त्यामुळे अन्य काही सबळ पुरावा नसेल तर आरोपी पळून गेले होते एवढ्यावरून त्यांना दोषी धरता येणार नाही.