शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

साडेतीन हजार गाववाडे पाणी पुरवठय़ापासून वंचित

By admin | Updated: June 1, 2015 02:10 IST

राज्यातील दोन वर्षापासून पाणीपुरवठा योजनांची उद्दिष्टपूर्ती नाही.

बुलडाणा : पाणीटंचाईने राज्यातील १ हजार ८४६ गावे आणि १ हजार ८0२ वाड्यांवरील ग्रामीण जनतेच्या घशाला कोरड पडली आहे. गत दोन वर्षात पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबाजावणीत दिरंगाई झाल्यामुळे राज्यातील तब्बल ३ हजार ६४८ गाववाड्यांमध्ये नागरिक पाणी पुरवठय़ापासून वंचित राहीले आहे. विविध कारणांमुळे पाणीपुरवठा योजनांचे काम होवू न शकल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील बर्‍याच गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या स्वतंत्र योजना आहेत. शिवाय जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदींच्या नळपाणीपुरवठा योजना आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून गत दोन २0१३-१४ आणि २0१४-१५ या वर्षामध्ये एकूण ९ हजार २६६ गाव आणि वाड्यांमध्ये पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडे उद्दिष्ट देण्यात आले होते; मात्र उद्दिष्टपूर्ती न झाल्यामुळे बर्‍याच योजनांच्या जलवाहिन्याही गंजल्या असून, पाण्याच्या टाक्या कोरड्या पडलेल्या आहेत. काही योजनांना वीज बिलाच्या थकबाकीचा आणि गावातील आपसी वादाचा फटका बसला आहे. त्यामुळे दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च होऊनही योजना कार्यान्वित नसल्याने जनतेच्या तोंडाला कोरड पडलेली आहे. जनतेला पिण्यायोग्य व पुरेसे पाणी पुरवावे या उद्देशातून राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून राज्यामध्ये २00९ पासून हा कार्यक्रम सुरु आहे. २0१३-१४ मध्ये या कार्यक्रमातून ५0६६ गाववाड्यांच्या उद्दिष्टापैकी ४ हजार ६५ गाववाड्यांची कामं पूर्ण करण्यात आली. तर २0१४-१५ मध्ये ४ हजार २00 गाववाड्यांच्या उद्दिष्टपैकी १ हजार ५५३ एवढय़ाच गाववाड्यांची काम पूर्ण करण्यात आली; मात्र ३ हजार ६४८ ठिकाणच्या पाणीपुरवठा योजना बंदच आहेत. *पाणी टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांमध्ये दरवर्षी ऑक्टोबर ते जून या कालावधीत पाणीटंचाई निवारण कार्यक्रम राबविला जातो. या उपयायोजना म्हणून गावे आणि वाड्यामध्ये नवीन विंधण विहिरी, तात्पुरती नळपाणीपुरवठा दुरुस्ती, पुरक नळजोडणी, टँकर व बैलगाडीने पाणीपुरवठा, खाजगी विहिरीचे अधिग्रहण, विहीरी खोल करणे, गाळ काढणे आणि बुडक्या विहिरीचे बांधकाम करण्यात येते; मात्र गत दोन वर्षात या योजनांच्या कामांची काम उद्दिष्टाप्रमाणे पूर्ण न झाल्याचे राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या अहवालात नमूद आहे.