शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन हजार गाववाडे पाणी पुरवठय़ापासून वंचित

By admin | Updated: June 1, 2015 02:10 IST

राज्यातील दोन वर्षापासून पाणीपुरवठा योजनांची उद्दिष्टपूर्ती नाही.

बुलडाणा : पाणीटंचाईने राज्यातील १ हजार ८४६ गावे आणि १ हजार ८0२ वाड्यांवरील ग्रामीण जनतेच्या घशाला कोरड पडली आहे. गत दोन वर्षात पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबाजावणीत दिरंगाई झाल्यामुळे राज्यातील तब्बल ३ हजार ६४८ गाववाड्यांमध्ये नागरिक पाणी पुरवठय़ापासून वंचित राहीले आहे. विविध कारणांमुळे पाणीपुरवठा योजनांचे काम होवू न शकल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील बर्‍याच गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या स्वतंत्र योजना आहेत. शिवाय जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदींच्या नळपाणीपुरवठा योजना आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून गत दोन २0१३-१४ आणि २0१४-१५ या वर्षामध्ये एकूण ९ हजार २६६ गाव आणि वाड्यांमध्ये पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडे उद्दिष्ट देण्यात आले होते; मात्र उद्दिष्टपूर्ती न झाल्यामुळे बर्‍याच योजनांच्या जलवाहिन्याही गंजल्या असून, पाण्याच्या टाक्या कोरड्या पडलेल्या आहेत. काही योजनांना वीज बिलाच्या थकबाकीचा आणि गावातील आपसी वादाचा फटका बसला आहे. त्यामुळे दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च होऊनही योजना कार्यान्वित नसल्याने जनतेच्या तोंडाला कोरड पडलेली आहे. जनतेला पिण्यायोग्य व पुरेसे पाणी पुरवावे या उद्देशातून राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून राज्यामध्ये २00९ पासून हा कार्यक्रम सुरु आहे. २0१३-१४ मध्ये या कार्यक्रमातून ५0६६ गाववाड्यांच्या उद्दिष्टापैकी ४ हजार ६५ गाववाड्यांची कामं पूर्ण करण्यात आली. तर २0१४-१५ मध्ये ४ हजार २00 गाववाड्यांच्या उद्दिष्टपैकी १ हजार ५५३ एवढय़ाच गाववाड्यांची काम पूर्ण करण्यात आली; मात्र ३ हजार ६४८ ठिकाणच्या पाणीपुरवठा योजना बंदच आहेत. *पाणी टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांमध्ये दरवर्षी ऑक्टोबर ते जून या कालावधीत पाणीटंचाई निवारण कार्यक्रम राबविला जातो. या उपयायोजना म्हणून गावे आणि वाड्यामध्ये नवीन विंधण विहिरी, तात्पुरती नळपाणीपुरवठा दुरुस्ती, पुरक नळजोडणी, टँकर व बैलगाडीने पाणीपुरवठा, खाजगी विहिरीचे अधिग्रहण, विहीरी खोल करणे, गाळ काढणे आणि बुडक्या विहिरीचे बांधकाम करण्यात येते; मात्र गत दोन वर्षात या योजनांच्या कामांची काम उद्दिष्टाप्रमाणे पूर्ण न झाल्याचे राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या अहवालात नमूद आहे.