शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

शिवसेनेने थोपविले अखेर नाराजांचे बंड

By admin | Updated: February 8, 2017 04:09 IST

अनेक वर्षे पक्षासाठी झटूनही ऐन निवडणुकीच्या तोंडावर आयारामांना तिकीट दिल्याने नाराज झालेल्या शिवसेनेतील बंडखोरींना अपक्ष

ठाणे : अनेक वर्षे पक्षासाठी झटूनही ऐन निवडणुकीच्या तोंडावर आयारामांना तिकीट दिल्याने नाराज झालेल्या शिवसेनेतील बंडखोरींना अपक्ष म्हणून मैदानात नशिब अजमावण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, यातील तब्बल ९० टक्के बंडोबांचे बंड थोपविण्यात शिवसेनेला यश आले आहे. यामध्ये अधिक नाराज झालेल्या पूजा वाघ, नम्रता जाधव, अश्विनी जगताप, निलेश लोहाटे आदींसह इतर बंडखोरांना शिवसेनेने पुन्हा अनेक वादे दिले आहेत. परंतु, शिवसेना हे वादे पूर्ण करणार का याचा निर्णय निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.शिवसेना आणि भाजपाची युती तुटल्यानंतरही या दोन्ही पक्षात तिकीट नाकारण्यात आल्याने बंडखोरी झाली होती. अनेकांनी थेट बंडखोरी करुन शिवसेनेच्या श्रेष्ठीनाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा फटकादेखील शिवसेनेला बसण्याची शक्यता होती. पूजा वाघ यांनी तर नाराज होऊन पक्षाच्या विरोधात जाऊन भूमिका घेतली होती. तर नम्रता जाधव यांनीदेखील अशाच प्रकारे प्रचाराचा धडाकाही सुरु केला होता. असाच काहीसा प्रकार अनेक प्रभागातून दिसून येत होता. अखेर शिवसेनेने मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत बैठका घेऊन ९० टक्के बंडोबांना शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये पूजा वाघ यांच्यासह अश्विनी जगताप, गणेश पाटील यांच्या पत्नी, निलेश लोहटे, रामदास पडवळ, हेमलता पडवळ, कृष्णकुमार नायर, दळवी, कांबळे आदींसह इतरांनीदेखील माघार घेतली आहे. माजी महापौर स्मिता इंदूलकर, आणि संगीता घाग यांनीदेखील माघार घेतली असली तरी त्या शिवसेनेला सहकार्य करण्याच्या मनस्थितीत असल्याचे दिसत नाही. चंद्रगुप्त घाग यांच्यासह आरती हर्षल वाघ यांनीदेखील निवडणुकीतून माघार घेतलेली नाही. दरम्यान शिवसेनेचे प्रभाग क्र. ६ मधील उमेदवार दिलीप बेंदुगडे यांनी योग्य कागदपत्रे न जोडल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)